शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

मिरचीने आणले डोळ्यात पाणी! चुरड्यामुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2021 3:29 PM

प्रतिकूल वातावरणामुळे मिरचीच्या पिकावर चुरडा व फुलकिडीचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. महागड्या औषधांची फवारणी करूनही या दाेन्ही किडी नियंत्रणात येत नसल्याने काही शेतकऱ्यांनी मिरचीचे पीक उपटून रब्बीच्या दुसऱ्या पिकाचे नियाेजन करायला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देफुलकिडींचाही प्रादुर्भावसततच्या ढगाळ वातावरणाचा परिणाम

नागपूर : ‘राईस बेल्ट’ म्हणून ओळख असलेल्या रामटेक तालुक्यात मिरचीचे लागवड क्षेत्र हळूहळू वाढत आहे; मात्र मागील १५ दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण असल्याने मिरचीच्या पिकाची चुरड्यासाेबतच फुलकिडींचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. वारंवार फवारणी करूनही या दाेन्ही किडी नियंत्रणात येत नसल्याने रामटेक तालुक्यातील मिरचीचे पीक धाेक्यात व मिरची उत्पादक संकटात सापडले आहेत.

नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरचीला मागील वर्षी चांगला भाव मिळाल्याने यावर्षी रामटेक तालुक्यात मिरचीचे लागवड क्षेत्र मागील वर्षीच्या तुलनेत वाढले आहे. यावर्षी तालुक्यातील मानापूर येथील आनंदराव हिंगे व विनायक हिंगे यांनी प्रत्येकी दोन एकरात मिरचीची लागवड केली असून, रामनाथ मोटघरे यांनी सात, सारंग हिंगे व भाऊराव हिंगे यांनी प्रत्येकी चार, श्रीचंद सातपुते यांनी एक, जगनाथ घोल्लर यांनी तीन एकरात मिरचीची लागवड केली आहे. एकट्या मानापूर शिवारात ४० एकरात मिरचीची लागवड केली आहे.

प्रतिकूल वातावरणामुळे मानापूर, मसला, बोरी, काचूरवाही, वडेगाव यासह अन्य शिवारातील मिरचीच्या पिकावर चुरडा व फुलकिडीचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. महागड्या औषधांची फवारणी करूनही या दाेन्ही किडी नियंत्रणात येत नसल्याने काही शेतकऱ्यांनी मिरचीचे पीक उपटून रब्बीच्या दुसऱ्या पिकाचे नियाेजन करायला सुरुवात केली आहे. पीकेव्हीचे कीटकशास्त्रज्ञ डाॅ. नंदकिशोर लव्हे यांनी या नुकसानग्रस्त मिरचीच्या पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दूधराम सव्वालाखे, तालुका कृषी अधिकारी दिनेश भोये, मंडळ कृषी अधिकारी चंद्रमणी हाटे, कृषी सहायक नारायण तोडमल उपस्थित हाेते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या.

मिरचीचे दर काेसळले

रामटेक तालुक्यातील बहुतांश मिरची उत्पादकांनी मिरचीच्या पिकावर प्रतिएकर ७० ते ८० हजार रुपयांचा खर्च केला आहे. बहुतेकांनी बेड तयार करून तसेच मल्चिंग पेपरचा वापर करीत मिरचीची लागवड केली आहे. तालुक्यातील शेतकरी हिरव्या मिरचीची विक्री करतात. १५ दिवसांपूर्वी हिरव्या मिरचीला प्रतिकिलाे २२ ते ३० रुपये भाव मिळायचा. हे दर आठ ते नऊ रुपये प्रतिकिलाेवर आले असून, मिरची ताेडण्याचा खर्च पाच ते सहा रुपये प्रतिकिलाे येत असल्याची माहिती मिरची उत्पादकांनी दिली.

या उपाययाेजना करा

चुरड्याच्या पतंगाचे नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात निळ्या रंगाचे चिकट सापळे लावावे. निंबोळी अर्काची फवारणी करावी. सुती कापडाला एरंडी तेलात बुडवून ताे कापड झाडावरून फिरवावा यासह अन्य उपाययाेजना कीटकशास्त्रज्ञ डाॅ. डाॅ. नंदकिशोर लव्हे यांनी सुचविल्या आहेत. त्यांनी फवारणी दरम्यान हाेत असलेल्या चुकाही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी