शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मध्य रेल्वेने फुकट्यांसह बेशिस्त प्रवाशांकडून वसुल केले दीडशे कोटी

By नरेश डोंगरे | Updated: September 26, 2022 20:51 IST

विशेष तपासणी मोहिमेतून दणका - राज्यात नागपूर विभाग तिसऱ्या स्थानी

नागपूर - मध्य रेल्वेने राज्यातील सहा विभागात तिकिट तपासणीची विशेष मोहिम राबवून एप्रिल ते सप्टेंबर पर्यंत तब्बल दीडशे कोटी रुपये वसूल केले. फुकट्या आणि बेशिस्त प्रवाशांकडून दंडापोटी ही रक्कम वसूल करण्यात आली. ज्यात मुंबई विभाग पहिल्या तर नागपूर तिसऱ्या स्थानी आहे.

देशभरात विविध मार्गावर रोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. त्यात फुकट्या प्रवाशांची संख्याही लक्षणीय असते. त्या मागोमाग बेशिस्त प्रवाशांचा नंबर लागतो. जनरल तिकिट घेऊन कुणी आरक्षीत तर कुणी एसीमध्ये प्रवास करतात. अशा प्रवाशांना वठणीवर आणण्यासाठी रेल्वेकडून जागोजागी विशेष आकस्मिक तिकिट तपासणी मोहिम राबविली जाते. मध्य रेल्वेत मुख्यालय तसेच मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे या विभागाचा समावेश आहे.

या सर्व विभागात १ एप्रिल ते २० सप्टेंबरपर्यंत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी विशेष तिकिट तपासणी मोहिम राबविली. या मोहिमेत सहाही विभागात एकूण २३ लाख, २० हजार प्रवासी रेल्वे अधिकाऱ्यांच्या हाती लागले. त्यांच्याकडून रेल्वे प्रशासनाने दंडापोटी १५४ कोटी, ५७ लाख रुपये वसूल केले.

विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच कालावधीत मध्य रेल्वेने अशाच प्रकारे मोहिम राबवून ६५ कोटी, ५० लाख रुपये वसूल केले होते. तो आकडा लक्षात घेता यंदा वसूल केलेली रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत १३६ टक्के जास्त आहे. गेल्या वर्षी १० लाख, ६५ हजार फुकटे प्रवासी रेल्वे अधिकाऱ्यांच्या हाती लागले होते. तर यंदा या सहा महिन्यात २० लाख, ९७ हजार प्रवासी विनातिकिट आढळले.

विभागनिहाय प्रकरणे - वसुल केलेली रक्कम

  • मुंबई विभाग - ९.०१ लाख, ५१.१३ कोटी
  • भुसावळ विभाग - ४.८९ लाख, ३८.५८ कोटी
  • नागपूर विभाग - ३.३४ लाख, २२.३६ कोटी
  • सोलापूर विभाग - २.७२ लाख, १७.५९ कोटी
  • पुणे विभाग - १.६२ लाख ११.२७ कोटी
  • मुख्यालय १.६१ लाख, १३.६४ कोटी
टॅग्स :nagpurनागपूरIndian Railwayभारतीय रेल्वे