शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री पदावरून काँग्रेस नेत्यांचा सावध पवित्रा

By कमलेश वानखेडे | Updated: September 23, 2024 15:08 IST

Nagpur : चेन्नीथला, पटोले, थोरात म्हणाले निवडणुकीनंतर ठरेल

नागपूर : महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री पदावरून सावध पवित्रा घेतला आहे. नागपुरातील काँग्रेस नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष होतील, असा दावा केला असताना महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, गटनेते बाळासाहेब थोरात व स्वत: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही निवडणुकीनंतर याबाबत महाविकास आघाडी निर्णय घेईल, असे स्पष्ट केले आहे.

रविवारी नागपुरातील आढावा बैठकीत माजी मंत्री अनीस अहमद, नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, आ. अभिजित वंजारी, प्रवक्ते अतुल लोंढे, सोशल मिडिया सेलचे प्रदेश अध्यक्ष विशाल मुत्तेमवार आदींनी नाना पटोले हेच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास व्यक्त केला होता. प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सोमवारी सकाळी नागपुरात बोलताना निवडणुकीनंतर याबाबत निर्णय होईल, असे स्पष्ट केले. गटनेते बाळासाहेब थोरात यांनीही हीच लाईन कायम ठेवली. आघाडीचा निर्णय आघाडी म्हणून घेऊ. तो योग्य वेळी घेऊ. उत्साही कार्यकर्ते असतात, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावे येत असतात. त्यावर लक्ष देण्याची गरज नाही, असे थोरात म्हणाले. तर नाना पटोले यांनीही यावर निवडणुकी नंतरच महाविकास आघाडीमध्ये बसून निर्णय घेईल, असे स्पष्ट केले. मी जर तर वर विश्वास ठेवत नाही. मी कर्मावर विश्वास ठेवतो. माझ्यासाठी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेतकरी तरुण यांच प्रश्न महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

विदर्भातून जास्त जागा आल्यास पटोलेच मुख्यमंत्री : आ. विकास ठाकरे

विदर्भातून काँग्रेसच्या जास्त जागा निवडून आल्या तर आम्ही काँग्रेस नेते राहुल गांधी यांना साकडे घालू. विदर्भातील नेतृत्वाला संधी देण्याची मागणी करू. नानाभाऊंसाठी मुख्यमंत्रीपद खेचून आणू, असे आ. विकास ठाकरे म्हणाले. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की त्याच्या जिल्ह्यातील किंवा भागातील माणूस मुख्यमंत्री व्हावा. नाना पटोले विदर्भाचे नेते आहे. त्यांची मेहनत आहे. विदर्भातून काँग्रेसला भरभरून जागा मिळाल्या तर नैसर्गिक क्लेम त्यांचाच असेल. काँग्रेसमध्ये सर्वच सक्षम नेते आहे. या स्पर्धेत विदर्भातील जनतेने जास्त जागा दिल्या तर विदर्भातील जनतेचा हक्क पहिला असेल. विदर्भ नंबर वन असला तर यावर हायकमांड सुद्धा न्याय करेल, असा विश्वासही आ. ठाकरे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसnagpurनागपूर