शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

शहरातून आले, गावाबाहेर क्वारंटाईन झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 20:29 IST

अतिशय यातना भोगत ८०० किमीची प्रवास करीत त्यांनी गाव गाठले. गावी पोहचले खरे पण गावकऱ्यांनी त्यांना गावात येण्यास मनाई केली. गावाच्या दबावामुळे नातलगांनी स्वीकारले नाही. शेवटी गावाबाहेर असलेल्या शाळेत त्यांना ठेवण्यात आले. कोरोना चाचणी करूनच त्यांना प्रवेश मिळेल, पण त्यानंतरही १४ दिवस क्वारंटाईन राहावे लागेल.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेलतूरला राहणारा चंदू वर्षभरापासून कामासाठी पुण्यात राहायला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन लागले आणि काम बंद झाले. साधन नसल्याने स्वत:ची सायकल घेतली आणि गावाकडे निघाला. सोबत गावचाच किरणही होता. अतिशय यातना भोगत ८०० किमीची प्रवास करीत त्यांनी गाव गाठले. गावी पोहचले खरे पण गावकऱ्यांनी त्यांना गावात येण्यास मनाई केली. गावाच्या दबावामुळे नातलगांनी स्वीकारले नाही. शेवटी गावाबाहेर असलेल्या शाळेत त्यांना ठेवण्यात आले. कोरोना चाचणी करूनच त्यांना प्रवेश मिळेल, पण त्यानंतरही १४ दिवस क्वारंटाईन राहावे लागेल.चंदू आणि किरण सध्या शाळेत राहत आहेत. घरचे लोक सकाळ-संध्याकाळचा जेवणाचा डबा शाळेत नेऊन देतात. हा डबा त्यांनाच स्वच्छ करावा लागतो. ते बाहेर निघू नयेत म्हणून बाहेरून लॉक करण्यात आले आहे. चेहºयावर निराशा आहे पण नाईलाज आहे. काही दिवसांपूर्वी पुण्याला औंधजवळ एका कंपनीत काम करणारी दीपा कुही तालुक्यातील डोंगरदरा या गावी पोहचली. पण गावकऱ्यांनी तिला गावातील शाळेत ठेवले. त्या शाळेत बाहेरून आलेली एक मुलगी पूर्वीपासून वास्तव्यास होती. तिची आई घरून जेवणाचा डबा पोहचविते, दुरूनच बोलते. मनाला चटका लावणारी परिस्थिती आहे. दीपासोबत त्या दिवशी भंडारा, वडसा, ब्रम्हपुरी आदी गावच्या २२ मुली ट्रॅव्हल्सने नागपूरला पोहचल्या. एसटीने त्या आपल्या गावी गेल्या तेव्हा त्यांनाही असेच बाहेर ठेवण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील गोसे या गावी दोन किमी दूर असलेल्या शाळेत बाहेरून आलेल्या व्यक्तींना ठेवण्यात आले असून नातलग त्यांच्या जेवणाची व्यवस्था करतात.गावोगावी सध्या हीच परिस्थिती आहे. शहरात नोकरी, काम व शिक्षण घेणारी गावची मुले जेव्हा परतली तेव्हा गावकऱ्यांनी कठोर भूमिका घेत त्यांना प्रवेश नाकारला. गावाबाहेर राहण्यासाठी व्यवस्था केलेल्या ठिकाणी १४ दिवस राहण्याची सक्ती करण्यात आली. गावकऱ्यांच्या दबावापुढे नातलगही हतबल दिसून येत आहेत. गावी येऊनही दूर राहावे लागत असल्याने बाहेरून आलेल्यांमध्ये नैराश्य आहे. पण परिस्थितीपुढे सर्वांचे हात टेकले आहेत.डर के आगे जीत हैस्वत:ची सुरक्षा आणि भीतीमुळे गावकऱ्यांनी शहरातून आलेल्या आपल्याच माणसाला जवळ न घेता बाहेरच ठेवण्याची कठोर पावले ग्रामस्थांनी उचलली आहेत. मात्र या भीतीमुळेच गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले, असे म्हणायला हरकत नाही. शहरात नियंत्रण ठेवणाºया यंत्रणा आहेत पण गावात हा धोका पसरला तर नियंत्रण मिळवणे शक्य होणार नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी गावात येणारे मार्ग बंद केले, पहारा देणे सुरू केले. गावात येणाऱ्या बाहेरच्या माणसाला मज्जाव केला. त्यामुळे गावात कोरोनाच्या फैलावावर नियंत्रण राखणे शक्य झाले आहे.