शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : खूप मजा आली... अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

शहरातून आले, गावाबाहेर क्वारंटाईन झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 20:29 IST

अतिशय यातना भोगत ८०० किमीची प्रवास करीत त्यांनी गाव गाठले. गावी पोहचले खरे पण गावकऱ्यांनी त्यांना गावात येण्यास मनाई केली. गावाच्या दबावामुळे नातलगांनी स्वीकारले नाही. शेवटी गावाबाहेर असलेल्या शाळेत त्यांना ठेवण्यात आले. कोरोना चाचणी करूनच त्यांना प्रवेश मिळेल, पण त्यानंतरही १४ दिवस क्वारंटाईन राहावे लागेल.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेलतूरला राहणारा चंदू वर्षभरापासून कामासाठी पुण्यात राहायला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन लागले आणि काम बंद झाले. साधन नसल्याने स्वत:ची सायकल घेतली आणि गावाकडे निघाला. सोबत गावचाच किरणही होता. अतिशय यातना भोगत ८०० किमीची प्रवास करीत त्यांनी गाव गाठले. गावी पोहचले खरे पण गावकऱ्यांनी त्यांना गावात येण्यास मनाई केली. गावाच्या दबावामुळे नातलगांनी स्वीकारले नाही. शेवटी गावाबाहेर असलेल्या शाळेत त्यांना ठेवण्यात आले. कोरोना चाचणी करूनच त्यांना प्रवेश मिळेल, पण त्यानंतरही १४ दिवस क्वारंटाईन राहावे लागेल.चंदू आणि किरण सध्या शाळेत राहत आहेत. घरचे लोक सकाळ-संध्याकाळचा जेवणाचा डबा शाळेत नेऊन देतात. हा डबा त्यांनाच स्वच्छ करावा लागतो. ते बाहेर निघू नयेत म्हणून बाहेरून लॉक करण्यात आले आहे. चेहºयावर निराशा आहे पण नाईलाज आहे. काही दिवसांपूर्वी पुण्याला औंधजवळ एका कंपनीत काम करणारी दीपा कुही तालुक्यातील डोंगरदरा या गावी पोहचली. पण गावकऱ्यांनी तिला गावातील शाळेत ठेवले. त्या शाळेत बाहेरून आलेली एक मुलगी पूर्वीपासून वास्तव्यास होती. तिची आई घरून जेवणाचा डबा पोहचविते, दुरूनच बोलते. मनाला चटका लावणारी परिस्थिती आहे. दीपासोबत त्या दिवशी भंडारा, वडसा, ब्रम्हपुरी आदी गावच्या २२ मुली ट्रॅव्हल्सने नागपूरला पोहचल्या. एसटीने त्या आपल्या गावी गेल्या तेव्हा त्यांनाही असेच बाहेर ठेवण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील गोसे या गावी दोन किमी दूर असलेल्या शाळेत बाहेरून आलेल्या व्यक्तींना ठेवण्यात आले असून नातलग त्यांच्या जेवणाची व्यवस्था करतात.गावोगावी सध्या हीच परिस्थिती आहे. शहरात नोकरी, काम व शिक्षण घेणारी गावची मुले जेव्हा परतली तेव्हा गावकऱ्यांनी कठोर भूमिका घेत त्यांना प्रवेश नाकारला. गावाबाहेर राहण्यासाठी व्यवस्था केलेल्या ठिकाणी १४ दिवस राहण्याची सक्ती करण्यात आली. गावकऱ्यांच्या दबावापुढे नातलगही हतबल दिसून येत आहेत. गावी येऊनही दूर राहावे लागत असल्याने बाहेरून आलेल्यांमध्ये नैराश्य आहे. पण परिस्थितीपुढे सर्वांचे हात टेकले आहेत.डर के आगे जीत हैस्वत:ची सुरक्षा आणि भीतीमुळे गावकऱ्यांनी शहरातून आलेल्या आपल्याच माणसाला जवळ न घेता बाहेरच ठेवण्याची कठोर पावले ग्रामस्थांनी उचलली आहेत. मात्र या भीतीमुळेच गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले, असे म्हणायला हरकत नाही. शहरात नियंत्रण ठेवणाºया यंत्रणा आहेत पण गावात हा धोका पसरला तर नियंत्रण मिळवणे शक्य होणार नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी गावात येणारे मार्ग बंद केले, पहारा देणे सुरू केले. गावात येणाऱ्या बाहेरच्या माणसाला मज्जाव केला. त्यामुळे गावात कोरोनाच्या फैलावावर नियंत्रण राखणे शक्य झाले आहे.