शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कळमन्यात १०० कोटींचा व्यवसाय ठप्प! मतमोजणीसाठी ३, ४, ५ जूनला सात बाजारपेठा बंद

By मोरेश्वर मानापुरे | Updated: May 30, 2024 20:48 IST

फळे व भाजीपाला बाजारात सर्वाधिक नुकसान

नागपूर : कळमन्यातील नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डमध्ये मतमोजणीसाठी गेल्या काही दिवसांपासून उभारण्यात आलेल्या सुरक्षात्मक उपायांमुळे नाशवंत वस्तू भाजीपाला, फळे, लाल मिरची तसेच धान्य आणि आलू-कांदे बाजारातील  जवळपास १०० कोटींचे व्यवहार तीन दिवस ठप्प राहणार आहे. सर्वाधिक फटका फळे आणि भाजीपाला बाजाराला बसणार असल्याची प्रतिक्रिया विविध बाजारातील व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली.नागपुरात पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला मतदान झाले आणि व्होटिंग मशीन्स कळमना बाजार समिती यार्डात आल्यापासून फळे आणि धान्य बाजारातील व्यापाऱ्यांना सुरक्षेचा त्रास सुरू झाला. कळमना मार्केट यार्डातील लिलाव हॉल क्रमांक-३ मध्ये नागपूर आणि क्रमांक-४ मध्ये रामटेक मतदार संघाची मतमोजणी आणि लिलाव हॉल क्रमांक-५ मध्ये भोजन व्यवस्था करण्यात आल्याने या तिन्ही हॉलच्या आजूबाजूची सुरक्षा अधिक कडक करण्यात आली. बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत.

फळांचा लिलाव आणि विक्रीला त्रास

एप्रिल, मे आणि जून महिन्यात आंब्याचा सिझन असल्यामुळे फळांचे ट्रक बाजारात आणण्यास त्रास होऊ लागला. १ व २ मे रोजी व्यापाऱ्यांना नोटिसा देऊन ५ मेपर्यंत जागा रिकामी करण्यास सांगण्यात आले. दुसरीकडे लिलावाची व्यवस्था करण्यासाठी बाजारात रस्त्यावरच ताडपत्री टाकण्यात आली. मात्र, ७ मे रोजी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ताडपत्री फाटली. त्यानंतर फळे व्यापाऱ्यांनी हॉल क्रमांक-४ मध्ये तळ ठोकून आंब्यासह अन्य फळांची विक्री सुरू केली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यापाऱ्यांना २० मेपर्यंत वाढीव मुदत दिली. तेव्हापासूनच व्यापाऱ्यांचे दरदिवशी १ कोटींचे नुकसान होत आहे. आता रविवार २ जून दुपारपासून ५ जूनपर्यंत सर्व बाजारपेठा बंद राहणार असल्याने जवळपास १०० कोटींहून अधिकचा व्यवसाय ठप्प राहणार असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.

स्थायी मतमोजणी केंद्र शहराबाहेर उभारावे

"लिलावाच्या तात्पुरत्या व्यवस्थेमुळे बाजारात माल आणणाऱ्या १५० हून अधिक शेतकऱ्यांना दररोज एक कोटींचा फटका बसत आहे. फळांचा योग्य लिलाव होत नाही आणि किरकोळ विक्रेते माल खरेदीसाठी येत नाहीत. निवडणुकीची मतमोजणी अन्यत्र करण्याची बाजार समितीतील विविध असोसिएशनची गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे मागणी आहे. मात्र, मागणीकडे नेहमीच कानाडोळा करण्यात येतो. सरकारने शहराबाहेर १० एकरात स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्र स्थायी स्वरूपात उभारावे. त्याचा फायदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत होईल. शिवाय, वेअरहाऊस बांधून सरकारला उत्पन्नही मिळू शकेल. पुढील काळात सरकारने कळमन्यात मतमोजणी घेऊ नये," अशी मागणी कळमना फळे बाजार असोसिएशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे यांनी केली.

नुकसान होणारच

"मतमोजणी काळात कळमना बाजार समितीच्या यार्डात भाजीपाल्यांची आवक ३, ४ आणि ५ जून रोजी बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. पण भाजी बाजार यार्डात दुसऱ्या भागात असल्याने ३ रोजी दुपारपर्यंत भाजीपाल्याची विल्हेवाट लावायची आहे. या तीन दिवसात अन्य जिल्हे वा राज्यातून भाज्यांची आवक होणार नाही. त्यामुळे नुकसान होईलच. सरकारच्या नियमांचे पालन करू," असे कळमना भाजीपाला मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद भैसे यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४EVM Machineएव्हीएम मशीनnagpurनागपूरElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग