शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

बंडू धोतरेंचे कार्य लोकचळवळ व्हावी : सुरेश द्वादशीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2019 11:38 PM

मानव विरुद्ध निसर्ग असे तिसरे युद्ध होणार आहे. यात मानव आक्रमक आणि निसर्ग बचावात्मक पवित्रा घेत आहे. स्वार्थासाठी पर्यावरण नासवले जात आहे. ऐतिहासिक वारसा ही पुढील पिढ्यांची कमाई असून बंडू धोतरे आणि त्यांच्या चमूने या वारसाचे जतन करण्याचे आव्हानात्मक कार्य स्वीकारले आहे. त्यांचे कार्य लोकचळवळ व्हावी, असे प्रतिपादन लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देवनराईतर्फे महाराष्ट्र वारसा जतन व संवर्धन परिक्रमचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मानव विरुद्ध निसर्ग असे तिसरे युद्ध होणार आहे. यात मानव आक्रमक आणि निसर्ग बचावात्मक पवित्रा घेत आहे. स्वार्थासाठी पर्यावरण नासवले जात आहे. ऐतिहासिक वारसा ही पुढील पिढ्यांची कमाई असून बंडू धोतरे आणि त्यांच्या चमूने या वारसाचे जतन करण्याचे आव्हानात्मक कार्य स्वीकारले आहे. त्यांचे कार्य लोकचळवळ व्हावी, असे प्रतिपादन लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी आज येथे केले.वनराई फाऊंडेशनच्यावतीने महाराष्ट्र वारसा जतन व संवर्धन परिक्रमा मोटारसायकल रॅली नागपुरात पोहोचल्यानंतर इको प्रो या संस्थेचे बंडू धोतरे आणि त्यांच्या चमूचे स्वागत केले. यावेळी श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात आयोजित समारंभाच्या अध्यक्षस्थानी वनराईचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी होते. प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार, बंडू धोतरे, गोपाळराव ठोसर उपस्थित होते. सुरेश द्वादशीवार म्हणाले, चंद्रपूरच्या किल्ल्याची शोभा वाढावी यासाठी बंडू धोतरे आणि चमुने केलेले कार्य अभिमानास्पद आहे. ३५० वर्षे जुन्या ऐतिहासिक वास्तूचे संरक्षणाचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. जागतिक संघटना, धनवंत संघटनांनी स्वीकारावे असे हे आव्हान आहे. आज सरकारवर निसर्ग, ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी सरकार स्वीकारत नसेल आणि बंडू धोतरेसारख्या तरुणांवर टाकत असेल, तर सरकारला काहीतरी वाटायला हवे. या कार्यात राजकीय पक्षांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. गिरीश गांधी म्हणाले, पर्यावरण क्षेत्रात काम करणे जिकिरीचे झाले आहे. राज्यकर्ते भौतिक स्वप्नात मग्न आहेत. बंडू धोतरेंचे कार्य मोलाचे आहे. शहराच्या सौंदर्यीकरणासाठी नागपुरात १५० वर्षे जुनी झाडे तोडण्यात येत आहेत, ही चुकीची बाब आहे. जंगल आणि मानव हे नाते वृद्धिंगत करण्याची गरज आहे. आज वृक्षारोपण कागदावरच होत आहे. झाडे किती जगली याचे ऑडिट होण्याची गरज आहे. पर्यावरणाच्या बाबतीत राजकीय विचार बाजूला ठेवून कार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. गोपाळराव ठोसर यांनी जंगलाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन विकसित नसल्याचे मत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना बंडू धोतरे यांनी आम्ही केले ते इतरांना सांगण्यासाठी परिक्रमा रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षाबद्दल चिंता व्यक्त केली. प्रास्ताविक स्वानंद सोनी यांनी केले. संचालन अजय पाटील यांनी केले. आभार नीलेश खांडेकर यांनी मानले.

टॅग्स :Vanraiवनराईnagpurनागपूर