शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

बौद्धांचा स्वतंत्र विवाह कायदा आवश्यक  : सी.एल. थूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 10:55 PM

देशात समान नागरी कायदा असावा. परंतु जोपर्यंत संविधानानुसार समान नागरी कायदा होत नाही, तोपर्यंत प्रत्येक धर्मियांना त्यांच्या चालीरिती व रीतीरिवाज पाळण्याचे अधिकार असावे. त्यामुळे बौद्धांच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी बौद्धांचा स्वतंत्र विवाह कायदा आवश्यक आहे, असे प्रतिपादन अनुसूचित जाती जमाती समितीचे सदस्य आणि राज्य शासनाने गठित केलेल्या बौद्ध विवाह कायदा प्रारूप समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायाधीश सी.एल. थुल यांनी येथे केले.

ठळक मुद्दे दीक्षाभूमीवर सामाजिक न्यायमंत्री बडोले यांना कायद्याचे प्रारूप हस्तांतरित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात समान नागरी कायदा असावा. परंतु जोपर्यंत संविधानानुसार समान नागरी कायदा होत नाही, तोपर्यंत प्रत्येक धर्मियांना त्यांच्या चालीरिती व रीतीरिवाज पाळण्याचे अधिकार असावे. त्यामुळे बौद्धांच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी बौद्धांचा स्वतंत्र विवाह कायदा आवश्यक आहे, असे प्रतिपादन अनुसूचित जाती जमाती समितीचे सदस्य आणि राज्य शासनाने गठित केलेल्या बौद्ध विवाह कायदा प्रारूप समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायाधीश सी.एल. थुल यांनी येथे केले.या समितीने तयार केलेल्या बौद्ध विवाह कायद्याचे प्रारूप शनिवारी राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना हस्तांतरित करण्यात आले. लॉर्ड बुद्धा टीव्ही व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमीवर आयोजित या प्रारूप हस्तांतरण सोहळ्याला सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, प्रारूप समितीचे सदस्य आ. डॉ. मिलिंद माने, सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, समितीचे सदस्य अ‍ॅड. दिलीप काकडे , बबन कांबळे, भय्याजी खैरकर, विजय कांबळे, डी. आर. महाजन, अ‍ॅड. अविनाश बनकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, एल.आर. सुटे, भंते हर्षदीप आदी उपस्थित होते.सी.एल. थूल यांनी बौद्ध विवाह कायदा तयार करण्यामागची भूमिका विषद करीत यासाठी सुरुवातीपासून कसा पुढाकार झाला, याची माहिती दिली. बौद्ध समाजासाठी सर्वसमावेशक असे हे कायद्याचे प्रारूप तयार झाले आहे. यानंतर ते इंटरनेटवर लोकांसाठी उपलब्ध केले जाईल. लोकांच्या या संबंधात काही आक्षेप व तक्रारी असतील, ते विचारात घेऊन सुधारणा केली जाईल, त्यानंतर ते विधिमंडळात मांडण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.डॉ. मिलिंद माने, दिनेश वाघमारे, भय्याजी खैरकर, अविनाश बनकर यांनीही आपले विचार व्यक्त केले.संचालन वामन सोमकुंवर यांनी केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे समन्वयक डॉ. सिद्धार्थ गायकवाड, लॉर्ड बुद्धा टीव्हीचे सचिन मून, मोनाल थुल, विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, डॉ. सच्चिदानंद दारुंडे, शिवदास वासे, ललित खोब्रागडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर