शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींना विदेशातच बुद्ध आठवतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 19:43 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा विदेशात जातात तेव्हा तेव्हा त्यांना भगवान बुद्धाच्या अंहिसेची शिकवण आठवते. या शिकवणीचा ते विदेशात अभिमानाने उल्लेखही करतात. भारतात परतल्यावर मात्र त्यांना बुद्ध फारसा आठवत नाही, अशी टीका भदंत खेमचारा यांनी केली.

ठळक मुद्देभदंत खेमचारा : पाली साहित्य संमेलनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा विदेशात जातात तेव्हा तेव्हा त्यांना भगवान बुद्धाच्या अंहिसेची शिकवण आठवते. या शिकवणीचा ते विदेशात अभिमानाने उल्लेखही करतात. भारतात परतल्यावर मात्र त्यांना बुद्ध फारसा आठवत नाही, अशी टीका भदंत खेमचारा यांनी केली. संजीवनी ह्युमन डेव्हलपमेंट सोसायटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान आणि आवाज इंडिया टीव्ही यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर सभागृहात आयोजित दोन दिवसीय पाली साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी भदंत महाथेरो तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भदंत उपनंद, भदंत बोधीपालो, भदंत मेतानंद, भदंत उपनंद, डॉ. प्रफुल्ल गडपाल, डॉ. राजेश चंद्रा, संघमित्रा जाधव व आयोजक अमन कांबळे व प्रीतम बुलकुंडे उपस्थित होते. खेमचारा पुढे म्हणाले, देशभरात बौद्ध बांधव राहतात. त्या त्या प्रदेशातील संस्कृतीचा त्यांच्यावर प्रभाव असतो. पण, अनेक जण त्यांना नवबौद्ध असे संबोधतात. हे चुकीचे आहे. बुद्धाला मानणारे सगळेच बौद्ध आहेत. पाली भाषा ही तथागताच्या विचारांची वाहिका आहे. त्यामुळे तिच्या संवर्धनासाठी घराघरात पाली बोलली गेली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. डॉ. प्रफुल्ल गडपाल, डॉ. राजेश चंद्रा यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रितम बुलकुंडे, बीजभाषण भदंत मेतानंद यांनी केले. या दोन दिवसीय या संमेलनात देशभरातील तज्ज्ञ पाली भाषेबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर