शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

व्हॅटअंतर्गत ‘मिसमॅच’ समाधान योजना आणावी ;शासनाकडे ‘कॅट’ची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:10 AM

राज्य शासनाने व्हॅटअंतर्गत व्यापाऱ्यांना दिलासा देणारी ‘मिसमॅच’ समाधान योजना आणावी, अशी मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) केली आहे.

ठळक मुद्देविक्रीकर विभागातर्फे रिटेल व्यापाऱ्यांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्क                 नागपूर : राज्य शासनाने व्हॅटअंतर्गत व्यापाऱ्यांना दिलासा देणारी ‘मिसमॅच’ समाधान योजना आणावी, अशी मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) केली आहे.‘कॅट’च्या सेंट्रल एव्हेन्यू येथील सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात ‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया म्हणाले, महाराष्ट्रात व्हॅटमधील नोंदणीकृत रिटेल व्यापारी व्हॅट भरून माल खरेदी करतात, पण कंपन्यांचे विक्रेते सरकारी खजिन्यात कराची रक्कम जमा करीत नाहीत. त्यामुळे सरकार नोंदणीकृत व्यापाऱ्यांना वस्तूंच्या पूर्ण किमतीवर व्हॅट भरण्यास सांगते. तसे पाहता वितरकांतर्फे खरेदी केलेल्या मालावर एमआरपीच्या जवळपास ८० टक्के किमतीवर व्हॅट पूर्वीच गोळा होतो. पण खरेदीवेळी नोंदणीकृत रिटेल व्यापाऱ्यांनी पूर्ण व्हॅट भरल्याचे सरकार विसरते. अशास्थितीत रिटेल व्यापाऱ्यांना त्रास देणे हा अन्याय आहे. अनेक रिटेल व्यापारी कम्पोझिशन स्कीममध्ये असून त्यांच्याकडून सरकारला कराचा पूर्ण पैसा मिळाला आहे. त्यानंतरही वसुलीच्या भूमिकेत विक्रीकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे व्यापाऱ्यांना त्रास देणे सुरूच आहे.नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख म्हणाले, विक्रीकर विभाग ज्या लोकांनी कर वा रिटर्न भरला नाही, अशांना सोडून इमानदार रिटेल व्यापाऱ्यांना त्रास देत आहे. त्यामुळे विभागाची प्रतिमा व्यापाऱ्यांमध्ये खराब होत आहे. त्यामुळे व्यापारी कायद्यापासून दूर जात आहेत.रिटेल व्यापारी मोठ्या कंपन्यांचा माल त्यांनी नियुक्त केलेल्या विक्रेत्यांकडून खरेदी करतात. अशास्थितीत जर विक्रेता संग्रहित केलेला व्हॅट सरकारकडे भरत नसतील तर त्याची जबाबदारी कंपन्यांनी घ्यावी, असे अनिल नागपाल म्हणाले.ज्ञानेश्वर रक्षक म्हणाले, ही बाब विक्रीकर विभागाच्या सहआयुक्तांसमोर वारंवार मांडली. लेखी निवेदनही दिले, पण त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. उलट रिटेल व्यापाऱ्यांवर दंड आकारला. विभागाच्या नोटीसने व्यापारी त्रस्त असून तोडगा न निघाल्यास आंदोलनाची भूमिका राहील.कार्यक्रमात ‘कॅट’चे चेअरमन गोपाल अग्रवाल, अध्यक्ष किशोर धाराशिवकर, महासचिव फारुखभाई अकबानी, सुभाष जोबनपुत्रा, राजकुमार गुप्ता, निखिलेश ठाकर, रवींद्र गुप्ता, रवींद्र पडगिलवार, मोरेश्वर काकडे, मधुसूदन त्रिवेदी, विजय गुप्ता, रमेश उमाठे, सतीश बंग, आरिफ खान, स्वर्णिमा सिन्हा, छाया शर्मा, मीना वसाक, ज्योती अवस्थी, जयश्री गुप्ता, एस.बी. भुतोलिया, रेखा चतुर्वेदी आणि संजीवनी चौधरी उपस्थित होते.

टॅग्स :nagpurनागपूर