शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विदर्भाच्या प्रश्नांवरील मंथनालादेखील लागला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 10:57 IST

प्रादेशिक समतोल राखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विदर्भ विकास मंडळाचा कार्यकाळ एप्रिल २०२० मध्ये संपल्याने, त्याचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. आता तर विदर्भातील प्रश्नांवर विचारमंथन करण्याच्या प्रक्रियेलाही ब्रेक लागल्याची बाब उघड झाली आहे.

ठळक मुद्दे२०२१-२२ मध्ये होणाऱ्या कामासाठी विकास मंडळाला अद्यापही परवानगी नाही

कमल शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर करारांतर्गत अनिवार्य असतानादेखील विविध कारणांमुळे विधिमंडळाचे अधिवेशन दोन वर्षांसाठी नागपुरातून पळविण्यात आले. दुसरीकडे प्रादेशिक समतोल राखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विदर्भ विकास मंडळाचा कार्यकाळ एप्रिल २०२० मध्ये संपल्याने, त्याचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. आता तर विदर्भातील प्रश्नांवर विचारमंथन करण्याच्या प्रक्रियेलाही ब्रेक लागल्याची बाब उघड झाली आहे.

विदर्भासह मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी स्थापन झालेली विकास मंडळे राजकीय संघर्षाच्या कचाट्यात सापडली आहेत. घटनेच्या कलम ३७१(२) अन्वये राज्यपालांना १९९४ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या विकास मंडळांच्या माध्यमातून विशेषाधिकार प्राप्त झाले होते. प्रादेशिक संतुलन राखण्याच्या उद्देशाने ते अर्थसंकल्पीय तरतुदीसाठी मार्गदर्शक तत्त्वे देत. मात्र मंडळांचा कार्यकाळ न राहिल्याने ही प्रक्रिया थांबली आहे. आता मंडळाकडून करावयाचा अभ्यासही रखडला आहे.

मंडळाने ११ ऑक्टोबर २०२१ रोजी २०२१-२२ या वर्षातील प्रस्तावित कामाचा तपशील राजभवन आणि राज्य सरकारच्या नियोजन विभागाकडे सुपूर्द केला. मात्र आजपर्यंत त्यांना हे काम करण्याची परवानगी मिळालेली नाही. मंडळाच्या कार्यकाळाचा निर्णय न घेण्याचे तांत्रिक कारण लक्षात घेऊन, त्यास परवानगी देण्यात आली नाही. कार्यकाळ संपला तरी मंडळाचे कार्यालय सुरू झाले आहे. अधिकारी व कर्मचारीही दररोज कार्यालयात येत आहेत. मात्र प्रस्तावित कामांना परवानगी देण्यात आली नाही. 

तीन जिल्ह्यांचा विकास आराखडादेखील रखडला

मानव विकास निर्देशांकात मागास जिल्ह्यांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. २०२१ मध्ये चंद्रपूर, भंडारा व अमरावती जिल्ह्यांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी परवानगी मागितली होती. मुदत वाढवून दिल्यास ही कामे होतील, असे मंडळाने आपल्या अहवालात म्हटले होते. मात्र कार्यकाळाची मुदत वाढविण्यावर कुठलाही निर्णय झाला नाही आणि प्रस्तावित कामांनादेखील मंजुरी मिळाली नाही.

या विषयांच्या अभ्यासासाठी परवानगी मागितली होती

- वन अधिकारी कायद्यामुळे उद्भवलेली परिस्थिती, जीवनमान उंचावण्यासाठी उपाययोजना.

- ग्रामपंचायतींच्या अनुसूचित क्षेत्राच्या विस्ताराचा परिणाम आणि अंमलबजावणी.

- कुमारी मातांच्या आर्थिक आणि सामाजिक समस्यांचा अभ्यास.

- ग्रामीण साठवण योजनेची स्थिती आणि परिणाम.

टॅग्स :GovernmentसरकारVidarbhaविदर्भ