शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
2
ना गोवा ना काश्मीर, २०२५ मध्ये लोकांनी 'गुगल'वर 'या' छोट्या शहराला सर्वाधिक केले सर्च
3
प्रवाशांचे हाल! मुंबई-पुण्यासह देशभरातील ६००हून अधिक इंडिगो विमानांचे उड्डाण रद्द!
4
Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात जोरदार तेजी, चांदीचा दर २ लाखांच्या जवळ; एकाच झटक्यात २४०० रुपयांची तेजी
5
जिद्दीला सलाम ! डोळ्याला इन्फेक्शन... तरीही गॉगल लावून मैदानात उतरला अन् पठ्ठाने शतकच ठोकलं
6
आसिम मुनीर यांची ताकद वाढली; पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे 'हे' ५ मोठे अधिकार संपुष्टात!
7
पुतिन-मोदींची 'सरप्राइज राइड', सफेद रंगाच्या Fortuner ची सगळीकडे चर्चा, महाराष्ट्राशी कनेक्शन
8
Matthew Hayden: 'कपडे काढून धावेन' म्हणणारा मॅथ्यू हेडन जो रूटच्या शतकानंतर काय म्हणाला?
9
"आईशप्पथ हे पुन्हा करणार नाही"; तरुणाचा मास्टर प्लॅन बघून स्कॅमरने टेकले हात, लोकेशन कळताच आरोपी घाबरला
10
एआय: महासत्ता की महासंकट?, गरीब-श्रीमंतांमधील...; 'संयुक्त राष्ट्र संघा'ने या तंत्रज्ञानाबद्दल दिला गंभीर इशारा
11
टाटा समूहावर शोककळा! 'लॅक्मे' आणि 'वेस्टसाइड'च्या संस्थापिका सिमोन टाटा यांचे ९५व्या वर्षी निधन
12
इन्स्टावरच्या गर्लफ्रेंडशी लग्न करायला पोहोचला तरुण; वरातही वाजत निघाली अन् अचानक मुलगी फोनच उचलेना..
13
BB 19: "असं संपायला नको होतं...", मालती चहर घराबाहेर गेल्यानंतर प्रणित मोरेची अशी अवस्था
14
काळजी घ्या! फोन नंबरद्वारे तुमचे लोकेशन ही वेबसाईट उघड करतेय; वैयक्तिक डेटा होतोय लीक
15
IND vs SA : श्रेयस अय्यर संघात आल्यावर ऋतुराज गायकवाडचं काय होणार? आर. अश्विन स्पष्टच बोलला
16
Parth Pawar Land Deal:२१ कोटींचे मुद्रांक शुल्क  आम्ही भरणारच नाही; पार्थ पवारांच्या कंपनीचा न्यायालयात नकार
17
पहिल्याच दिवशी शेअरनं केला पैसा दुप्पट; गुंतवणूकदारांचा मिळालेला जबरदस्त प्रतिसाद; विजय केडियांचीही गुंतवणूक
18
सातपुड्यातील ‘दशरथ मांझी’! रायसिंग वळवी हातात फावडे, कुदळ घेऊन घाटमार्गातील बुजवताहेत खड्डे
19
Personal Loan चं प्रीपेमेंट केलं की क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का? लोन बंद करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
20
ऐनवेळी इंडिगोचे विमान रद्द; नवविवाहित जोडप्याने व्हिडिओ कॉलवर लावली रिसेप्शनला हजेरी; आई-वडील बसले खुर्चीवर
Daily Top 2Weekly Top 5

National Inter-Religious Conference: “अबुधाबीत उभं राहत असलेलं मंदिर हे सर्वधर्म समभावाचे उत्तम उदाहरण”: ब्रह्मविहारी स्वामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 15:34 IST

National Inter-Religious Conference: अबुधाबीतील मंदिर एक स्वप्न होते. मात्र ते आता सत्यात येत आहे, असे ब्रह्मविहारी स्वामी (Brahmavihari Swami) यांनी सांगितले.

नागपूर: कुणी तुम्हाला सांगितले असते की, संयुक्त अरब अमिरातीसारख्या मुस्लिम बहुल राष्ट्रात हिंदू धर्माचे मंदिर बांधले जात आहे, तर तुम्ही त्याची चेष्टा केली असती. मात्र, स्वप्नवत असलेली गोष्ट प्रत्यक्षात साकारली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी इच्छा तेथे मार्ग हे सिद्ध करून दाखवले. मात्र, अबुधाबीत उभे राहत असलेले मंदिर हे सर्वधर्म समभावाचे उत्तम उदाहरण आहे, असे प्रतिपादन बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे धर्मगुरु ब्रह्मविहारी स्वामी (Brahmavihari Swami) यांनी केले. ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नागपुरात आयोजित राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत (National Inter-Religious Conference) ते बोलत होते.  

अबुधाबीतील मंदिर एक स्वप्न होते. मात्र ते आता सत्यात येत आहे. अनेकांनी हे स्वप्नच राहील, ते सत्यात उतरणार नाही, असे सांगितले होते. मात्र, पंतप्रधान मोदींमुळे शक्य झाले. यासाठी एका मुस्लिम व्यक्तीने जागा दिली. ख्रिश्चन व्यक्तीने स्थापत्य, रचनेची बाजू सांभाळली. या प्रकल्पाचे संचालक म्हणून एका शीख व्यक्तीने काम पाहिले. तसेच बौद्ध धर्मीय व्यक्तीनेही या महत्त्वाचा वाटा उचलला आहे. म्हणूनच हे मंदिर सर्वधर्म समभावाचे उत्तम उदाहरण आहे. स्वप्न पाहणे महत्त्वाचे आहे, असे सांगत कम्युनल हार्मनीसाठी एकमेकांना आदर देणे, एकमेकांचा मान-सन्मान राखणेही महत्त्वाचे आहे, असे ब्रह्मविहारी स्वामी यांनी नमूद केले. 

प्रसंगी शांतता राखणे, न्यायापेक्षा मोठे आणि महत्त्वाचे

गुजरातमधील स्वामी नारायण मंदिरावर झालेला हल्ला अजूनही मला आठवतो. तेव्हा मी तेथेच उपस्थित होतो. एखाद्या चित्रपटाला लाजवेल, असा बेछूट आणि प्रचंड गोळीबार तेथे झाला. एखाद्या साधुबाबांनी माझ्यासमोरच प्राण सोडले. तो प्रसंग आठवला तरी अंगावर काटा येतो. पण त्यावेळी आमच्या गुरुंनी शांतता राखण्याचे आवाहन केले. गुजरातमधील काही जणांनी न्याय मिळण्यासाठी ओरड सुरू केली. मात्र, त्यावेळी शांत राहणे आणि शांतता राखणे महत्त्वाचे होते, असे सांगत धर्माधर्मातील वाद संपले, तर कम्युनल हार्मनी प्रस्थापित होणे शक्य होईल, असे स्वामी यांनी सांगितले. 

धर्म आणि अध्यात्म यांची योग्य सांगड महत्त्वाची

भारत विविधतेत एकदा असलेला देश आहे. तसेच भारतात धर्मनिरपेक्षता आहे. कोणताही एक धर्म भारताचा धर्म म्हणून पुढे येऊ शकत नाही. अध्यात्मिकता हा भारतीयांचा आत्मा आहे. मग धर्म कोणताही असो, त्याची शिकवण महत्त्वाची आहे. तसेच धर्म आणि अध्यात्म यांची योग्य सांगड घालणे तसेच अध्यात्मिक बैठकीला योग्य दिशा देणे महत्त्वाचे आहे. अन्य धर्मियांबाबत आदर राखला पाहिजे. तसेच त्या त्या धर्मातील गुरुंचेही एक महत्त्वाचे कर्तव्य आहे, ते म्हणजे जे विचार तुम्ही एखाद्या व्यासपीठावर किंवा सार्वजनिक स्वरुपात मांडता, तेच विचार तुमच्या अनुयायांसमोर खासगी किंवा वैयक्तिकरित्याही मांडले पाहिजेत, तरच कम्युनल हार्मनी शक्य होऊ शकेल, असे स्वामी म्हणाले.

प्रेम, नियम आणि जीवन ही त्रिसुत्री गरजेची

एका आम्ही गुरुंसोबत इस्रायलमध्ये गेलो होतो. तेव्हा आम्ही सर्वांनी ज्यू धर्मियांच्या प्रार्थना स्थळाला भेट दिली. त्यांचे विचार, संस्कार, आचार, अध्यात्मिक गोष्टी समजून घेतल्या. तसेच एक माणूस किंवा एक व्यक्ती म्हणूनही आपण करत राहिले पाहिजे, अशी शिकवण आम्हाला मिळाली. या आंतरधर्म परिषदेतून जाताना केवळ तीन गोष्टी आवर्जुन लक्षात ठेवा, एक म्हणजे प्रेम, दुसरे म्हणजे नियम आणि तिसरे म्हणजे जीवन. प्रेम दिल्याने वाढेल. माणूस म्हणून दुसऱ्या माणसावर प्रेम करायला शिकले पाहिजे. एखादे फूल कुस्करले गेले, तरी ते सुगंध देणे सोडत नाही, हीच गोष्ट आपणही शिकली पाहिजे. तसेच आपणच आपल्याला नियम घालून घेतले पाहिजेत. सरकार किंवा शासनाने कायदे किंवा नियम आणेपर्यंत वाट का पाहावी. संयुक्त अरब अमिरातीमध्ये धर्माबाबतचे कायदे, नियम कठोर आहेत. स्वतःला नियम घालून घेतले, तर दुसऱ्यांनी सांगण्याचा प्रश्नच येणार नाही. तिसरे म्हणजे जीवन. जीवन जगायला शिकले पाहिजे. प्राणीमात्रांचे जीवनही महत्त्वाचे असते. त्याच्यावरही प्रेम करायला हवे. आपण पर्यावरण वाचवण्याची ओरड करत असतो. मात्र, ते कुणी वाचवायचे, आपणच ना, असे सांगत त्याचे आचरण आपण केले नाही, तर पर्यावरण वाचवणे किंवा त्याचे संरक्षण करणे केवळ स्वप्नवत राही, असे स्वामी यांनी नमूद केले. 

टॅग्स :National Inter-Religious Conferenceराष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदLokmatलोकमतnagpurनागपूर