शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

झारखंडचे सरकार पाडण्याचा भाजपचा डाव, प्रभारी अविनाश पांडे यांचा दावा, ८ फेब्रुवारीला राहुल गांधींसोबत आमदारांची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 11:12 IST

Jharkhand News: मध्य प्रदेश गोव्याप्रमाणेच आता झारखंडमधील काँग्रेसप्रणीत सरकार पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत, असा आरोप करीत त्यांचा हा प्रयत्न राजस्थानप्रमाणे यशस्वी होऊ दिला जाणार नाही, असा दावा काँग्रेसचे महासचिव व झारखंडचे नवनियुक्त प्रभारी अविनाश पांडे यांनी शुक्रवारी केला.

नागपूर : मध्य प्रदेश गोव्याप्रमाणेच आता झारखंडमधीलकाँग्रेसप्रणीत सरकार पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत, असा आरोप करीत त्यांचा हा प्रयत्न राजस्थानप्रमाणे यशस्वी होऊ दिला जाणार नाही, असा दावा काँग्रेसचे महासचिव व झारखंडचे नवनियुक्त प्रभारी अविनाश पांडे यांनी शुक्रवारी केला. याचाच भाग म्हणून झारखंडमधील काँग्रेसच्या १८ आमदारांची ८ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नागपूर दौऱ्यादरम्यान पांडे यांनी शुक्रवारी लोकमतला सदिच्छा भेट दिली. यावेळी संपादकीय सहकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. पांडे म्हणाले की, केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून, यंत्रणांचा वापर करून विविध राज्यांमध्ये असलेली काँग्रेसची सरकारे पाडण्याची भाजपची परंपरा राहिली आहे. आता तसे प्रयत्न महाराष्ट्र व झारखंडबाबत होत आहेत.  झारखंडमध्ये याचा सामना करण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून, झारखंड सरकारही ताकदीने काम करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, प्रदेश महासचिव अभिजित सपकाळ, सचिव रवींद्र दरेकर उपस्थित होते.  

चार राज्यांत काँग्रेसचेच सरकार उत्तराखंड, गोवा व मणिपूर या राज्यांमध्ये भाजपला धोबीपछाड देत काँग्रेस सत्तेत येईल. पंजाबमध्ये पुन्हा काँग्रेसचेच सरकार येईल. प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशातही काँग्रेस उल्लेखनीय कामगिरी करेल, असा दावा त्यांनी केला.  काँग्रेसशिवाय पर्याय नाहीकाँग्रेसशिवाय विरोधी पक्ष एकसंध व मजबूत होणे शक्य नाही. विरोधी पक्षाचे नेतृत्व करण्याची इच्छा कुणाचीही असू शकते; मात्र गेल्या सात वर्षात राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने भाजपला घेरले हे प्रशंसनीय आहे, असे त्यांनी ममता बॅनर्जी यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले. प्रादेशिक नेत्यांची नावे पुढे हेतुपुरस्सर विरोधी पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. झारखंडसाठी असे आहे नियोजनnकिमान समान कार्यक्रमांतर्गत सरकार काम करेल.nसंघटन बळकटीसाठी ६० दिवसांचा कार्यक्रम. चिंतन प्रशिक्षण शिबिर होणार.nपक्षाचा प्रत्येक मंत्री दरमहा आठ जिल्ह्यांचा दौरा करेल.n कार्यकर्त्यांना सन्मान देऊन पक्षविस्तार केला जाईल.  

टॅग्स :Avinash Pandeyअविनाश पांडेcongressकाँग्रेसBJPभाजपाJharkhandझारखंड