शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

भाजप मातोश्रीवर ३० हजार पत्र पाठवून देणार ‘कलंक’ला उत्तर

By कमलेश वानखेडे | Updated: July 15, 2023 16:57 IST

भाजपचे युवा वॉरीयर्स सक्रीय : ‘फडणवीस महाराष्ट्राचा अभिमान’ असे पत्रात लिहिणार

नागपूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली ‘नागपूरला लागलेला कलंक’ अशी टीका भाजपने चांगलीच मनावर घेतली आहे. आता या भाजपतर्फे ‘देवेंद्र फडणवीस केवळ नागपूरचाच नव्हे, तर महाराष्ट्राचा अभिमान आहे’, असे लिहिलेले ३० हजार पोस्टकार्ड मातोश्रीवर पाठविण्यात येणार आहे. भाजपचे युवा वॉरीयर्स यांनी शनिवारपासून हे अभियान सुरू केले आहे.

फडणवीस यांच्यावर विखारी टीका केल्यामुळे भाजपच्या संतप्त कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. एवढेच नव्हे तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही गंभीर इशारा दिला होता. आता भारतीय जनता युवा मोर्चाने ‘कलंक’मुळे केलेल्या अपमानाचा वचपा घेण्यासाठी मोहीम आखली आहे.माजी महापौर व मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव संदीप जोशी यांच्या उपस्थितीत फ्रिडम पार्क येथे मातोश्रीवर पत्र पाठविण्याच्या अभियानाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी जोशी म्हणाले, फडणवीस यांनी स्वकर्तुत्वाच्या भरवशावर नगरसेवक ते मुख्यमंत्री अशी वाटचाल केली. पक्षसंघटनेत पहत्वाची पदे भूषवत संघटन बळकट केले. एलएलबी, एलएलएम आणि तेसुद्धा गोल्ड मेडलिस्ट असलेले नेते आहेत. त्यांच्याजवळ विकासाचे व्हीजन आहे. मुख्यमंत्री म्हणून अनेक लोकहिताचे निर्णय घेतले. त्यामुळे ते भाजपसह महाराष्ट्रासाठी भूषण आहेत. अशा व्यक्तिवर एवढ्या खालच्या पातळीवर जावून आरोप करणे योग्य नाही. फडणवीस हे महाराष्ट्राचे भूषण आहेत, याची जाणीव करून देत सदैव स्मरणात राहण्यासाठी भाजपतर्फे मातोश्रीवर ३० हजार पोस्टकार्ड पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाnagpurनागपूर