शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
3
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
4
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
5
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
6
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
7
"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
8
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
9
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
10
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
11
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
12
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
13
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
14
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
15
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
16
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
17
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
18
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
19
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
20
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

“लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे, पण जयंत पाटील कुठेत?”: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 11:29 IST

Devendra Fadnavis News: जयंत पाटील हे त्यांच्या पक्षावर खूप नाराज आहेत. त्यांच्या पक्षातच त्यांना कुणी विचारत नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Devendra Fadnavis News: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीने ४५ हून अधिक जागांचे लक्ष्य ठेवले आहे. तर महाविकास आघाडीकडून भाजपासह महायुतीला चीतपट करण्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दिग्गज नेते प्रचार, बैठका, कार्यकर्ता मेळावे यांच्या माध्यमातून कंबर कसून तयारीला लागल्याचे दिसत आहेत. मात्र, यातच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, जयंत पाटील कुठे आहेत, असा थेट सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

भाजपाच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी केलेल्या एका विधानाबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जयंत पाटील हे त्यांच्या पक्षावर खूप नाराज आहेत. त्यांच्या पक्षातच त्यांना कुणी विचारत नाही. एवढी मोठी निवडणूक सुरू आहे. पण, जयंत पाटील तुम्हाला कुठे दिसत आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून रोहित पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवार हेच दिसत आहेत. जयंत पाटील आहेत कुठे? समजदार को इशारा काफी हैं, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

इंडिया किंवा महाविकास आघाडीला डबे नाहीतच, फक्त इंजिन

महाविकास आघाडीत धुसपूस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. यावर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इंडिया आघाडी असो किंवा महाविकास आघाडी असो यांचे वर्णन कुणीतरी चांगले केले आहे. हे फक्त इंजिन आहे, त्यांना डबेच नाहीत. त्यामुळे इंजिनमध्ये बसायची जागा नाही. प्रत्येक इंजिन वेगळ्या दिशेने जात आहे. आम्ही एकत्र आहोत, असे हात वर करून दाखवायचे आणि पुन्हा विरुद्ध दिशेला जायचे. ही इंजिन काय कामाची, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला. 

दरम्यान, महायुतीच्या जागावाटपावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, तीन पक्ष सोबत आहेत. मित्र पक्षांचा सन्मान राखणे महत्त्वाचे आहे. ३३ जागा आम्ही लढू, असा दावा आम्ही कधीच केला नव्हता. आमचा प्रयत्न होता की, तिघांचा सन्मान राखून ज्या जागा मिळतील, त्या जागा आपण लढल्या पाहिजेत. त्यामुळे ज्या जागा मिळतील, त्यावर आम्ही समाधानी आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४