शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

"राज्यपाल कोश्यारी छत्रपतींच्या प्रेरणेने काम करतात, पण त्यांच्या वक्तव्याचे समर्थन नाही"

By योगेश पांडे | Updated: November 22, 2022 16:52 IST

इतिहासापेक्षा विकासाच्या मुद्द्यांवर वक्तव्य व्हावीत; चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यावर आपली भूमिका मांडली आहे. राज्यपालांनी महाराष्ट्रात आल्यापासून सातत्याने छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेनेच काम केले आहे. त्यांच्या भाषणात नेहमीच छत्रपतींचा उल्लेख असतो. त्यांनी कधीही इतिहास किंवा छत्रपतींच्या प्रतिमेला ठेच पोहोचविण्याचा प्रयत्न केलेला नाही. मात्र त्यांनी त्यादिवशी कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याचे समर्थन करता येणार नाही, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले. ते नागपुरात मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता छत्रपतींची प्रेरणा घेऊन काम करतो. शरद पवार, नितीन गडकरी मंचावर असताना त्यांचा गौरव करणे ठीक आहे. या नेत्यांचा गौरव करण्याचा त्यांचा हेतू होता. पण महाराजांना कमी लेखण्याचा त्यांचा हेतू नव्हता. मात्र छत्रपतींबाबत त्यांनी जे वक्तव्य केले त्याचे समर्थन होऊ शकत नाही. इतिहासावर कुणी जाऊ नये, विकासाच्या मुद्द्यांवर बोलावे. टीकाटिप्पणी करण्यासाठी अशा मुद्द्यांवर बोलू नये, असे ते म्हणाले.

आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींची गळाभेट का घेतली ?

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत लाजीरवाण्या शब्दात टीका केली. त्याची संपूर्ण महाराष्ट्राने निंदा केली. पण आदित्य ठाकरे यांनी त्यांची गळाभेट घेतली. उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे हिंदुत्व, शिवाजी महाराज किंवा सावरकर या विषयांची काळजी असती तर अशी गळाभेट का घेतली असा सवाल बावनकुळे यांनी केला.

राज्यात १६४ वरून १८४ जागांवर जाणार

कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना विविध पक्षांचे ५०० लोक भाजपमध्ये आले. सध्या राज्यात आमचे व मित्रपक्षांचे १६४ उमेदवार आहेत व लवकरच ते १८४ जागांवर पोहोचतील. २०२४ च्या निवडणूकांत महाविकास आघाडीला उभे करण्यासाठी सक्षम उमेदवार सापडणार नाही. त्यामुळे संजय राऊतांना आता यावर अधिक काही बोलू नये. आमचे सरकार स्थिर आहे. सरकार पडण्याची कुठलीही शक्यता नाही, असा दावा बावनकुळे यांनी केला. २७ वर्षांत गुजरातच्या इतिहासात प्रथमच १४५ हून अधिक जागा घेऊन भाजपचे सरकार येईल, असेदेखील ते म्हणाले.

उद्धव ठाकरे ओवैसींसोबतदेखील युती करू शकतात

छत्रपती शिवरायांच्या विचारांवर तयार झालेली शिवसेना आणि स्व. बाळासाहेब ठाकरेंनी रक्ताचं पाणी करून तयार केलेल्या शिवसेनेला मूठमाती देण्याचे काम सद्यःस्थितीत सुरू आहे. आपला पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे आता काहीही करू शकतात. उद्या ते समाजवादी पार्टी, अबू आझमी किंवा असदुद्दीन ओवेसींसोबत बैठका घेऊन युती करू शकतात. मताच्या राजकारणासाठी ते आता कुठल्याही पातळीला जाऊ शकतात, असे आमदार बावनकुळे म्हणाले. 

टॅग्स :PoliticsराजकारणChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजBJPभाजपा