शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

नागपुरात भीमा कोरेगावचे पडसाद : बसवर दगडफेक , ठिकठिकाणी टायरची जाळपोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 12:53 AM

भीमा कोरेगावमध्ये शौर्यस्तंभाला मानवंदना देण्यास गेलेल्या भीम सैनिकांवर सोमवारी झालेल्या दगडफेकीचे नागपुरात मंगळवारी तीव्र पडसाद उमटले.

ठळक मुद्देनिषेध, घोषणाबाजी, रस्ता रोको, इंदोऱ्यात दगडफेक

 ऑनलाईन लोकमतनागपूर : भीमा कोरेगावमध्ये शौर्यस्तंभाला मानवंदना देण्यास गेलेल्या भीम सैनिकांवर सोमवारी झालेल्या दगडफेकीचे नागपुरात मंगळवारी तीव्र पडसाद उमटले. संतप्त जमावाने विविध भागात पुतळा दहन केले, टायर जाळले आणि बसची तोडफोड करतानाच रस्ताही अडवून धरला. संविधान चौकापासून उत्तर नागपुरातील विविध भागात दुपारपासून प्रचंड तणाव निर्माण होत असल्याचे पाहून पोलिसांनी जोरदार बंदोबस्त लावला. राज्य राखीव दलाच्या मदतीने संतप्त जमावाला आवरत पोलिसांनी शांततेचे आवाहन केले. दरम्यान, रात्री कामठीतही दोन बस फोडण्यात आल्या.इंदोऱ्यात रात्री दगडफेक झाली.भीमा कोरेगावमधील घटनेची माहिती कळाल्यानंतर मंगळवारी सकाळपासूनच उत्तर नागपुरातील वातावरण तापू लागले होते. भीमसैनिकांवर दगडफेक करणाऱ्यांवर  राष्ट्रद्रोह तसेच अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा, अशी मागणी करीत तरुण दुपारपासून विविध भागात एकत्र होऊ लागले. घोषणाबाजी सुरू झाली. दुपारी १२.३० च्या सुमारास जरीपटक्यातील भीम चौक, इंदोरा, कमाल चौकात टायर जाळून सरकारविरोधी घोषणाबाजी करीत भीमसैनिकांनी आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर मोठ्या संख्येत आंबेडकरी अनुयायी संविधान चौकात गोळा झाले. त्यांनी घोषणाबाजी करीत घटनेचा निषेध नोंदवत रस्त्यावर ठाण मांडले. त्यामुळे वाहतुकीला अडसर निर्माण झाला. काहींनी येथेही टायर जाळले. तणाव वाढत असल्याचे पाहून पोलिसांचा प्रचंड ताफा घटनास्थळी पोहचला. राखीव दलाच्या तुकड्यांही बोलवून घेण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांची समजूत काढून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याची विनंती केली.जिल्हा प्रशासन व राजकीय नेत्यांचे शांततेचे आवाहनभीमा कोरेगाव येथील घटनेवर सर्व तीव्र नाराजी व निषेध व्यक्त होत आहे. जिल्हा प्रशासन, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी भीमसैनिकांना संयम पाळण्याचे आवाहन केले आहे. बावनकुळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, समाजात विविध अफवा पसरविल्या जात आहेत. या अफवांमुळे समाजात तेढ निर्माण होईल, अशा कृत्यांना नागरिकांनी बळी पडू नये व शांतता राखावी. समाज माध्यमावर विविध प्रकारच्या अफवा पसरविण्यात येतात. त्यांच्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही बावनकुळे यांनी केले आहे. राष्ट्रीय   अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्या अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी हल्ल्याचा निषेध केला. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. यादरम्यान भीमसैनिकांनी संयम पाळावा असे आवाहनही त्यांनी केले. काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. प्रकाश गजभिये आदींनी शांततेचे आवाहन केले आहे.अफवांवर विश्वास ठेवू नका : पोलीस आयुक्तदेशाचे हृदयस्थळ असलेले नागपूर शहर सर्वधर्मसमभावाचे प्रतीक मानले जाते. जातीयवादाला येथे थारा नाही. त्यामुळे भीमा कोरेगावच्या घटनेच्या संबंधाने जे काही आंदोलन करायचे, ते शांततेने करावे. नागरिकांनी शांतता बाळगून आपल्या नागपुरात कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची काळजी घ्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शहरातील सर्व सीसीटीव्ही सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे जाणीवपूर्वक वातावरण बिघडविण्याचा कुणी प्रयत्न करू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी लोकमतशी बोलताना केले.संघाने केला भीमा कोरेगाव हिंसाचाराचा निषेधभीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसेचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निषेध केला आहे . या हिंसाचाराला जबाबदार असलेल्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी संघाने केली आहे.संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी पत्रक जारी करून संघाची भूमिका स्पष्ट केली आहे . कोरेगाव हिंसाचार हा निषेधार्ह आणि दु:खद आहे . या घटनेचा आम्ही निषेध करतो . जे यात दोषी आढळतील त्यांना कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे . समाजात तेढ निर्माण करण्याचा काही छुप्या शक्ती प्रयत्न करत आहेत. अशा समाजकंटकांच्या जाळ्यात लोकांनी अडकू नये. नागरिकांनी समाजात शांतता व एकता कायम ठेवावी, असे आवाहन संघातर्फे डॉ. वैद्य यांनी केले .

टॅग्स :nagpurनागपूरCrimeगुन्हा