शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

...मग बेळगाव, कारवार पाकिस्तानात आहे का?; सीमाप्रश्नावरुन मुख्यमंत्र्यांचा भाजपाला सवाल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 14:08 IST

सुप्रीम कोर्टात कर्नाटक-महाराष्ट्राचा सीमावाद प्रलंबित असताना केंद्र सरकारने कर्नाटकची बाजू घेतली.

ठळक मुद्देमहाविकासआघाडीचे सरकार स्थगिती सरकार नसून प्रगतीचं सरकार आहे.बेळगाव कारवार पाकिस्तानात आहे का?तुमचं सरकार असताना तुम्ही काय केलं?

नागपूर - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शेतकरी मुद्द्यावरुन खडाजंगी होताना दिसत आहे. तर सत्ताधारी महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्यासाठी भाजपाने अधिवेशनाच्या सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. अशातच देशात सुरु असणाऱ्या सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन विरोधी भाजपाने सत्ताधारी शिवसेनेला डिवचण्याचे प्रकार केले. मात्र यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपाला टोला लगावला. 

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, बेळगाव कारवार, निपाणी या भागात आजही मराठी बांधवांवर अत्याचार होत आहेत. याठिकाणी राहणारे नागरिक हिंदू नाहीत का? केंद्र सरकार बाहेरच्या हिंदूंना न्याय द्यायला निघालेत पण देशातील हिंदूंना न्याय देणार नाही का? असा सवाल त्यांनी भाजपाला उपस्थित केला. 

तसेच सुप्रीम कोर्टात कर्नाटक-महाराष्ट्राचा सीमावाद प्रलंबित असताना केंद्र सरकारने कर्नाटकची बाजू घेतली. कर्नाटकात आणि केंद्रात दोन्हीकडे भाजपाचेच सरकार आहे. मग बेळगाव, कारवार सीमाप्रश्न का सोडवला जात नाही? जर तुम्हाला देशातील हिंदूंना न्याय देता येत नसेल तर बाहेरच्या हिंदूंना घ्यावं हे म्हणण्यास काय अर्थ आहे? बाहेरील हिंदूंना आश्रय द्या पण त्यांना ठेवणार कुठे याचं स्पष्टीकरण आधी द्यावं असंही भाजपाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुनावले. 

दरम्यान, कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र असा शब्दप्रयोग करत मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषिकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी एकत्र प्रयत्न करुयात असं आवाहन केलं त्याचसोबत बेळगाव कारवार पाकिस्तानात आहे का? सीमाभागातील मराठी बांधव इतके आक्रोश करत आहेत, तुमचं सरकार असताना तुम्ही काय केलं? असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. 

यावेळी उद्धव ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. महाविकासआघाडीचे सरकार स्थगिती सरकार नसून प्रगतीचं सरकार आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या तीन चाकी रिक्षा सरकार असल्याच्या टीकेवर गरिबांना बुलेट ट्रेन नाही, तर तीन चाकी रिक्षाच परवडते असं सांगितले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील कोणत्याही कामाला स्थगिती देण्यात आली नसल्याचे देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रbelgaonबेळगाव