शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
3
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
4
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
5
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
6
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
7
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
8
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
9
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
10
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
11
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
12
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
13
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
14
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
15
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
16
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
17
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
18
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
19
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
20
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!

...मग बेळगाव, कारवार पाकिस्तानात आहे का?; सीमाप्रश्नावरुन मुख्यमंत्र्यांचा भाजपाला सवाल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 14:08 IST

सुप्रीम कोर्टात कर्नाटक-महाराष्ट्राचा सीमावाद प्रलंबित असताना केंद्र सरकारने कर्नाटकची बाजू घेतली.

ठळक मुद्देमहाविकासआघाडीचे सरकार स्थगिती सरकार नसून प्रगतीचं सरकार आहे.बेळगाव कारवार पाकिस्तानात आहे का?तुमचं सरकार असताना तुम्ही काय केलं?

नागपूर - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शेतकरी मुद्द्यावरुन खडाजंगी होताना दिसत आहे. तर सत्ताधारी महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्यासाठी भाजपाने अधिवेशनाच्या सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. अशातच देशात सुरु असणाऱ्या सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन विरोधी भाजपाने सत्ताधारी शिवसेनेला डिवचण्याचे प्रकार केले. मात्र यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपाला टोला लगावला. 

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, बेळगाव कारवार, निपाणी या भागात आजही मराठी बांधवांवर अत्याचार होत आहेत. याठिकाणी राहणारे नागरिक हिंदू नाहीत का? केंद्र सरकार बाहेरच्या हिंदूंना न्याय द्यायला निघालेत पण देशातील हिंदूंना न्याय देणार नाही का? असा सवाल त्यांनी भाजपाला उपस्थित केला. 

तसेच सुप्रीम कोर्टात कर्नाटक-महाराष्ट्राचा सीमावाद प्रलंबित असताना केंद्र सरकारने कर्नाटकची बाजू घेतली. कर्नाटकात आणि केंद्रात दोन्हीकडे भाजपाचेच सरकार आहे. मग बेळगाव, कारवार सीमाप्रश्न का सोडवला जात नाही? जर तुम्हाला देशातील हिंदूंना न्याय देता येत नसेल तर बाहेरच्या हिंदूंना घ्यावं हे म्हणण्यास काय अर्थ आहे? बाहेरील हिंदूंना आश्रय द्या पण त्यांना ठेवणार कुठे याचं स्पष्टीकरण आधी द्यावं असंही भाजपाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुनावले. 

दरम्यान, कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र असा शब्दप्रयोग करत मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषिकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी एकत्र प्रयत्न करुयात असं आवाहन केलं त्याचसोबत बेळगाव कारवार पाकिस्तानात आहे का? सीमाभागातील मराठी बांधव इतके आक्रोश करत आहेत, तुमचं सरकार असताना तुम्ही काय केलं? असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. 

यावेळी उद्धव ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. महाविकासआघाडीचे सरकार स्थगिती सरकार नसून प्रगतीचं सरकार आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या तीन चाकी रिक्षा सरकार असल्याच्या टीकेवर गरिबांना बुलेट ट्रेन नाही, तर तीन चाकी रिक्षाच परवडते असं सांगितले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील कोणत्याही कामाला स्थगिती देण्यात आली नसल्याचे देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रbelgaonबेळगाव