शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लूविषयी जागरूक राहा

By admin | Updated: February 6, 2015 00:57 IST

स्वाईन फ्लूचे रुग्ण देशभरात दिसून येत आहे. राज्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूच्या २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ११३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सर्वात जास्त मृत्यू नागपुरात झाले आहे.

दीपक सावंत : राज्यात २९ मृत्यू, ११३ पॉझिटिव्हनागपूर : स्वाईन फ्लूचे रुग्ण देशभरात दिसून येत आहे. राज्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूच्या २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ११३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सर्वात जास्त मृत्यू नागपुरात झाले आहे. आतापर्यंत १४ रुग्णांचा बळी गेला आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभागासह शासकीय वैद्यकीय रुग्णालयांना जागरूक राहणाचे निर्देश देण्यात आले आहेत. जनतेनेही लक्षणे दिसताच तत्काळ उपचार घ्यावा, असा सल्ला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी येथे दिला.गुरुवारी भंडारा येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील सर्वच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संवाद साधून स्वाईन फ्लूचा आढावा घेतला. त्यानंतर सायंकाळी उपसंचालक आरोग्य विभागाच्या नागपूर कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. डॉ. सावंत म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून स्वाईन फ्लूची माहिती घेतली जात आहे. बुधवारी रात्री मेडिकलमध्ये बैठक घेतली. यात स्वाईन फ्लूचे जे रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत किंवा ज्यांचा मृत्यू झाला आहे, ते बाहेरच्या राज्यात जाऊन आले असल्याचे समोर आले आहे. याशिवाय हवामानातील बदल, यावर्षी थंडीने गाठलेला उच्चांक, स्वाईन फ्लूच्या विषाणूमध्ये झालेला बदल याविषयीही माहिती घेतली जात आहे. परंतु रुग्णवाढीचे अद्याप तरी अचूक कारण मिळालेले नाही. स्वाईन फ्लू रुग्णाचे ए, बी, सी, असे वर्गीकरण केले जात आहे. शासकीयसह खासगी रुग्णालयांनाही सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संशयित रुग्णांचे नमुने घेण्यासाठी केंद्रेही वाढविण्यात आली आहेत. आशावर्कर व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना या आजाराविषयी प्रशिक्षण दिले जात आहे. आतापर्यंत एक लाख टॅम्यूफ्लूच्या गोळ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)सिकलसेल व किडनी प्रत्यारोपणचा जीवनदायीत समावेश!राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेला येत्या मार्च महिन्यात तीन वर्षे होत आहे. आतापर्यंत या योजनेत ९७१ आजारांचा समावेश आहे. किडनी प्रत्यारोपण आणि सिकलसेल रुग्णांना येणारा अडचणी लक्षात घेता या दोन्ही आजारांचा राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत समावेश केला जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपल्यानंतर विमा कंपन्यांना विश्वासात घेऊन जुलैपर्यंत यात फेरबदल केले जातील, असेही डॉ. सावंत म्हणाले.