शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बँकांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचून कर्जपुरवठा करावा : अश्विन मुदगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 20:08 IST

खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात झाली असून बी-बियाणे, खते आदीसाठी शेतकऱ्यांना कर्जाची आवश्यकता असून राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचून प्रत्येक गावात कर्ज मेळावे घेऊन शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सुलभपणे कर्जपुरवठा करुन दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

ठळक मुद्देखरीप कर्ज वाटपाचा आढावा, जिल्ह्यात ७७७.८० कोटी रुपये कर्ज वाटप, कमी कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांविरुद्ध कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात झाली असून बी-बियाणे, खते आदीसाठी शेतकऱ्यांना कर्जाची आवश्यकता असून राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचून प्रत्येक गावात कर्ज मेळावे घेऊन शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सुलभपणे कर्जपुरवठा करुन दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.बचत भवन सभागृहात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा यासंदर्भात विविध बँकांचा आढावा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतला. यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहायक प्रबंधक डी. के. सिंह, नाबार्डच्या जिल्हा विकास प्रबंधक मैथिली कोवे, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, प्रकल्प संचालक विवेक इलमे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अजय कडू आदी उपस्थित होते.खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९७९ कोटी रुपये कर्जपुरवठा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी विविध बँकांनी २४ हजार ९५३ शेतकऱ्यांना ७७५ कोटी ८० लक्ष रुपयांचा कर्जपुरवठा पूर्ण केला आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कर्जपुरवठा करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने बँकांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन पेरणीपूर्वी कर्ज कसे उपलब्ध करुन देण्यात येईल, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. मागील वर्षी १०६६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून त्यापैकी २० हजार ७६५ शेतकऱ्यांना २६० कोटी ६५ लक्ष रुपयांचे म्हणजे १९ टक्के कर्जपुरवठा झाला होता. परंतु यावर्षी विविध बँकांनी आतापर्यंत २८ टक्के कर्जपुरवठा केलेला आहे. कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र ३४ कोटी ९ लक्ष (४२ टक्के), बँक ऑफ इंडिया ८१ कोटी १० लक्ष (४० टक्के), बँक ऑफ बडोदा २२ कोटी ४७ लक्ष (३५ टक्के), पंजाब नॅशनल बँक १८ कोटी ९३ लक्ष (३७ टक्के), एचडीएफसी बँक १२ कोटी ९४ लक्ष (३० टक्के) तर आयडीबीआय बँक २ कोटी ८० लक्ष (२९ टक्के) यांचा समावेश आहे.कमी कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांमध्ये युको बँक व सेंट्रल बँक १६ टक्के, स्टेट बँक १३ टक्के, युनियन बँक ७ टक्के तर अलाहाबाद बँक ९ टक्के एवढा कर्जपुरवठा केला असून या बँकांनी खरीप हंगामात कर्जपुरवठ्याची गती वाढवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी बैठकीत दिल्या.नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ३५ कोटी रुपयांचे म्हणजेच ३५ टक्के कर्जवाटप पूर्ण झाले असून बँकेने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा करणे अपेक्षित आहे. ग्रामीण बँकांनी ८ कोटी ७९ लक्ष म्हणजेच ३८ टक्के कर्जपुरवठा केला असल्याचेही यावेळी सांगितले. शासनाने कर्जमाफी दिलेल्या सर्व शेतकऱ्यांना प्राधान्याने कर्जपुरवठा केला आहे. जिल्ह्यात ७० हजार १५६ शेतकऱ्यांना ४३४ कोटी ५२ लक्ष रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे.यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते जिल्ह्याचा पत आराखडा पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. प्रारंभी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक शरद बारापात्रे यांनी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना विविध बँकांमार्फत उपलब्ध करुन दिलेल्या कर्जपुरवठ्यासंदर्भात माहिती दिली.

टॅग्स :bankबँकFarmerशेतकरीNagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालय