शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

बँकांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचून कर्जपुरवठा करावा : अश्विन मुदगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 20:08 IST

खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात झाली असून बी-बियाणे, खते आदीसाठी शेतकऱ्यांना कर्जाची आवश्यकता असून राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचून प्रत्येक गावात कर्ज मेळावे घेऊन शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सुलभपणे कर्जपुरवठा करुन दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

ठळक मुद्देखरीप कर्ज वाटपाचा आढावा, जिल्ह्यात ७७७.८० कोटी रुपये कर्ज वाटप, कमी कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांविरुद्ध कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात झाली असून बी-बियाणे, खते आदीसाठी शेतकऱ्यांना कर्जाची आवश्यकता असून राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचून प्रत्येक गावात कर्ज मेळावे घेऊन शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सुलभपणे कर्जपुरवठा करुन दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.बचत भवन सभागृहात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा यासंदर्भात विविध बँकांचा आढावा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतला. यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहायक प्रबंधक डी. के. सिंह, नाबार्डच्या जिल्हा विकास प्रबंधक मैथिली कोवे, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, प्रकल्प संचालक विवेक इलमे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अजय कडू आदी उपस्थित होते.खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९७९ कोटी रुपये कर्जपुरवठा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी विविध बँकांनी २४ हजार ९५३ शेतकऱ्यांना ७७५ कोटी ८० लक्ष रुपयांचा कर्जपुरवठा पूर्ण केला आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कर्जपुरवठा करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने बँकांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन पेरणीपूर्वी कर्ज कसे उपलब्ध करुन देण्यात येईल, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. मागील वर्षी १०६६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून त्यापैकी २० हजार ७६५ शेतकऱ्यांना २६० कोटी ६५ लक्ष रुपयांचे म्हणजे १९ टक्के कर्जपुरवठा झाला होता. परंतु यावर्षी विविध बँकांनी आतापर्यंत २८ टक्के कर्जपुरवठा केलेला आहे. कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र ३४ कोटी ९ लक्ष (४२ टक्के), बँक ऑफ इंडिया ८१ कोटी १० लक्ष (४० टक्के), बँक ऑफ बडोदा २२ कोटी ४७ लक्ष (३५ टक्के), पंजाब नॅशनल बँक १८ कोटी ९३ लक्ष (३७ टक्के), एचडीएफसी बँक १२ कोटी ९४ लक्ष (३० टक्के) तर आयडीबीआय बँक २ कोटी ८० लक्ष (२९ टक्के) यांचा समावेश आहे.कमी कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांमध्ये युको बँक व सेंट्रल बँक १६ टक्के, स्टेट बँक १३ टक्के, युनियन बँक ७ टक्के तर अलाहाबाद बँक ९ टक्के एवढा कर्जपुरवठा केला असून या बँकांनी खरीप हंगामात कर्जपुरवठ्याची गती वाढवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी बैठकीत दिल्या.नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ३५ कोटी रुपयांचे म्हणजेच ३५ टक्के कर्जवाटप पूर्ण झाले असून बँकेने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा करणे अपेक्षित आहे. ग्रामीण बँकांनी ८ कोटी ७९ लक्ष म्हणजेच ३८ टक्के कर्जपुरवठा केला असल्याचेही यावेळी सांगितले. शासनाने कर्जमाफी दिलेल्या सर्व शेतकऱ्यांना प्राधान्याने कर्जपुरवठा केला आहे. जिल्ह्यात ७० हजार १५६ शेतकऱ्यांना ४३४ कोटी ५२ लक्ष रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे.यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते जिल्ह्याचा पत आराखडा पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. प्रारंभी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक शरद बारापात्रे यांनी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना विविध बँकांमार्फत उपलब्ध करुन दिलेल्या कर्जपुरवठ्यासंदर्भात माहिती दिली.

टॅग्स :bankबँकFarmerशेतकरीNagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालय