शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेब जागतिक स्त्रीमुक्तीचे उद्धारक

By admin | Updated: June 20, 2016 02:47 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील स्त्रीमुक्तीचे उद्धारक आहेत. त्यामुळे जगभरातील महिलांनी त्यांचे ऋण मानावे, ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन : प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल यांचे प्रतिपादननागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील स्त्रीमुक्तीचे उद्धारक आहेत. त्यामुळे जगभरातील महिलांनी त्यांचे ऋण मानावे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी येथे केले. प्रगतिशील लेखक संघ, संविधान फाऊंडेशन आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर अंबाझरी मार्गावरील अमृतभवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून डॉ. जब्बार पटेल बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे होते तर भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर हे प्रमुख अतिथी होते. ज्येष्ठ नेते डॉ. भालचंद्र कांगो, संविधान फाऊंडेशनचे अध्यक्ष ई.झेड. खोब्रागडे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव सुनील पाटील, सुनीता झाडे व महेंद्रकुमार मेश्राम व्यासपीठावर होते. डॉ. जब्बार पटेल म्हणाले, महिलांच्या अधिकारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एका झटक्यात मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तसेच गरोदर महिलांना हक्काची रजा मिळवून देणारे बाबासाहेब हे जगातील पहिलेच व्यक्ती आहेत. त्यानंतर अनेक देशांनी आपापल्या देशामध्ये गरोदर महिलांसाठी सुटी लागू केली. राज्यघटना तयार करणारा, आरक्षण मिळवून देणारा, गांधीजींशी भांडणारा माणूस म्हणून बाबासाहेब आपल्याला परिचित होते. परंतु बाबासाहेबांवर चित्रपट करीत असताना जेव्हा देशभरासह जगभरात फिरलो तेव्हा बाबासाहेब काय होते, हे खऱ्या अर्थाने कळले. तेव्हा बाबासाहेब समजून घेताना एकेक धक्का बसत गेला. इतक्या मोठ्या उंचीचे ते व्यक्तिमत्त्व होते. कोलंबिया विद्यापीठात जेव्हा मी बाबासाहेबांवर चित्रपट करीत असल्याचे समजले तेव्हा तेथील प्रशासनाने आपल्याकडून एक पैसाही न घेता संपूर्ण मदत केली. तेव्हा त्यांच्या मनात बाबासाहेबांबद्दल किती सन्मान आहे, हे दिसून आले. राज्यघटनेला ५० वर्षे पूर्ण झाली होती; तेव्हा इंग्लंडमध्ये संविधानावर चर्चा ठेवण्यात आली होती. त्यात जगभरातील संविधानाचे तज्ज्ञ, अभ्यासक उपस्थित होते. अध्यक्षस्थानी इंग्लंडचे सर्वोच्च न्यायाधीश होते. त्या चर्चेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली राज्यघटना ही सर्वश्रेष्ठ असून त्यात एक अक्षरसुद्धा बदलण्याची गरज नाही, असे मत व्यक्त करण्यात आले होते. यावरून भारतीय राज्यघटनेची सर्वश्रेष्ठता सिद्ध होते, असेही डॉ. पटेल यांनी स्पष्ट केले. ई.झेड. खोब्रागडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी भूमिका विशद केली. अजय गंपावार यांनी संचालन केले, तर प्रसेनजित ताकसांडे यांनी आभार मानले. समारोपाला ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे उपस्थित होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे अध्यक्षस्थानी होते. ई. झेड. खोब्रागडे, सुनील पाटील,डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, इंद्रजित ओरके व्यासपीठावर होते. (प्रतिनिधी)गांधींविरुद्ध आंबेडकर हे आरएसएसचे षङ्यंत्र महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष हा वैचारिक होता. परंतु या दोन्ही महापुरुषांनी एकमेकांना घडविले आहे. हा इतिहास आहे. परंतु गांधींविरुद्ध आंबेडकर असे भांडण लावून आपसात लढवत ठेवणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे षङ्यंत्र आहे, हे षङ्यंत्र हाणून पाडा, असे आवाहन डॉ. रावसाहेब कसबे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. सोशल मीडियामध्ये ‘इंटेलेक्च्युअल फोरम’ तयार व्हावा आज बाबासाहेबांच्या विचारांवर घाला घालण्याचे प्रकार होत असेल तर त्याविरोधात प्रखरतेने बोलले गेले पाहिजे. फुले-शाहू-आंबेडकरी विचारवंतांनी व अनुयायांनी एकजुटीने बोलावे. यासाठी सोशल मीडियावर एक इंटेलेक्च्युअल फोरम तयार व्हावा. एखाद्याने चुकीचे विचार मांडले असेल तर त्याला तर्कसंगतपणे उत्तर दिले गेले पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केली.