अविनाश भुते दोषारोपमुक्त : हायकोर्टाचा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 23:47 IST2019-09-20T23:45:47+5:302019-09-20T23:47:47+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी ताजश्री समूहाचे संचालक अविनाश रमेश भुते यांना वासनकर गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणात दोषारोपमुक्त केले.

अविनाश भुते दोषारोपमुक्त : हायकोर्टाचा दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी ताजश्री समूहाचे संचालक अविनाश रमेश भुते यांना वासनकर गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणात दोषारोपमुक्त केले. यासंदर्भात भुते यांनी दाखल केलेले अपील न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व पुष्पा गणेडीवाला यांनी मंजूर केले.
विशेष सत्र न्यायालयाने वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीचा सर्वेसर्वा प्रशांत जयदेव वासनकर याच्यासह भुते व अन्य आरोपींविरुद्ध कट रचणे, फसवणूक, विश्वासघात, व्यापाऱ्याने विश्वासघात करणे, धमकी देणे इत्यादी दोषारोप निश्चित केले आहेत. यापैकी व्यापाºयाने विश्वासघात करण्याच्या गुन्ह्यात जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे. भुते यांनी या दोषारोपांना आव्हान दिले होते. कंपनीने ४० ते ५० टक्के व्याजाचे आमिष दाखवून मासिक, तिमाही, वार्षिक, द्विवार्षिक, १८ महिने, ३३ महिने व ४८ महिने मुदतीच्या वेगवगळ्या आकर्षक योजनांतर्गत गुंतवणूकदारांकडून मोठमोठ्या रकमांच्या ठेवी स्वीकारल्या होत्या. त्यानंतर मुदत संपूनही ठेवी व त्यावरील परतावा अदा करण्यात आला नाही. परिणामी, गुंतवणुकदारांनी पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदविल्या. न्यायालयात भुतेतर्फे वरिष्ठ वकील सुनील मनोहर व अॅड. देवेंद्र चव्हाण तर, सरकारतर्फे अॅड. संजय डोईफोडे यांनी कामकाज पाहिले.