शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

Ativrushti Nuksan Bharpai : नागपूर विभागात ४२ हजार हेक्टरवरील पीक मातीमोल ! नुकसान भरपाई मागणीच्या अर्धी पण नाही

By निशांत वानखेडे | Updated: September 22, 2025 20:34 IST

मागणी ३७ काेटीची, मंजुरी १३ काेटी : चंद्रपूरला सर्वाधिक फटका, १४ हजार हेक्टर बाधित

नागपूर : जून महिना काेरडा गेला असला तरी जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना माेठा फटका बसला आहे. सरकारी आकडेवारीनुसार ऑगस्टपर्यंत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात ४२,६०० हेक्टरमधील पिकांचा चिखल झाला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी ३७.७० काेटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाकडे सप्टेंबर महिन्याचे पंचनामे अद्याप सुरू आहेत.

यावर्षी विभागातील सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस नाेंदविला गेला आहे. जुलैच्या सुरुवातीला वेळेवर पाऊस न झाल्याने काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाचाही सामना करावा लागला. त्यानंतर मात्र धाे-धाे सरी बरसल्या. ठराविक काळात झालेल्या पावसाने बहुतेक जिल्ह्यात पुर परिस्थिती निर्माण झाली. जुलै व ऑगस्टमध्येही मुसळधार पावसाने थैमान घातले. गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्यात पिकांना सर्वाधिक फटका बसला. शासकीय आकडेवारीनुसार चंद्रपूर जिल्ह्यात १४,१०५.७४ हेक्टरमधील पिकांना फटका बसला, तर गडचिराेलीत १०,९१२.७३ हेक्टरमध्ये पिकांची नासाडी झाली. याशिवाय वर्ध्यात ९०९१.३९ हेक्टर, गाेंदिया २५८.३२ हेक्टर, नागपूर ५६४४ हेक्टर व भंडारा जिल्ह्यात २५८९.१२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

बाधित क्षेत्राचे पंचनामे करून प्रशासनाने ३७.७० काेटी रुपयांचे नुकसान भरपाईचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले आहेत. त्यातील आतापर्यंत १३.५६ काेटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सप्टेंबर महिन्याचे पंचनामे प्रशासनाकडून केले जात आहेत.

जिल्हानिहाय झालेले नुकसान व मागणी

जिल्हा             बाधित क्षेत्र (हेक्टर)   मागणी (काेटी)           मंजूरनागपूर             ५६४४.०१                   ४.९०                 ३९२.९२वर्धा                 ९०९१.३९                    ८.०१                २३०.६७चंद्रपूर             १४,१०५.७४                  ७.३३                ७.३३गडचिराेली       १०,९१२.७३                  १२.९०                ००गाेंदिया             २५८.३२                      २.३४                 ००भंडारा             २५८९.१२                     ४.३३                 ००

या पिकांना बसला फटका

विभागातील जिल्ह्यात भात पिकासह साेयाबिन, कापूस, मिरची व संत्रा माेसंबीची शेती केली जाते. भंडारा, चंद्रपूर, गडचिराेली, गाेंदिया जिल्ह्यात पुरामुळे जमिन खरडून गेली व धान, साेयाबिन, कापूस पिकाला माेठा फटका बसला आहे. वर्धा जिल्ह्यात कापसाचे माेठे नुकसान झाले. नागपूर जिल्ह्यात धान, साेयाबिनसह संत्रा, माेसंबी आणि मिरची पिकाची नासाडी झाली आहे.

 

टॅग्स :CropपीकVidarbhaविदर्भRainपाऊसnagpurनागपूरfarmingशेती