शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
4
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
5
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
6
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
7
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
8
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
9
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
10
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
11
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
12
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
13
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
14
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
15
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
16
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
17
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
18
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
19
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
20
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

Ativrushti Nuksan Bharpai : नागपूर विभागात ४२ हजार हेक्टरवरील पीक मातीमोल ! नुकसान भरपाई मागणीच्या अर्धी पण नाही

By निशांत वानखेडे | Updated: September 22, 2025 20:34 IST

मागणी ३७ काेटीची, मंजुरी १३ काेटी : चंद्रपूरला सर्वाधिक फटका, १४ हजार हेक्टर बाधित

नागपूर : जून महिना काेरडा गेला असला तरी जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना माेठा फटका बसला आहे. सरकारी आकडेवारीनुसार ऑगस्टपर्यंत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात ४२,६०० हेक्टरमधील पिकांचा चिखल झाला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी ३७.७० काेटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाकडे सप्टेंबर महिन्याचे पंचनामे अद्याप सुरू आहेत.

यावर्षी विभागातील सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस नाेंदविला गेला आहे. जुलैच्या सुरुवातीला वेळेवर पाऊस न झाल्याने काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाचाही सामना करावा लागला. त्यानंतर मात्र धाे-धाे सरी बरसल्या. ठराविक काळात झालेल्या पावसाने बहुतेक जिल्ह्यात पुर परिस्थिती निर्माण झाली. जुलै व ऑगस्टमध्येही मुसळधार पावसाने थैमान घातले. गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्यात पिकांना सर्वाधिक फटका बसला. शासकीय आकडेवारीनुसार चंद्रपूर जिल्ह्यात १४,१०५.७४ हेक्टरमधील पिकांना फटका बसला, तर गडचिराेलीत १०,९१२.७३ हेक्टरमध्ये पिकांची नासाडी झाली. याशिवाय वर्ध्यात ९०९१.३९ हेक्टर, गाेंदिया २५८.३२ हेक्टर, नागपूर ५६४४ हेक्टर व भंडारा जिल्ह्यात २५८९.१२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

बाधित क्षेत्राचे पंचनामे करून प्रशासनाने ३७.७० काेटी रुपयांचे नुकसान भरपाईचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले आहेत. त्यातील आतापर्यंत १३.५६ काेटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सप्टेंबर महिन्याचे पंचनामे प्रशासनाकडून केले जात आहेत.

जिल्हानिहाय झालेले नुकसान व मागणी

जिल्हा             बाधित क्षेत्र (हेक्टर)   मागणी (काेटी)           मंजूरनागपूर             ५६४४.०१                   ४.९०                 ३९२.९२वर्धा                 ९०९१.३९                    ८.०१                २३०.६७चंद्रपूर             १४,१०५.७४                  ७.३३                ७.३३गडचिराेली       १०,९१२.७३                  १२.९०                ००गाेंदिया             २५८.३२                      २.३४                 ००भंडारा             २५८९.१२                     ४.३३                 ००

या पिकांना बसला फटका

विभागातील जिल्ह्यात भात पिकासह साेयाबिन, कापूस, मिरची व संत्रा माेसंबीची शेती केली जाते. भंडारा, चंद्रपूर, गडचिराेली, गाेंदिया जिल्ह्यात पुरामुळे जमिन खरडून गेली व धान, साेयाबिन, कापूस पिकाला माेठा फटका बसला आहे. वर्धा जिल्ह्यात कापसाचे माेठे नुकसान झाले. नागपूर जिल्ह्यात धान, साेयाबिनसह संत्रा, माेसंबी आणि मिरची पिकाची नासाडी झाली आहे.

 

टॅग्स :CropपीकVidarbhaविदर्भRainपाऊसnagpurनागपूरfarmingशेती