शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

पवारांचा हात असता तर पहाटेचे सरकार दोन दिवसात पडले नसते; अशोक चव्हाणांनी फडणवीसांवर साधला नेम

By कमलेश वानखेडे | Updated: February 14, 2023 17:15 IST

फडणवीस पोटनिवडणूक पाहून बोलले, अशोक चव्हाण यांनी काढला चिमटा

नागपूर : पहाटेच्या शपथविधी (फडणवीस-अजित पवार सरकार) मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या संमतीने झाला असता तर ते सरकार दोन दिवसात पडले नसते. पूर्ण पाच वर्षे चालले असते. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले विधान चुकीचे आहे, असा सांगत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी फडणवीस यांच्यावर नेम साधला.

डॉ. बबनराव तायवाडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी नागपुरात आले असता चव्हाण पत्रकारांशी बोलताना म्हणाले, फडणवीस यांच्या वक्तव्याची पाठराखण करताना ‘फडणवीस हे संघाच्या तालमीत तयार झाल्याने खोटे बोलत नाहीत’, असे बावनकुळे म्हणाले. फडणवीस हे हुशार आहेत, हे आपल्यालाही मान्य आहे. ते कधी, कुठे काय बोलायचं याचा विचार करून, वेळ काळ पाहूनच स्टेटमेंट करतात यात शंका नाही. आता कसबा व चिंचवडची पोटनिवडणूक सुरू असताना त्यांनी हे विधान आहे, असा चिमटा चव्हाण यांनी काढला.

‘समझोता’वरून चंद्रशेखर बावनकुळे-अनिल देशमुख आमनेसामने

पवार यांचे समर्थन असते तर सरकार दोन दिवसात पडले नसते. त्यावेळी ही सर्व प्रक्रिया मी जवळून पाहत होतो. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन करून परत बोलावले. ताकीद दिली. ही आपली भूमिका नाही, असे पटवून सांगितले. पवार यांनी पुढाकार घेतल्यामुळेच राष्ट्रवादीचे आमदार परतले व पहाटेचे सरकार पडले, असेही चव्हाण म्हणाले. नागपूर विमानतळावर चव्हाण यांचे काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, अनंतराव घारड, रामकिशन ओझा, अतुल कोटेचा, अभिजित सपकाळ आदिंनी स्वागत केले.

वृत्तपत्र, माध्यमांची स्वायत्तता कायम रहावी

- सर्वे करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. देशात सर्वत्र सर्वे, धाडी सुरू असतात. वृत्तपत्र, माध्यमांची स्वायत्तता कायम राहिली पाहिजे. देशाच्या लोकशाहीत हे अपेक्षित आहे, असेही चव्हाण म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAshok Chavanअशोक चव्हाणSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस