शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा भिंतीअभावी रेल्वेत वाढले असामाजिक तत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:16 IST

नागपूर : नागपूर ते अजनी दरम्यान सुरक्षा भिंतीचा प्रस्ताव मागील चार वर्षांपासून धूळखात आहे. यामुळे रेल्वेच्या परिसरात असामाजिक तत्त्वांची ...

नागपूर : नागपूर ते अजनी दरम्यान सुरक्षा भिंतीचा प्रस्ताव मागील चार वर्षांपासून धूळखात आहे. यामुळे रेल्वेच्या परिसरात असामाजिक तत्त्वांची संख्या वाढत आहे. असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करण्यासाठी हे रखडलेले काम त्वरित पूर्ण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

नागपूर ते अजनी दरम्यान अनेक रेल्वेगाड्यांचा वेग मंदावतो. प्लॅटफाॅर्मवर येण्यापूर्वी अनेकदा सिग्नल न मिळाल्यामुळे या परिसरात रेल्वेगाड्या सिग्नल मिळण्याची वाट पाहत उभ्या असतात. याचा फायदा घेऊन अनेकदा असामाजिक तत्त्व रेल्वेगाड्यात शिरतात. ते प्रवाशांची नजर चुकवून त्यांचे महागडे मोबाईल, साहित्य लंपास करतात. तर अनेकदा रेल्वेचे लोखंड रेल्वे रुळाशेजारी पडून असते. हे लोखंड चोरी करण्यात येते. सुरक्षा भिंतच नसल्यामुळे असामाजिक तत्त्व सहज रेल्वे रुळाच्या बाजूला पोहोचतात. त्यांना हटकण्यासाठी आऊटरकडील भागात आरपीएफचे जवानही हजर राहत नाहीत. याचाच फायदा असामाजिक तत्त्व घेतात. अनेकदा अवैध व्हेंडरही सुरक्षा भिंत नसल्यामुळे या भागातून रेल्वेगाड्यात प्रवेश करतात. या सर्व बाबींना आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नागपूर ते अजनी दरम्यान त्वरित सुरक्षा भिंत उभारण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.

...........

प्रवाशांचा मोबाईल पाडतात खाली

अनेकदा रेल्वेस्थानक येण्यापूर्वी प्रवासी कोचच्या दारावर मोबाईलवर बोलत बसतात. आऊटरकडील भागात असामाजिक तत्त्व हातात काठ्या घेऊन उभे राहतात. प्रवासी मोबाईलवर बोलताना दिसल्यास हे असामाजिक तत्त्व काठी मारून प्रवाशाचा मोबाईल खाली पाडतात आणि मोबाईल घेऊन पसार होतात. अशा घटना अनेकदा घडल्या तरीसुद्धा सुरक्षा भिंत बांधण्यासंदर्भात दिरंगाई करण्यात येत आहे.

सुरक्षा भिंत महत्त्वाची

रेल्वे परिसरात असामाजिक तत्त्वांची संख्या वाढत आहे. सुरक्षा भिंत नसल्यामुळे असामाजिक तत्त्व सहज रेल्वे रुळापर्यत पोहोचतात. त्यामुळे असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने त्वरित सुरक्षा भिंत उभारणे गरजेचे आहे. तसेच रेल्वे सुरक्षा दलाने आऊटरकडील भागात आरपीएफ जवानांची ड्युटी लावणे गरजेचे आहे.

-बसंत कुमार शुक्ला, महासचिव, भारतीय यात्री केंद्र.