शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

कॉंग्रेसचे नागपुरातील चारही आमदार जयपूरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 11:13 AM

फुटीची भीती असल्याने प्रदेश कॉंग्रेसने सर्व आमदारांना जयपूरला नेण्याचे निश्चित नेले आहे. नागपूर जिल्ह्यातील चारही आमदारांनादेखील जयपूरला तातडीने रवाना होण्यासंदर्भातील निरोप गुरुवारी रात्री उशिरा मिळाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देफोडाफोडीची भीती अशोक चव्हाण व विजय वडेट्टीवारांनी दिला निरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात अद्यापही सत्तास्थापनेच्या दिशेने पावले पडली नसल्याने अस्थिरतेचे वातावरण आहे. अशा स्थितीत फुटीची भीती असल्याने प्रदेश कॉंग्रेसने सर्व आमदारांना जयपूरला नेण्याचे निश्चित नेले आहे. नागपूर जिल्ह्यातील चारही आमदारांनादेखील जयपूरला तातडीने रवाना होण्यासंदर्भातील निरोप गुरुवारी रात्री उशिरा मिळाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.कर्नाटकचा अनुभव काँग्रेसच्या गाठीशी आहे. अशा स्थितीत भाजपाकडून कॉंग्रेसच्या आमदारांना सत्तास्थापनेसाठी फोडण्यात येऊ शकते, अशी कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी भीती आहे. त्यामुळे सर्व आमदारांना एकत्रित एकाच ठिकाणी नेण्यासंदर्भात सूचना आल्या. राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे व त्यामुळे जयपूर हे सुरक्षित स्थान असेल या विचारातून गुरुवारी जयपूरचे नाव निश्चित करण्यात आले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी फोन करुन चारही आमदारांना ही माहिती दिली. पश्चिम नागपुरचे आमदार विकास ठाकरे हे गुरुवारी नागपुरात होते. त्यांनादेखील रात्री उशिरा निरोप मिळाला. शुक्रवारी सकाळी अगोदर नवी दिल्ली व तेथून जयपूरकडे रवाना होणार आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेस