शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

अजनी आणि गोधनी ही दोन रेल्वेची उपस्थानके म्हणून नावारुपाला येतील  - गडकरी

By नरेश डोंगरे | Updated: August 6, 2023 19:28 IST

केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत नागपूर विभागातील १५ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे.

नागपूर : केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत नागपूर विभागातील १५ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे. त्याचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांना विशेषत्वाने होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गोधनी स्थानकावर आज केले.

अमृत भारत स्टेशयोजनेंतर्गत देशातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे करण्यात आला.न या प्रकल्पात महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांचा समावेश असून त्यासाठी दीड हजार कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. या निमित्ताने गोधनी रेल्वे स्थानकावर गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार कृपाल तुमाने, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार प्रवीण दटके, मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक तुषारकांत पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, काटोल, नरखेड येथून मोठ्या प्रमाणात लोक नागपूरला येतात. आधुनिकिकरणामुळे या स्थानकांवर जास्तीत जास्त गाड्यांना थांबा मिळेल. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांची विशेष सोय होणार आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी खास नियोजन करण्यात आले आहे. नागपूरच्या मुख्य रेल्वे स्थानकानंतर आता अजनी आणि गोधनी ही दोन उपस्थानके म्हणून नावारुपाला येतील,’ असेही ते म्हणाले.

रेल्वे मंत्र्यांना मेट्रोचा प्रस्तावनागपूर येथून अमरावती, गोंदिया, वर्धा, नरखेड, वडसा आदी ठिकाणांसाठी मेट्रो रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्र्यांना दिला आहे. त्यांनी या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले. रेल्वे स्थानके विकसित करताना चांगले रस्ते, पार्किंगची व्यवस्था याकडेही आपले लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात उपस्थित स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा सत्कारही यावेळी गडकरींच्या हस्ते करण्यात आला.

ट्रॉली बस चालविणारपुनर्विकासानंतर गोधनी स्थानकाची उपयोगिता वाढविण्यासाठी येथे आउटर रिंग रोडच्या माध्यमातून ट्रॉली बस चालविण्याचा विचारही गडकरींनी बोलून दाखविला. ही बस काटोल आणि एमआयडीसी, हिंगणा येथून चालविली जाईल. 

टॅग्स :nagpurनागपूरNitin Gadkariनितीन गडकरी