शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

एअर इंडियाचे मुंबई-नागपूर विमान ‘लेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:15 AM

एअर इंडियाच्या मुंबई-नागपूर विमानाला शुक्रवारी रात्री येण्यास उशीर झाल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुंसह १५० प्रवासी मुंबई विमानतळावर अडकून पडले. विमानाला विलंब झाल्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर एकच गोंधळ घातला.

ठळक मुद्देप्रवाशांचा गोंधळ : नागपूर-अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुंसह १५० प्रवासी अडकले

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एअर इंडियाच्या मुंबई-नागपूर विमानाला शुक्रवारी रात्री येण्यास उशीर झाल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुंसह १५० प्रवासी मुंबई विमानतळावर अडकून पडले. विमानाला विलंब झाल्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर एकच गोंधळ घातला.वृत्त लिहिपर्यंत एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांना विमान कधी येईल हे सांगितले नाही. परंतु विमानतळावरच रात्र काढावी लागू शकते याचे संकेत प्रवाशांना दिले. अधिकाऱ्यांकडून स्पष्ट उत्तर न मिळाल्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर एकच गोंधळ घातला. मुंबईत राज्यभरातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सहभागी होण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सिद्धार्थविनायक काणे, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर, व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलगुरु डॉ. नामदेव कल्याणकर गेले होते. डॉ. कल्याणकर सायंकाळी ५.३० वाजता दुसºया कंपनीच्या विमानाने मुंबईवरून नागपुरात आले. परंतु डॉ. काणे व डॉ. चांदेकर यांनी एअर इंडियाच्या रात्री ७ वाजताच्या विमानाने नागपूरला येण्याचे ठरविले होते. डॉ. काणे यांनी सांगितले की, त्यांना आधी विमानाला ४५ मिनिट उशीर होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर विमानाला बराच वेळ झाला. दरम्यान विमान रात्री ९.३० वाजता येणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु तरीही विमान आले नाही. प्रवाशांनी गोंधळ घातल्यानंतर त्यांना रात्रीचे जेवण विमानतळावर देण्यात आले. सोबतच विमानतळावर रात्र काढावी लागू शकते असा संकेत प्रवाशांना देण्यात आला. अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी रात्री ११ वाजता विमान येणार असल्याचे सांगितले. वृत्त लिहिपर्यंत विमान आलेले नव्हते.