शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

राज्यातील १० हजार गावात ‘अ‍ॅग्री बिझनेस’ सुरू करणार : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 10:48 PM

शेतकऱ्यांना त्यांचे पीक उत्पादन थेट बाजारात नेता यावे यासाठी राज्य शासनाकडून एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शेतकरी गटांना प्रशिक्षण देऊन राज्यातील दहा हजार गावात ‘अ‍ॅग्री बिझनेस’ सुरू करण्यात येणार आहे. जागतिक बँकेकडून मिळणाऱ्या साडेतीन हजार कोटी रुपयांच्या निधीतून शेतकऱ्यांना विपणन, प्रक्रिया इत्यादींचे इत्थंभूत प्रशिक्षण देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. देशविदेशातील कृषितज्ज्ञ आणि नामांकित कंपन्यांचा समावेश असलेल्या ‘लोकमत’च्या चार दिवसीय ‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’चे शुक्रवारी उद्घाटन झाले. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.

ठळक मुद्देसंत्रानगरीत दुसऱ्या ‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’चे थाटात उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांना त्यांचे पीक उत्पादन थेट बाजारात नेता यावे यासाठी राज्य शासनाकडून एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शेतकरी गटांना प्रशिक्षण देऊन राज्यातील दहा हजार गावात ‘अ‍ॅग्री बिझनेस’ सुरू करण्यात येणार आहे. जागतिक बँकेकडून मिळणाऱ्या साडेतीन हजार कोटी रुपयांच्या निधीतून शेतकऱ्यांना विपणन, प्रक्रिया इत्यादींचे इत्थंभूत प्रशिक्षण देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. देशविदेशातील कृषितज्ज्ञ आणि नामांकित कंपन्यांचा समावेश असलेल्या ‘लोकमत’च्या चार दिवसीय ‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’चे शुक्रवारी उद्घाटन झाले. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.रेशीमबाग मैदान येथे आयोजित या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. याशिवाय केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, ऊर्जा-उत्पादन शुल्क व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ‘यूपीएल’चे अध्यक्ष (कॉर्पोरेट अफेअर व इंडस्ट्री रिलेशन्स) सागर कौशिक, ‘लोकमत’ वृत्तपत्र समुहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, ‘ऑरेंज ग्रोव्हर्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष पी.जी.जगदीश, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर ‘आयसीएआर-सीसीआरआय’चे ( सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट) संचालक डॉ.एम.एस.लदानिया, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास भाले प्रामुख्याने उपस्थित होते. पिकांच्या चक्राच्या व्यवस्थापनाचे ‘डिजिटलायझेशन’ करण्यात येत आहे. ‘महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर’, ‘आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स’ व ‘ड्रोन’च्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना पेरणीपासून ते कापणीपर्यंतचा सल्ला मिळेल. अनेकदा पीक उत्पादन जास्त होते व भाव पडतात. बाजाराचा अंदाज शेतकऱ्यांना यावा यासाठी पिकाचे झालेले उत्पादन, देश व राज्याची क्षमता व बाजारभावांचा अंदाजदेखील व्यक्त करता येऊ शकेल. तंत्रज्ञान अंगिकारून शाश्वत शेतीकडे जाण्याचा हा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले तर देशाची प्रगती होईल. त्यामुळे अशा उपक्रमांचे आयोजन आवश्यक आहे, असे हंसराज अहिर म्हणाले.देशातील प्रत्येक रेल्वे स्थानकावर महाराष्ट्रातील फळांच्या विक्रीचे ‘स्टॉल्स’ लागले पाहिजेत. तसेच संत्राउत्पादक शेतकऱ्यांसाठी वर्षभर उपक्रमांचे आयोजन व्हायला हवे, असे प्रतिपादन विजय दर्डा यांनी प्रास्ताविकादरम्यान केले. श्वेता शेलगावकर यांनी संचालन केले.दिल्ली, मुंबईत शेतकऱ्यांचा आवाज उठवावा : गडकरीआपल्या देशातील शेतकऱ्यांची मोठी समस्या ही आहे की सरकारकडे त्यांच्या हक्कांसाठी हवा तसा आवाज उचलण्यात येत नाही. दिल्ली व मुंबईत शेतकऱ्यांचा आवाज उठविण्यासाठी सक्षम लोकांची संख्या वाढायला हवी, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. संत्र्याची गुणवत्ता वाढविण्यासाठी देशातील शेतकऱ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील यशस्वी संस्था, शेतकऱ्यांशी संवाद साधायला हवा, असेदेखील ते म्हणाले.

 

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरChief Ministerमुख्यमंत्री