शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

अग्निवीर, एक चुकीची संकल्पना; निवृत्त मेजर जनरल कार्डोझोंची स्पष्टोक्ती

By नरेश डोंगरे | Updated: August 27, 2023 23:49 IST

काही सुधारणा आवश्यक : अन्यथा भविष्यात त्रासदायक ठरू शकते

नागपूर : अग्निवीर ही चुकीची संकल्पना असून त्यात काही सुधारणा करणे आवश्यक आहे, असे परखड मत मेजर जनरल (निवृ्त्त) इयान कार्डोझो यांनी रविवारी येथे व्यक्त केले. मेजर जनरल कार्डोझो 'काडतूस साब' म्हणून सर्वत्र ओळखले जातात. लडाख, जम्मू आणि काश्मीर स्टडिजच्या (सीएलजेकेएस) स्थानिक केंद्राने चिटणवीस सेंटर येथे रविवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सीएलजेकेएसच्या अध्यक्ष निवृत्त न्या. मिरा खडक्कार उपस्थित होत्या.

एका सैनिकाला भारतीय सैन्याच्या प्रत्यक्ष कार्याची ओळख होण्यासाठी सुमारे ९ वर्षे लागतात. मात्र, अग्निवीरांसाठी हा कालावधी फक्त चार वर्षांचा आहे. त्यामुळे ते भविष्यात त्रासदायक ठरू शकते. यामुळे भाडोत्री सैनिक विकसित होऊ शकतात आणि आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी ते घातक ठरू शकते, अशी भीतीही कार्डोझो यांनी व्यक्त केली. श्रोत्यांमध्ये बसलेले लेफ्टनंट जनरल (निवृत्त) गद्रे यांनीही मेजर जनरल कार्डोझो यांच्या मतांचे समर्थन केले.कार्यक्रमात श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, कार्डोझो यांनी अग्निवीरांच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, कॉर्पोरेट कंपन्या या सैनिकांना सामावून घेण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे शेवटी त्यांच्यापैकी काही जण सुरक्षा रक्षक आणि इतर तत्सम नोकऱ्या करतील.

मेजर जनरल इयान कार्डोझो हे पहिले अधिकारी आहेत ज्यांनी कमांड आणि नंतर ब्रिगेडचे नेतृत्व केले. काडतूस साब, मेजर जनरल कार्डोझो हे नाव त्यांच्या 'पल्टन' - ४ थी बटालियन आणि ५ गोरखा रेजिमेंटवरून मिळाले. त्यांनी त्यांच्या जीवनातील काही प्रेरणादायी किस्सेही सांगितले. त्यानुसार कार्डोझो १९६२ च्या भारत-चीन युद्धात आणि १९६५ तसेच १९७१ मध्ये पाकिस्तानशी युद्ध लढले.

बांगलादेश मुक्तिसंग्रामातील युद्धकाळातील एक किस्सा सांगताना कार्डोझो म्हणाले की, आमच्या तुलनेत पूर्वेकडे पाकी सैन्याची मोठी तैनाती होती. मात्र, एका बातमीमुळे पाकिस्तानी सैन्यात गोंधळ माजला. या युद्धादरम्यान, कार्डोझोने चुकून भूसुरुंगावर पाऊल ठेवले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. पुरेशी वैद्यकीय मदत न मिळाल्याने काडतूस साब यांनी खुकरी काढून पाय कापला. ही घटना प्रत्येकाला शौर्यकारक वाटली तरी जनरल यांना याबद्दल अधिक बोलणे आवडत नाही. त्यामागचे कारण स्पष्ट करताना त्यांनी अशी वीर कृत्ये सैनिक नेहमीच करीत असतात, अशी भावना व्यक्त केली. कार्डोझो यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि एनसीसी कॅडेट्सना यशाचा मंत्र देताना म्हटले, 'तुम्हाला जे आवडते ते करा; तुम्ही जे करता त्यावर प्रेम करा; कधीही घाबरू नका आणि कधीही हार मानू नका'.

युद्धादरम्यानचा मानवतावाद

त्याच्या अपघाताशी संबंधित एक भावनिक किस्सा सांगताना, कार्डोझो म्हणाले, युद्धादरम्यान भूसुरुंगावर पाय ठेवल्याने पायाला गंभीर दुखापत झाली. यावेळी पाकिस्तानी लष्करातील डॉक्टरांकडून वैद्यकीय उपचार घेतले. त्याचे नाव मोहम्मद बशीर होते. डॉक्टर असल्याने त्यांनी मला आधी रुग्ण आणि उपचार केल्यानंतर शत्रू मानले. या घटनेमुळे आपण खूप काही शिकलो. त्यानंतर आयुष्यात अनेक चांगले बदल घडले. अपंगांसाठी काम करण्याची प्रेरणाही मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानnagpurनागपूरAgneepath Schemeअग्निपथ योजना