शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अग्निवीर, एक चुकीची संकल्पना; निवृत्त मेजर जनरल कार्डोझोंची स्पष्टोक्ती

By नरेश डोंगरे | Updated: August 27, 2023 23:49 IST

काही सुधारणा आवश्यक : अन्यथा भविष्यात त्रासदायक ठरू शकते

नागपूर : अग्निवीर ही चुकीची संकल्पना असून त्यात काही सुधारणा करणे आवश्यक आहे, असे परखड मत मेजर जनरल (निवृ्त्त) इयान कार्डोझो यांनी रविवारी येथे व्यक्त केले. मेजर जनरल कार्डोझो 'काडतूस साब' म्हणून सर्वत्र ओळखले जातात. लडाख, जम्मू आणि काश्मीर स्टडिजच्या (सीएलजेकेएस) स्थानिक केंद्राने चिटणवीस सेंटर येथे रविवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सीएलजेकेएसच्या अध्यक्ष निवृत्त न्या. मिरा खडक्कार उपस्थित होत्या.

एका सैनिकाला भारतीय सैन्याच्या प्रत्यक्ष कार्याची ओळख होण्यासाठी सुमारे ९ वर्षे लागतात. मात्र, अग्निवीरांसाठी हा कालावधी फक्त चार वर्षांचा आहे. त्यामुळे ते भविष्यात त्रासदायक ठरू शकते. यामुळे भाडोत्री सैनिक विकसित होऊ शकतात आणि आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी ते घातक ठरू शकते, अशी भीतीही कार्डोझो यांनी व्यक्त केली. श्रोत्यांमध्ये बसलेले लेफ्टनंट जनरल (निवृत्त) गद्रे यांनीही मेजर जनरल कार्डोझो यांच्या मतांचे समर्थन केले.कार्यक्रमात श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, कार्डोझो यांनी अग्निवीरांच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, कॉर्पोरेट कंपन्या या सैनिकांना सामावून घेण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे शेवटी त्यांच्यापैकी काही जण सुरक्षा रक्षक आणि इतर तत्सम नोकऱ्या करतील.

मेजर जनरल इयान कार्डोझो हे पहिले अधिकारी आहेत ज्यांनी कमांड आणि नंतर ब्रिगेडचे नेतृत्व केले. काडतूस साब, मेजर जनरल कार्डोझो हे नाव त्यांच्या 'पल्टन' - ४ थी बटालियन आणि ५ गोरखा रेजिमेंटवरून मिळाले. त्यांनी त्यांच्या जीवनातील काही प्रेरणादायी किस्सेही सांगितले. त्यानुसार कार्डोझो १९६२ च्या भारत-चीन युद्धात आणि १९६५ तसेच १९७१ मध्ये पाकिस्तानशी युद्ध लढले.

बांगलादेश मुक्तिसंग्रामातील युद्धकाळातील एक किस्सा सांगताना कार्डोझो म्हणाले की, आमच्या तुलनेत पूर्वेकडे पाकी सैन्याची मोठी तैनाती होती. मात्र, एका बातमीमुळे पाकिस्तानी सैन्यात गोंधळ माजला. या युद्धादरम्यान, कार्डोझोने चुकून भूसुरुंगावर पाऊल ठेवले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. पुरेशी वैद्यकीय मदत न मिळाल्याने काडतूस साब यांनी खुकरी काढून पाय कापला. ही घटना प्रत्येकाला शौर्यकारक वाटली तरी जनरल यांना याबद्दल अधिक बोलणे आवडत नाही. त्यामागचे कारण स्पष्ट करताना त्यांनी अशी वीर कृत्ये सैनिक नेहमीच करीत असतात, अशी भावना व्यक्त केली. कार्डोझो यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि एनसीसी कॅडेट्सना यशाचा मंत्र देताना म्हटले, 'तुम्हाला जे आवडते ते करा; तुम्ही जे करता त्यावर प्रेम करा; कधीही घाबरू नका आणि कधीही हार मानू नका'.

युद्धादरम्यानचा मानवतावाद

त्याच्या अपघाताशी संबंधित एक भावनिक किस्सा सांगताना, कार्डोझो म्हणाले, युद्धादरम्यान भूसुरुंगावर पाय ठेवल्याने पायाला गंभीर दुखापत झाली. यावेळी पाकिस्तानी लष्करातील डॉक्टरांकडून वैद्यकीय उपचार घेतले. त्याचे नाव मोहम्मद बशीर होते. डॉक्टर असल्याने त्यांनी मला आधी रुग्ण आणि उपचार केल्यानंतर शत्रू मानले. या घटनेमुळे आपण खूप काही शिकलो. त्यानंतर आयुष्यात अनेक चांगले बदल घडले. अपंगांसाठी काम करण्याची प्रेरणाही मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानnagpurनागपूरAgneepath Schemeअग्निपथ योजना