शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
4
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
5
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
6
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
7
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
8
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
9
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
10
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
11
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
12
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
13
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
14
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
15
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
16
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
17
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
18
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
19
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
20
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण

धनगर समाजाचा आरक्षणासाठी एल्गार; नागपूर-वर्धा महामार्गावर रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 11:20 AM

राज्यात मराठा आंदोलनानंतर धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे. सोमवारी नागपूर-वर्धा महामार्गावर डोंगरगाव येथे धनगर समाज संघर्ष समिती नागपूर जिल्ह्याच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला.

ठळक मुद्देरस्त्यावर मेंढ्या सोडल्या सरकारविरोधात भाजप खासदार रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात मराठा आंदोलनानंतर धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे. सोमवारी नागपूर-वर्धा महामार्गावर डोंगरगाव येथे धनगर समाज संघर्ष समिती नागपूर जिल्ह्याच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक खा. डॉ. विकास महात्मे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने धनगर समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर मेंढ्या सोडल्याने नागपूर-वर्धा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी खोळंबली.राज्यातील धनगर जमातीस अनुसूचित जमातीच्या सवलतीच्या अंमलबजावणी करण्यासासाठी अनेक आंदोलन, मोर्चे आणि मेळाव्याद्वारे शासनाचे आजवर वेळोवेळी लक्ष वेधण्यात आले. मात्र चार वर्षांचा कालावधी होऊनही आरक्षणाच्या अंमलबजावणीचे शिफारस पत्र राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठविले नसल्याची माहिती यावेळी खा. महात्मे यांनी दिली. धनगर आरक्षण अंमलबजावणी करण्यास शासनाने विलंब केल्यास पुढील काळात धनगर समाजातर्फे राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा महात्मे यांनी याप्रसंगी दिला. शासनाच्या दुर्लक्षामुळे समाजात संतापधनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊनही शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने धनगर समजात तीव्र संताप पसरला आहे. सोमवारी महाराष्ट्र धनगर समाज महासंघातर्फे प्रदेश सचिव युवराज घोडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.धनगर समाजाला संविधानाने आरक्षण दिले आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजाचा उल्लेख संविधानाच्या परिशिष्ट-२ मधील अनुसूचित जमाती (एसटी)च्या यादीमध्ये ३६ व्या क्रमांकावर आहे, तरीही महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही. अनुसूचित जमातीच्या सुविधा मिळत नसल्याने समाज मूलभूत अधिकारांपासून वंचित राहिला आहे. त्यामुळे धनगर समाज आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततेने आंदोलन करीत आहे, असे घोडे यांनी सांगितले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी बारामती येथे घोषणा केली होती, की त्यांचे सरकार येताच कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत धनगर समाजाला आरक्षणाची सुविधा देण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्यात येईल. त्यांचे सरकार येऊन चार वर्षे झाली. परंतु राज्य सरकारने आतापर्यंत कुठलीही कारवाई केली नाही. तेव्हा दिलेले आश्वासन तातडीने पूर्ण करावे, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

टॅग्स :agitationआंदोलन