शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
4
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
5
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
6
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
7
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
8
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
9
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
10
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
11
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
12
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
13
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
14
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
15
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
16
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
17
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
18
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
19
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
20
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर

आगरकरांचा विवेकवाद आजही प्रासंगिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:20 PM

समाजसुधारक विचारवंत गोपाळ गणेश आगरकर यांनी मांडलेल्या बुद्धिप्रामाण्यवाद आणि विवेकवाद या तत्त्वांची प्रासंगिकता आजच्या विचारअंताच्या काळात विशेषत्वाने जाणवते, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी केले.

ठळक मुद्देअ.ना.देशपांडे स्मृती व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकोणविसाव्या व विसाव्या शतकातील भारताच्या जडणघडणीत अत्यंत मोलाची भूमिका बजावणारे समाजसुधारक विचारवंत गोपाळ गणेश आगरकर यांनी मांडलेल्या बुद्धिप्रामाण्यवाद आणि विवेकवाद या तत्त्वांची प्रासंगिकता आजच्या विचारअंताच्या काळात विशेषत्वाने जाणवते, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी केले.अ.ना.देशपांडे स्मृती समितीतर्फे आयोजित अ.ना.देशपांडे व्याख्यानमालेचे यावर्षीचे २६ वे पुष्प गुंफताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य म.पांडे, कार्याध्यक्ष डॉ. वि.स.जोग, कार्यवाह डॉ. राजेंद्र नाईकवाडे हे उपस्थित होते. हिंदी मोरभवनच्या उत्कर्ष सभागृहात अनादेंच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हे व्याख्यानसत्र पार पडले.डॉ. लेंडे यांनी भारतीय धर्मसंस्कृती-परंपरांची बुद्धिप्रामाण्यवादी व विवेकवादी दृष्टीने केलेली परखड चिकित्सा, त्यांच्यावरील पाश्चात्य विचारकांचा प्रभाव, त्यांची अद्वितीय स्वरूपाची ज्ञानलालसा, अत्यंत विपरीत व कष्टमय परिस्थितीत त्यांनी केसरी व सुधारक वृत्तपत्रातून केलेले समाजप्रबोधन या साऱ्या पैलूंवर अभ्यासपूर्ण भाष्य केले. प्राचार्य पांडे यांनी, आगरकरांच्या जीवनातील इंदूर संस्थानाची भरपूर पगाराची नोकरी नाकारण्याचा प्रसंग तसेच इतर काही प्रसंगांच्या आधारे त्यांची नि:स्पृहवृत्ती, बाणेदारपणा व तत्त्वनिष्ठा यांचे महत्त्व कथन केले. माधव देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. मधुरा देशपांडे यांच्या गीताने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. कृष्णा साकुळकर व संचालन डॉ. दिनेश खुरगे यांनी केले. यावेळी प्रकाश एदलाबादकर, डॉ. अरविंद जोशी, प्रा. प्रमोद सोवनी, माधुरी साकुळकर, डॉ. अजय कुळकर्णी, मुकुंद पाचखेडे आदी उपस्थिती होती.

टॅग्स :Socialसामाजिक