शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल २८ वर्षानंतर ‘पेडीकॉन’ परिषद नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:21 IST

भारतीय बालरोग अकादमीच्यावतीने बालरोग व नवजात शिशु रोगांमधील नवीन शोध, नव्या चिकित्सा पद्धतीची माहिती बालरोग तज्ज्ञापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने दरवर्षी ‘पेडीकॉन’ परिषदेचे आयोजन करण्यात येते. नागपुरात १९९२ नंतर पुन्हा एकदा या परिषदेचे आयोजन करण्याचा मान बालरोग अकादमी नागपूरला मिळाला आहे.

ठळक मुद्दे५५वी भारतीय बालरोग परिषद गुरुवारपासून : बालरोग अकादमीचा पुढाकार

आॅनलाईन लोकमतनागपूर : भारतीय बालरोग अकादमीच्यावतीने बालरोग व नवजात शिशु रोगांमधील नवीन शोध, नव्या चिकित्सा पद्धतीची माहिती बालरोग तज्ज्ञापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने दरवर्षी ‘पेडीकॉन’ परिषदेचे आयोजन करण्यात येते. नागपुरात १९९२ नंतर पुन्हा एकदा या परिषदेचे आयोजन करण्याचा मान बालरोग अकादमी नागपूरला मिळाला आहे. ४ जानेवारीला ५५वी भारतीय बालरोग परिषदेचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल. परिषदेला १० हजारावर डॉक्टर सहभागी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती या परिषदेचे आयोजन सचिव डॉ. जयंत उपाध्ये यांनी पत्रपरिषदेत दिली.या वेळी परिषदेचे मुख्य आश्रयदाता डॉ. उदय बोधनकर, मुख्य आयोजन अध्यक्ष डॉ. वसंत खळतकर, डॉ. सुचित बागडे व डॉ अविनाश गावंडे उपस्थित होते.डॉ. उदय बोधनकर म्हणाले, २८ वर्षानंतर ही परिषद नागपूरला होत आहे. ही परिषद ‘हेल्दी न्यूबॉर्न-हॅपी टीन’ या संकल्पनेवर आधारित आहे. या परिषदेत देशातून बालरोगतज्ज्ञ सहभागी होतील. याशिवाय पाश्च्यात्त देशातून १७ विशेषज्ञ सहभागी होणार आहे. यामुळे चार दिवस चालणाºया परिषदेत बालरोग संदर्भातील नव्या संशोधनाची, अनुभवांची व कौशल्यांच्या माहितीचे आदानप्रदान होईल. डॉ. वसंत खळतकर म्हणाले, ४ ते ७ जानेवारी दरम्यान ही परिषद रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहासह परिसरातील आठ सभागृहात एकाचवेळी चालेल. डॉ. बागडे म्हणाले, या परिषदेत परिचारिकांसाठी कार्यशाळा, योग शिबिर आणि ‘वॉकथॉन’चे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे.पत्रपरिषदेला डॉ. सी.एम. बोकडे, डॉ. संजय देशमुख, डॉ. महीब हक, डॉ. रिषी लोढया, डॉ. संजय मराठे, डॉ. मिलिंद मंडलिक, डॉ.कृतिश बालपांडे, डॉ.गिरीश चरडे, डॉ. यशवंत पाटील, डॉ. अनिल जयस्वाल, डॉ. मीनाक्षी गिरीश, डॉ. चेतन शेंडे व डॉ.प्रवीण डहाके उपस्थित होते.शैक्षणिक दर्जा उंचावलेल्या राज्यात बालमृत्यूचे प्रमाण कमीडॉ. वसंत खळतकर म्हणाले, सर्वात कमी बालमृत्यूंचे प्रमाण केरळ आणि तामिळनाडू राज्यांमध्ये आहे. ज्या राज्याचा शैक्षणिक दर्जा उंचावलेला त्या राज्यात बालमृत्यूचे प्रमाण कमी आहे. राज्यातील डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, एएनएम व आशा कार्यकर्ती या सर्वांच्या प्रयत्नांमुळे बालमृत्यूची टक्केवारी आणखी कमी करणे शक्य आहे. विशेषत: ग्रामीण व दुर्गम भागातील पॅरामेडिकल स्टाफ, एएनएम, आशा कार्यकर्तींना योग्य प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर