शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

तब्बल २८ वर्षानंतर ‘पेडीकॉन’ परिषद नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:21 IST

भारतीय बालरोग अकादमीच्यावतीने बालरोग व नवजात शिशु रोगांमधील नवीन शोध, नव्या चिकित्सा पद्धतीची माहिती बालरोग तज्ज्ञापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने दरवर्षी ‘पेडीकॉन’ परिषदेचे आयोजन करण्यात येते. नागपुरात १९९२ नंतर पुन्हा एकदा या परिषदेचे आयोजन करण्याचा मान बालरोग अकादमी नागपूरला मिळाला आहे.

ठळक मुद्दे५५वी भारतीय बालरोग परिषद गुरुवारपासून : बालरोग अकादमीचा पुढाकार

आॅनलाईन लोकमतनागपूर : भारतीय बालरोग अकादमीच्यावतीने बालरोग व नवजात शिशु रोगांमधील नवीन शोध, नव्या चिकित्सा पद्धतीची माहिती बालरोग तज्ज्ञापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने दरवर्षी ‘पेडीकॉन’ परिषदेचे आयोजन करण्यात येते. नागपुरात १९९२ नंतर पुन्हा एकदा या परिषदेचे आयोजन करण्याचा मान बालरोग अकादमी नागपूरला मिळाला आहे. ४ जानेवारीला ५५वी भारतीय बालरोग परिषदेचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल. परिषदेला १० हजारावर डॉक्टर सहभागी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती या परिषदेचे आयोजन सचिव डॉ. जयंत उपाध्ये यांनी पत्रपरिषदेत दिली.या वेळी परिषदेचे मुख्य आश्रयदाता डॉ. उदय बोधनकर, मुख्य आयोजन अध्यक्ष डॉ. वसंत खळतकर, डॉ. सुचित बागडे व डॉ अविनाश गावंडे उपस्थित होते.डॉ. उदय बोधनकर म्हणाले, २८ वर्षानंतर ही परिषद नागपूरला होत आहे. ही परिषद ‘हेल्दी न्यूबॉर्न-हॅपी टीन’ या संकल्पनेवर आधारित आहे. या परिषदेत देशातून बालरोगतज्ज्ञ सहभागी होतील. याशिवाय पाश्च्यात्त देशातून १७ विशेषज्ञ सहभागी होणार आहे. यामुळे चार दिवस चालणाºया परिषदेत बालरोग संदर्भातील नव्या संशोधनाची, अनुभवांची व कौशल्यांच्या माहितीचे आदानप्रदान होईल. डॉ. वसंत खळतकर म्हणाले, ४ ते ७ जानेवारी दरम्यान ही परिषद रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहासह परिसरातील आठ सभागृहात एकाचवेळी चालेल. डॉ. बागडे म्हणाले, या परिषदेत परिचारिकांसाठी कार्यशाळा, योग शिबिर आणि ‘वॉकथॉन’चे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे.पत्रपरिषदेला डॉ. सी.एम. बोकडे, डॉ. संजय देशमुख, डॉ. महीब हक, डॉ. रिषी लोढया, डॉ. संजय मराठे, डॉ. मिलिंद मंडलिक, डॉ.कृतिश बालपांडे, डॉ.गिरीश चरडे, डॉ. यशवंत पाटील, डॉ. अनिल जयस्वाल, डॉ. मीनाक्षी गिरीश, डॉ. चेतन शेंडे व डॉ.प्रवीण डहाके उपस्थित होते.शैक्षणिक दर्जा उंचावलेल्या राज्यात बालमृत्यूचे प्रमाण कमीडॉ. वसंत खळतकर म्हणाले, सर्वात कमी बालमृत्यूंचे प्रमाण केरळ आणि तामिळनाडू राज्यांमध्ये आहे. ज्या राज्याचा शैक्षणिक दर्जा उंचावलेला त्या राज्यात बालमृत्यूचे प्रमाण कमी आहे. राज्यातील डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, एएनएम व आशा कार्यकर्ती या सर्वांच्या प्रयत्नांमुळे बालमृत्यूची टक्केवारी आणखी कमी करणे शक्य आहे. विशेषत: ग्रामीण व दुर्गम भागातील पॅरामेडिकल स्टाफ, एएनएम, आशा कार्यकर्तींना योग्य प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर