शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
3
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
4
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
5
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
6
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत
7
“RSS चा स्वयंसेवक होतो, पुन्हा संघटनेत काम करायला तयार आहे”; हायकोर्ट जजने थेट सांगितले
8
कतरिना कैफही आहे गरोदर? ओव्हरकोट ड्रेसमध्ये दिसला बेबीबंप; नवऱ्यासोबत लंडनमध्ये फेरफटका
9
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली
10
'कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले'; पोलिसांवरील आरोपांनंतर पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
11
वडिलांना वाढदिवसाचे सरप्राइज द्यायचे राहिले, त्या आधीच देवाने...! ससूनच्या शवागारात आईचा आक्रोश
12
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
13
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
14
'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर
15
"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत
16
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
17
₹३३९ वरून ₹४८३० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर, PM मोदींनीही केलेला उल्लेख 
18
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
19
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
20
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 

सौदी अरेबियात घडला अपघात : मृत मुलाच्या पार्थिवाची कुटुंबीयांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 9:41 PM

सौदी अरेबियातील दम्माम येथे कमर्शियल शीपवर झालेल्या अपघातात नागपुरातील एका युवकाचा मृत्यू झाला. अपघाताला आठ दिवस लोटूनही त्याचा मृतदेह अद्याप कुटुंबीयांना मिळाला नाही. त्यामुळे मुलाच्या पार्थिवासाठी वडिलांनी सौदी अरेबिया व भारत सरकारला साद घातली आहे. मात्र चौकशीच्या नावावर सौदी अरेबियाने पार्थिव परत दिलेले नाही.

ठळक मुद्देवडिलांची सरकारला साद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सौदी अरेबियातील दम्माम येथे कमर्शियल शीपवर झालेल्या अपघातात नागपुरातील एका युवकाचा मृत्यू झाला. अपघाताला आठ दिवस लोटूनही त्याचा मृतदेह अद्याप कुटुंबीयांना मिळाला नाही. त्यामुळे मुलाच्या पार्थिवासाठी वडिलांनी सौदी अरेबिया व भारत सरकारला साद घातली आहे. मात्र चौकशीच्या नावावर सौदी अरेबियाने पार्थिव परत दिलेले नाही.लव शर्मा असे मृत युवकाचे नाव आहे. राजीव शर्मा त्याचे वडील आहेत. ते क्लार्क टाऊन येथे राहतात. लव हा सौदी अरेबिया येथील दम्मामच्या बहारी ड्राय बल्क कंपनीत मुख्य अधिकारी म्हणून कार्यरत होता. या कंपनीने लव शर्माला नियुक्त केले होते. बहारी बल्क या जहाजावर लव शर्मा १८ नोव्हेंबर २०१८ पासून कार्यरत होता. दरम्यान दरम्यान, २४ फेब्रुवारी रोजी जहाजावरील कार्गो एरियात कंटेनर लोडिंग करीत असताना अपघात झाला. त्यात लव शर्मा याच्यासह दोघेजण गंभीर जखमी झाले. त्या तिघांनाही सौदी अरेबियातील रूग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तिथे त्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेची माहिती नागपुरातील शर्मा कुटुंबीयांना सौदी अरेबियातील कंपनीने दिली. तरुण मुलाचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याचे कळताच शर्मा कुटुंबीयांवर आभाळ कोसळले. लव हा या कुटुंबाचा थोरला मुलगा आहे. मर्चंट नेव्हीत करिअर करण्याचा त्याने निर्णय घेतला होता. मुंबईतील कंपनीमार्फत त्याला सौदी अरेबियात नोकरी मिळाली होती. त्यामुळे शर्मा कुटुंबीय आनंदात होते. मात्र, अचानक लव शर्मावर काळाने झडप घातली.मुलाच्या मृत्यूने हादरलेल्या शर्मा कुटुंबीयांना मुंबईतील कंपनी लव शर्माचे पार्थिव मुंबईत आणणार असल्याचे कळविले होते. त्यासाठीचा सर्व खर्च व प्रशासकीय प्रक्रिया कंपनीकडून करण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते. त्यामुळे राजीव शर्मा हे मुंबईत दाखल झाले. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून ते मुंबईत मुलाच्या पार्थिवाची प्रतीक्षा करीत आहे. सौदी अरेबियाच्या सरकारने कार्गो जहाजात झालेल्या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याची चौकशी पूर्ण झाल्याशिवाय लव शर्माचे पार्थिव सोपवणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राजीव शर्मा यांनी परराष्ट्र मंत्रालय आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना याप्रकरणात मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे.

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाAccidentअपघात