शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

नागपूर-भंडारा रोडवर भीषण अपघात; चार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 10:41 AM

नागपूर भंडारा मार्गावर असलेल्या मौदाजवळ शनिवारी पहाटे ५.१५ च्या सुमारास रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरला एका ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: लग्न सोहळा आटोपून नागपूरकडे व-हाड घेऊन निघालेली खासगी प्रवासी बस (ट्रॅव्हल्स) उभ्या कंटेनरवर आदळल्याने ४ ठार तर १३ व-हाडी जबर जखमी झाले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर शनिवारी पहाटे ४. ४५ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. अपघातात ठार झालेल्यामध्ये वराच्या आजीचा देखिल समावेश आहे. या भीषण अपघाताने लग्नाच्या आनंदावर विरजण पडले आहे. पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस शिपायी अमित प्रवीण झिलपे यांचा विवाह सोहळा शुक्रवारी रात्री गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे पार पडला. वर-वधूला घेऊन त्यांचे नातेवाईक आणि व-हाडी मंडळी ट्रॅव्हल्सने (एमएच ३१/ सीक्यू ८५४८) ने पहाटे २. ३० ला नागपूरकडे निघाले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरून बस वेगात नागपूरकडे येत होती. मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंगोरी गावाजवळ एक कंटेनर (एमएच ४९/ एटी ३८५५) उभा होता. वेगात असलेली बस कंटेनरवर आदळली. त्यामुळे बसमध्ये असलेल्या वराच्या आजी  विठाबाई तुकाराम झिलपे (वय ७२), करुणा विजय खोंडे (वय ५८), आनंद रमेश आठवले (वय २८, सर्व रा. नागपूर) आणि सतीश जांभुळकर (वय ३५, रा. गोंदिया) या चौघांचा मृत्यू झाला. बसमध्ये एकूण ३० ते ३५ प्रवासी होते. त्यातील  १३ प्रवासी जबर जखमी झाले.  ज्यावेळी अपघात घडला त्यावेळी बहुतांश व-हाडी साखरझोपेत होती. अपघातानंतर मोठा आवाज होऊन जोरदार धक्का लागल्याने प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. एकमेकांच्या अंगावर पडल्याने नेमके काय झाले, हे काही क्षण अनेकांना कळलेच नाही. नंतर अपघात घडल्याचे लक्षात आले. वर अमित यांचे काका अरविंद तुकाराम झिलपे (वय ४९) हे नागपूरला पोलीस हवालदार आहेत. ते गुन्हेशाखेत सेवारत आहेत. त्यांनी तसेच सोबतच्या मंडळींनी लगेच १०० क्रमांकावर फोन करून पोलिसांना अपघाताची माहिती कळवली.अवघा गावच मदतीला धावलाअपघातामुळे एवढा मोठा आवाज झाला की सिंगोरीवासियांची झोपच उडाली. गावक-यांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली. जखमींना बसमधून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, या अपघातामुळे या महामार्गावरची वाहतूक रोखली गेली. दोन्ही बाजुला वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या. 

त्यामुळे अपघातग्रस्तांच्या मदतीला आलेले भंडारा अन् मौदा पोलीस तसेच अ‍ॅम्बुलन्सही वाहनांच्या गर्दीत अडकली. बराच वेळ ईकडे तिकडे केल्यानंतर अ‍ॅम्बुलन्स डाव्या बाजुने काढून जखमीजवळ पोहचवण्यात आली. त्यानंतर तीन अ‍ॅम्बुलन्स मध्ये जखमींना आधी भंडारा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. तर अन्य दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना नागपूरला पाठविण्यात आले. मेयोतील डॉक्टरांनी येथे आणलेल्यांपैकी दोघांना मृत घोषित केले. 

बसचालक पळालाहा अपघात एवढा भीषण होता की बसची डावी बाजू कंटेनरमुळे कापत गेली. अपघातानंतर निर्माण झालेल्या गोंधळात बसचालक खाली उडी मारून पळून गेला. दुपारी २. ३० वाजेपर्यंत तो कुठे गेला, कसा आहे, त्याबाबत पोलीस माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. या अपघाताचे कारण स्पष्ट झाले नाही. बसचालक दारूच्या नशेत होता का, ते देखिल स्पष्ट झाले नाही. मात्र, त्याला झपकी आली असावी अन् त्यामुळे हा अपघात घडला असावा, असा अंदाज आहे.  

टॅग्स :Accidentअपघात