शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

नागपूर विद्यापीठात अभाविपचा गोंधळ : परिसरात तोडफोड, दोन सुरक्षारक्षक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 10:38 PM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शुक्रवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ केला. सोबतच विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार, प्र-कुलगुरू कार्यालय प्रवेशद्वार व कुलसचिव कार्यालयात तोडफोड केली. कार्यकर्त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करणारे महाराष्ट्र सुरक्षा दलाचे दोन सुरक्षारक्षक जखमी झाले.

ठळक मुद्देपूनर्मूल्यांकनाच्या मागणीसाठी केले आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शुक्रवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ केला. सोबतच विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार, प्र-कुलगुरू कार्यालय प्रवेशद्वार व कुलसचिव कार्यालयात तोडफोड केली. कार्यकर्त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करणारे महाराष्ट्र सुरक्षा दलाचे दोन सुरक्षारक्षक जखमी झाले.विद्यापीठाच्या बीकॉम अभ्यासक्रमाच्या पाचव्या व तिसऱ्या सत्राचे निकाल लागलेले नाहीत. सोबतच पहिल्या सत्राचे निकाल संकेतस्थळावर दाखविण्यात येत नाहीत. सोबतच बीकॉमच्या अभ्यासक्रमात परीक्षेच्या अगोदर बदल करण्यात आले आहेत. तसेच पूनर्मूल्यांकनाच्या संदर्भात विद्यार्थ्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मन:स्ताप होत असल्याचा आरोप करत ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात दुपारच्या वेळी धडक दिली. यावेळी सुरक्षेच्या कारणावरुन विद्यार्थ्यांना थांबविण्यात आले. संतापलेल्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. काही कार्यकर्त्यांनी तोडफोड केली असल्याचा आरोप सुरक्षारक्षकांतर्फे करण्यात आला. बरेच विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी तर दीक्षांत सभागृहातच घोषणा दिल्या.‘अभाविप’चा सुरक्षारक्षकांवरच आरोपदुसरीकडे ‘अभाविप’चे महानगर मंत्री वैभव बावनकर यांनी सुरक्षारक्षकांवरच आरोप केले आहेत. शांततेने निवेदन द्यायला जात असताना सुरक्षारक्षकांनी कार्यकर्त्यांना प्रवेशद्वारावर थांबविले. त्यानंतर कार्यकर्त्यांसोबत धक्काबुक्की करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान ‘अभाविप’च्या मागण्याचा सकारात्मक विचार करुन त्यांना मंजूर करण्याचे आश्वासन प्रभारी कुलसचिवांनी दिले असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. यावेळी विधीसभा सदस्य विष्णू चांगदे, वामन तुरके हेदेखील उपस्थित होते.पोलिसांनी घेतली बघ्याची भूमिकादरम्यान हा गोंधळ होत असताना विद्यापीठात पोलीस कर्मचारीदेखील उपस्थित होते. मात्र त्यांनी कुठलीही मध्यस्थी केली नाही. गोंधळ घालणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रभारी कुलसचिव डॉ.निरज खटी यांनी सांगितले. मात्र पोलीस तक्रार करण्याबाबत प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीagitationआंदोलन