शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

‘अबकी बार, किसान सरकार’; तेलंगणा मॉडेल महाराष्ट्रात लागू होत नाही तोवर लढू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2023 19:33 IST

Nagpur News जोवर तेलंगणा मॉडेल महाराष्ट्रात लागू होत नाही तोवर आपण येथे लढू, अशी घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे संस्थापक अध्यक्ष के.चंद्रशेखर राव यांनी केली.

नागपूर : तेलगंणात शेतकऱ्यांना वीज व पाणी मोफत दिले जाते. सरकारतर्फे योग्य दरात शंभर टक्के कषी उत्पादनांची खरेदी केली जाते. त्यामुळे तेथे आत्महत्या थांबल्या आहेत. महाराष्ट्रात वीज निर्मितीसाठी लागणारे कोळशाचे साठे मुबलक आहेत. नद्यांची संख्याही मोठी आहे. असे असतानाही येथील शेतकऱ्यांना वीज व पाणी मिळत नाही. जोवर तेलंगणा मॉडेल महाराष्ट्रात लागू होत नाही तोवर आपण येथे लढू, अशी घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे संस्थापक अध्यक्ष के.चंद्रशेखर राव यांनी केली. 

बीआरएसच्या महाराष्ट्रातील पहिल्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या गुरुवारी झाले. यानंतर सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात राव यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी मोठ्या प्रमाणात विदर्भातील नेते व प्रमुख कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश घेतला. मेळाव्याला माजी खा, हरिभाऊ राठोड, माजी आ. चरण वाघमारे, माजी आ. राजू तोडसाम, माजी सनदी अधिकारी टी.चंद्रशेखर, प्रदेश अध्यक्ष माणिकराव कदम, शंकर अण्णा, विठ्ठल नाईक, प्रकाश पोहरे, प्रा. ज्ञानेश वाकुडकर आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री राव म्हणाले, देशात पावसाच्या रुपात पडणारे ५० हजार टीएमसी पाणी समुद्रांमध्ये वाहून जाते. दुसरीकडे शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी मिळत नाही. हे चित्र बदलायचे असेल तर सर्वप्रथम आपले राष्ट्रीय जलधोरण बंगालच्या खाडीत फेकून देत नवे जलधोरण आखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

माजी आ. चरण वाघमारे म्हणाले, गुजरात मॉडेल फसवे निघाले. आपण गेल्या आठ वर्षात तेलंगणाचा झालेला विकास पाहिला. त्यामुळेच आपण तेलंगणा मॉडेल स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. माजी खा. हरिभाऊ राठोड यांनी तेलंगणाच्या धर्तीवर स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मीतीची मागणी केली.

बीआरएस प्रत्येक निवडणूक लढेल

- महाराष्ट्रात जवळपास सर्वच प्रमुख पक्षांना सत्तेची संधी मिळाली. मग त्यांनी परिवर्त का घडविले नाही ? चांगले काम करणाऱ्यांना जनता संधी देते. बीआरएस हे भारत परिवर्तनाचे मिशन आहे. परिवर्तनासाठी बीआरएस प्रत्येक निवडणूक लढेल, अशी घोषणा करीत ‘अबकी बार, किसान सरकार’चा नारा मुख्यमंत्री राव यांनी दिला. गुलाबी वादळ महाराष्ट्रात दाखल झाले असून येथे पक्षाला विजय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुणे व मुंबईतही पक्षाच्या कार्यालय सुरू करण्याची घोषणात्यांनी केली. पुढील काळात आपण मध्य प्रदेशातही जाणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीसाठी जाती-धर्मावरून फूट पाडणे सुरू

- निवडणुका जिंकण्याच्या नादात जनतेची दिशाभूल केली जात आहे. जाती, धर्माच्या नावावर फूट पाडून निवडणुका जिंकण्याचे प्लान आखले जात आहेत. पण या पलिकडे जाऊन जोवर जनतेचा विजय होत नाही तोवर परिवर्तन होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :BRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समितीK Chandrashekar Raoके चंद्रशेखर राव