शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
4
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
5
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
6
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
7
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
8
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
9
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
10
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
11
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
12
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
13
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
14
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
15
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
16
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
17
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
18
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
19
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
20
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...

‘या’ कारणामुळे हिंगण्यातील कारखान्यात घडले भीषण अग्नितांडव; मेडिकलमध्ये मृतांचे नातेवाईक संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 11:13 IST

मृत-जखमींच्या नुकसानभरपाईबाबत संभ्रम

नागपूरहिंगणा एमआयडीसीतील सोनेगाव (निपाणी) येथील कटारिया ॲग्रो प्रा. लि. च्या कारखान्यात सोमवारी झालेल्या भीषण अग्नितांडवाचे कारण समोर आले आहे. कारखान्यातील ‘इलेक्ट्रिक पॅनल’मध्ये स्फोट होऊन सर्वांत अगोदर आग लागली व आजूबाजूच्या ज्वलनशील वस्तूंमुळे वेगाने आग पसरली. मंगळवारीदेखील आग विझविण्याचे काम सुरूच होते. दरम्यान, उतरीय तपासणीनंतर तीन कामगारांचे मृतदेह नातेवाइकांकडे सोपविण्यात आले. दरम्यान, एका मृताच्या नातेवाइकांनी या आगीची जबाबदारी कोण घेणार व नुकसानभरपाई कोण देणार, असा सवाल करत मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. अधिकाऱ्यांनी समजूत घातल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.

सोमवारी सकाळी लागलेल्या आगीत हेमराज आर्मो (४२, रा. वाडी), आदेश दहिवले (३३, भीमनगर झोपडपट्टी), अनुरोध मडावी (२०, सोनेगाव निपाणी) यांचा मृत्यू झाला, तर विकास मडावी (२३, रा. सोनेगाव निपाणी), सरीत मडावी (२२, सोनेगाव निपाणी) व धनेंद्र आगासे (३६, साईनगर) हे गंभीर जखमी झाले. कटारिया ॲग्रो कंपनीला सोमवारी लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाची मंगळवारीदेखील धडपड सुरूच होती. बाहेरून पाचारण करण्यात आलेल्या महापालिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या परत पाठविण्यात आल्या. मात्र, दोन गाड्या आणि एमआयडीसीचे कर्मचारी आग शमविण्यात व्यस्त होते. यासोबतच जेसीबी व टिप्परच्या साह्याने शेडमध्ये पडलेला लाकडी पेंढा व कच्चा माल बाहेर काढण्यात येत आहे.

प्रशासकीय लेटलतिफीत अडकला अहवाल

या अग्नितांडवातील मृत व जखमींच्या कुटुंबीयांना लगेच नुकसानभरपाईची घोषणा व्हायला हवी होती, मात्र दुसऱ्या दिवशीही प्रशासन अहवालात अडकल्याचे दिसून आले. या घटनेचा अहवाल नागपूर ग्रामीणचे तहसीलदार आशिष वानखेडे यांनी सोमवारी रात्रीच जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना पाठवला होता. एवढ्या वेदनादायी अपघातानंतर जिल्हा प्रशासन तातडीने कारवाई करून संबंधित कंपनीचालकांवर गुन्हा दाखल करून मृतांच्या नातेवाइकांना दिलासा देईल, अशी अपेक्षा होती. मात्र मंगळवारी याप्रकरणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने संबंधित एमआयडीसीकडून अहवाल मागविण्यात आला आहे. आता हा अहवाल आल्यानंतर आगीचे कारण आणि कंपनीत अशा घटनांना तोंड देण्यासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेतील त्रुटींबाबत माहिती समोर येणार आहे. त्यानंतरच जिल्हा प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जाऊ शकतात.

सरकारी मदतीवर प्रश्नचिन्ह

याप्रकरणी ‘लोकमत’ने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व निवासी उपविभागीय दंडाधिकारी विजया बनकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांशीही संपर्क होऊ शकला नाही. याबाबत नागपूर ग्रामीणचे तहसीलदार आशिष वानखेडे यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की, ही खासगी कंपनी असल्याने सध्याच्या शासकीय जीआरनुसार मृत मजुरांना शासकीय मदत देण्याबाबत संभ्रम आहे. एमआयडीसीच्या अहवालानंतरच याप्रकरणी पुढील कारवाई केली जाईल.

टॅग्स :fireआगAccidentअपघातDeathमृत्यूnagpurनागपूर