शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

'चारित्र्यसंपन्न युवकांमुळेच घडेल विकसित भारत' उपराष्ट्रपती राधाकृष्णन उद्घाटनाप्रसंगी बोलतांना

By गणेश हुड | Updated: March 21, 2026 15:46 IST

Nagpur : भारतीय युवा संसद परिषद ही केवळ चर्चेचे व्यासपीठ नसून भविष्यातील जबाबदार नागरिक आणि सक्षम नेतृत्व घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे, चारित्र्यसंपन्न युवकांमुळेच विकसित भारत घडेल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय युवा संसद परिषद ही केवळ चर्चेचे व्यासपीठ नसून भविष्यातील जबाबदार नागरिक आणि सक्षम नेतृत्व घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे, चारित्र्यसंपन्न युवकांमुळेच विकसित भारत घडेल, असे प्रतिपादन  शनिवारी उपराष्ट्रपती सी. पी.राधाकृष्णन यांनी केले. रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात आयोजित २९ व्या भारतीय युवा संसद परिषदेचे उद्घाटन सी. पी. राधाकृष्णन आणि महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते  झाले.

या प्रसंगी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल, केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी तसेच परिषदचे राष्ट्रीय संयोजक आशुतोष जोशी उपस्थित होते.

राधाकृष्णन म्हणाले , युवा संसदेमुळे तरुणांच्या विचारांना दिशा मिळते आणि चारित्र्याची जडणघडण होते. चारित्र्यनिर्मिती हा भक्कम नेतृत्वाचा पाया असून, चारित्र्यसंपन्न व्यक्तीचे नेतृत्व अधिक प्रभावी ठरते. देशाची ताकद ही त्याच्या तरुण लोकसंख्येवर अवलंबून असते. भारतात सुमारे ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील असून ही मोठी जमेची बाजू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. कृष्ण गोपाल यांनीही मार्गदर्शन केले.  प्रास्ताविक आशुतोष जोशी यांनी केले.

युवा शक्तीच देशाची ताकद : राज्यपाल

भारताची युवा पिढी ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. ही उत्साही व गतिमान पिढी राष्ट्र निर्माणात मोलाची ठरणार आहे. २०४७ या वर्षापर्यंत विकसित भारत घडविण्यासाठी केवळ आर्थिक योगदानापुरते मर्यादित राहता येणार नाही. यासोबतच सामाजिक आणि सांस्कृतिकही योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी  केले.  विविधतेत एकता हे आपल्या देशाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. भाषा, धर्म, जात, पंथ देशातील विविध भागात वेगवेगळ्या असल्या तरी देश एकसंघ असल्याचे दिसून येतो. आजवर देशावर अनेक आक्रमणे झाली आहेत. मात्र आपल्या एकसंघतेच्या बळावर ही आक्रमणे परतवून लावल्याचे ते म्हणाले. भारतीय युवा संसद परिषदेला सहाव्यांदा उपस्थित राहात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Developed India will be built by character-rich youth: Vice President

Web Summary : Vice President emphasizes that character-driven youth are crucial for a developed India. At the Indian Youth Parliament, he and the Governor highlighted youth's role, unity in diversity, and the importance of social and cultural contributions alongside economic progress.
टॅग्स :nagpurनागपूरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ