शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

नागपूर जिल्ह्यात ८३५ बोअरवेल निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 13:29 IST

यंदा ३१ कोटी रुपयांच्या टंचाई आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८,६०० बोअरवेल तयार करण्यात आल्या आहेत. यातील जिल्हा परिषदेच्या नोंदीत ८३५ बोअरवेल निकामी ( निर्लेखित) झाल्या आहेत.

ठळक मुद्देनव्या बोअरवेलसाठी आग्रह जिल्ह्याचा ३१ कोटीचा टंचाई आराखडा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यात दरवर्षी भीषण पाणीटंचाई जाणवते. पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून दरवर्षी जिल्हा परिषदेमार्फत टंचाई आराखडा तयार करण्यात येतो.यंदा ३१ कोटी रुपयांच्या टंचाई आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. यात सर्वाधिक कामे ही बोअरवेलची आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात आतापर्यंत ८,६०० बोअरवेल तयार करण्यात आल्या आहेत. यातील जिल्हा परिषदेच्या नोंदीत ८३५ बोअरवेल निकामी ( निर्लेखित) झाल्या आहेत.जिल्ह्यातील ७६८ ग्रा.पं.अंतर्गत १५६० वर गावे आहेत. जर अशा परिस्थितीत प्रति गावाचा विचार केल्यास किमान पाच ते सहा बोअरवेल प्रत्येक गावांमध्ये आहेत. याशिवाय पाणीपुरवठ्याचे इतरही स्रोत उपलब्ध आहेत. ज्यामध्ये नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा, विहीर, टँकरद्वारे पाणीपुरवठा आदींचा समावेश आहे. नवीन बोअरवेल खोदल्यामुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत आहे. गतवर्षी जि.प.ने जवळपास ६९५ बोअरवेल खोदल्या होत्या.यंदाच्या टंचाई आराखड्यात पुन्हा ३ कोटी ४१ हजाराच्या निधीतून आणखी २६४ बोअरवेल खोदण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. बोअरवेलचा अतिरेक झाल्यामुळे भूगर्भातील पाणी खोल गेले आहे. नरखेड, काटोल तालुक्यांमध्ये त्याची झळ बसत आहे. त्यामुळे बोअरवेलला फ्लशिंग हा पर्याय समोर आला आहे. निर्लेखित बोअरवेलला पुनर्भरणाच्या दृष्टीने फ्लशिंग करून बोअरमधील गाळ, कचरा साफ करून बोअरवेलचे पुनर्भरण केल्यास जमिनीतील पाण्याचा उपसा मर्यादित राहणार आहे.कळमेश्वर तालुक्यात फ्लशिंगचा प्रयोग यशस्वीगतवर्षी जिल्ह्यातील कळमेश्वर, नरखेड व काटोल ही तालुके दुष्काळग्रस्त होती. त्यावेळी कळमेश्वर तालुक्यामधील जवळपास ४० वर गावांमध्ये सीएसआर फंडातून फ्लशिंगचा कार्यक्रम राबविण्यात आला आणि तो यशस्वीही ठरला. यामध्ये गोंडखैरी, घोराड, धापेवाडा, सिंधी आदी गावांचा समावेश होता. तर हिंगणा व मौदा तालुक्यातीलही १८-२० गावांनी जि.प.च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे फ्लशिंगसंदर्भात प्रस्ताव सादर केला होता.बोअरवेल फ्लशिंगसाठी पुढाकार का नाही?जिल्ह्यात गावांच्या तुलनेत सहापटीने बोअरवेल जास्त आहेत. नवीन बोअरवेल खोदून भूगर्भाची चाळण होत आहे. या परिस्थितीत बोअरवेल फ्लशिंगसारख्या कार्यक्रमाला गंभीरतेने घेण्याची गरज आहे. परंतु बोअरवेलमुळे राजकारण्यांना आपली राजकीय पोळी शेकता येते, यामुळे ते जाणीवपूर्वक या फ्लशिंगसारख्या कमी खर्चाच्या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :agricultureशेतीWaterपाणी