शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात ८३५ बोअरवेल निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 13:29 IST

यंदा ३१ कोटी रुपयांच्या टंचाई आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८,६०० बोअरवेल तयार करण्यात आल्या आहेत. यातील जिल्हा परिषदेच्या नोंदीत ८३५ बोअरवेल निकामी ( निर्लेखित) झाल्या आहेत.

ठळक मुद्देनव्या बोअरवेलसाठी आग्रह जिल्ह्याचा ३१ कोटीचा टंचाई आराखडा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यात दरवर्षी भीषण पाणीटंचाई जाणवते. पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून दरवर्षी जिल्हा परिषदेमार्फत टंचाई आराखडा तयार करण्यात येतो.यंदा ३१ कोटी रुपयांच्या टंचाई आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. यात सर्वाधिक कामे ही बोअरवेलची आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात आतापर्यंत ८,६०० बोअरवेल तयार करण्यात आल्या आहेत. यातील जिल्हा परिषदेच्या नोंदीत ८३५ बोअरवेल निकामी ( निर्लेखित) झाल्या आहेत.जिल्ह्यातील ७६८ ग्रा.पं.अंतर्गत १५६० वर गावे आहेत. जर अशा परिस्थितीत प्रति गावाचा विचार केल्यास किमान पाच ते सहा बोअरवेल प्रत्येक गावांमध्ये आहेत. याशिवाय पाणीपुरवठ्याचे इतरही स्रोत उपलब्ध आहेत. ज्यामध्ये नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा, विहीर, टँकरद्वारे पाणीपुरवठा आदींचा समावेश आहे. नवीन बोअरवेल खोदल्यामुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत आहे. गतवर्षी जि.प.ने जवळपास ६९५ बोअरवेल खोदल्या होत्या.यंदाच्या टंचाई आराखड्यात पुन्हा ३ कोटी ४१ हजाराच्या निधीतून आणखी २६४ बोअरवेल खोदण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. बोअरवेलचा अतिरेक झाल्यामुळे भूगर्भातील पाणी खोल गेले आहे. नरखेड, काटोल तालुक्यांमध्ये त्याची झळ बसत आहे. त्यामुळे बोअरवेलला फ्लशिंग हा पर्याय समोर आला आहे. निर्लेखित बोअरवेलला पुनर्भरणाच्या दृष्टीने फ्लशिंग करून बोअरमधील गाळ, कचरा साफ करून बोअरवेलचे पुनर्भरण केल्यास जमिनीतील पाण्याचा उपसा मर्यादित राहणार आहे.कळमेश्वर तालुक्यात फ्लशिंगचा प्रयोग यशस्वीगतवर्षी जिल्ह्यातील कळमेश्वर, नरखेड व काटोल ही तालुके दुष्काळग्रस्त होती. त्यावेळी कळमेश्वर तालुक्यामधील जवळपास ४० वर गावांमध्ये सीएसआर फंडातून फ्लशिंगचा कार्यक्रम राबविण्यात आला आणि तो यशस्वीही ठरला. यामध्ये गोंडखैरी, घोराड, धापेवाडा, सिंधी आदी गावांचा समावेश होता. तर हिंगणा व मौदा तालुक्यातीलही १८-२० गावांनी जि.प.च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे फ्लशिंगसंदर्भात प्रस्ताव सादर केला होता.बोअरवेल फ्लशिंगसाठी पुढाकार का नाही?जिल्ह्यात गावांच्या तुलनेत सहापटीने बोअरवेल जास्त आहेत. नवीन बोअरवेल खोदून भूगर्भाची चाळण होत आहे. या परिस्थितीत बोअरवेल फ्लशिंगसारख्या कार्यक्रमाला गंभीरतेने घेण्याची गरज आहे. परंतु बोअरवेलमुळे राजकारण्यांना आपली राजकीय पोळी शेकता येते, यामुळे ते जाणीवपूर्वक या फ्लशिंगसारख्या कमी खर्चाच्या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :agricultureशेतीWaterपाणी