शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

८० हजार कोटींचा खर्च पाण्यात, केंद्र म्हणते नव्याने बांधा धरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 06:37 IST

गुणवत्ता नियंत्रण करण्यात अपयश 

राजेश शेगाेकार नागपूर : महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील सिरोंचाजवळील पोचमपल्लीनजीक तेलंगणा सरकारच्या कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पाचा एक भाग असलेल्या मेडिगड्डा (लक्ष्मी) बॅरेजच्या पुलाचा पाया २१ ऑक्टोबरला रात्री खचल्याने अचानक गोदावरीत विसर्ग करावा लागला. या प्रकल्पाची नॅशनल डॅम सेफ्टी ॲथाॅरटी (NDSA)च्या पथकाने पाहणी करून अहवाल दिला. 

गुणवत्ता नियंत्रण करण्यात अपयश धरणासंदर्भात नियोजन, डिझाइन, गुणवत्ता नियंत्रण तसेच ऑपरेशन आणि देखभाल करण्यात सरकारला अपयश आले आहे, अशा शब्दांत अहवालात फटकारण्यात आले. झालेले नुकसान पाहता आगामी काळात मेडिगड्डा धरणच पुन्हा बांधावे लागणार आहे, असा निष्कर्ष काढला आहे. 

सहा खांबांना गेले तडे मेडिगड्डा बॅरेजच्या सहा खांबांना तडे गेल्यानंतर एनडीएसएच्या सहा सदस्यीय तज्ज्ञांनी बॅरेजला २३ आणि २४ ऑक्टोबरला भेट दिली तसेच तेलंगणाच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पाहणीनंतर पथकाने ४३ पानांचा अहवाल दिला आहे. 

अहवालात म्हटले की,...nबॅरेजचे १५ ते २१ दरम्यानचे खांब १६ हजार दशलक्ष घनफूट पाण्याच्या प्रवाहाचा सामना करण्यास सक्षम ठरले नाहीत. nखांब बुडाल्याने फ्लोटिंग स्ट्रक्चर म्हणून केलेले डिझाइन, प्रकल्पाचे नियाेजन  आणि अंमलबजावणीमधील उणिवा उघड करतात.nबॅरेजच्या कमकुवतपणामुळे सर्व ८५ दरवाजे उघडण्यास भाग पाडले गेले. त्यामुळे राखीव दहा दशलक्ष घनफूट पाणी सोडावे लागले. 

तपासणी, देखभाल नाही२०१९-२० मध्ये बॅरेज सुरू झाल्यापासून सिमेंट-काँक्रीट ब्लॉक्सची किंवा लॉन्चिंग ऍप्रन्सची तपासणी किंवा देखभाल केली नाही. यामुळे बॅरेज हळूहळू कमकुवत होत आहे. बॅरेजची पूर्णपणे दुरुस्ती होईपर्यंत ते निरुपयोगी आहे. खराब झालेला सातव्या क्रमांकाचा खांब नव्याने बांधणे आवश्यक आहे. तसे करताना इतर खांब काेसळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे प्रकल्पाची दुरुस्ती म्हणजे धरणाची पुनर्बांधणी करणेच ठरणार असल्याचे अहवालात म्हटले.  

२ मे २०१६पायाभरणी८०,०००कोटी खर्च१६.१७टीएमसी क्षमता८५दरवाजे७,५०,०००हेक्टर नवीनसिंचन क्षमता

टॅग्स :nagpurनागपूरTelanganaतेलंगणाDamधरण