शहरं
Join us  
Trending Stories
1
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
2
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
3
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
4
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
5
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
6
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
7
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
8
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
9
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
10
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
11
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
12
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
13
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
14
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
15
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
16
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
17
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
18
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
19
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
20
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?

Video : '7 वा वेतन आयोग फटकन दिला, मग शेतकऱ्यांना हमीभाव का नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 15:39 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनं केवळ मलमपट्टी होणार आहे. पण, शस्त्रक्रिया करायची असेल

नागपूर - मी शेतकऱ्याचं पोरगं असून शेतकऱ्यांसोबतच राहणार. मी इकडचाही नाही अन् तिकडचाही नाही. आम्ही दिल्लीकरांपुढे शेपूट हलवत नाही, इथूनच दिल्लीवाल्यांना शेपूट हलवायला लावतो, असे म्हणत भाजपा नेत्यांवर आमदार बच्चू कडूंनी प्रहार केला. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यात यावा, स्वामिनाथन आयोगाची स्थापना करावी, अशी मागणी बच्चू कडूंनी विधानसभेतील भाषणात केली. 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनं केवळ मलमपट्टी होणार आहे. पण, शस्त्रक्रिया करायची असेल तर भाव दिल्याशिवाय पर्याय नाही. आज जरी कर्जमाफी केली तर शेतकरी कर्जमुक्त होऊ शकत नाही. उद्या त्याच्या 7/12 वर कर्ज येणारच. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघंय, असे म्हणत बच्चू कडूंनी शेतकऱ्यांना मुद्दा लावून धरला. मी सरकारला पाठिंबा दिला असेल, पण आपण शेतकऱ्यांसोबत बेईमानी करत आहोत. मीसुद्धा बेईमानीच करतोय. 7 व्या वेतन आयोगासाठी कुणाला मोर्चे किंवा आंदोलन करावे लागले का? 7 वा वेतन आयोग आपण फटकीनं देऊन टाकला. शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाईही मिळाली नाही. 

पीएम किसान योजना अद्यापही 25 टक्के लोकांपर्यंत पोहोचलीच नाही. कारण, प्रशासन नालायक आहे. इथं लष्काराचं राज्य पाहिजे, तेव्हा अधिकारी सरळ होतील. आम्हीच अधिकाऱ्यांचे लाड पुरवतोय. शेतकऱ्याची 5 लाखांची शेती गहाण ठेऊन केवळ 20 हजारांचं कर्ज दिलं जातंय. आता, ठाकरे सरकार आहे. शेतकऱ्यांनी ठाकुरकी केली पाहिजे. हमीभाव दिला तर शेतकरी तुमच्याकडे कर्ज मागायला येणार नाही. अतिवृष्ट झाली, पाण्याखाली शेती गेली पण अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळाला नाही. पिकविम्याच पैसै शेतकऱ्यांना तातडीने भेटणं गरजेचं आहे. केवळ 7 मंत्र्यांचं जरी सरकार असलं तरी, पिकविम्याचे पैसे 15 दिवसांत शेतकऱ्याला कसे भेटतील, हे प्रयत्न नक्की करू. शेतकऱ्यांना 25 हजार हेक्टरी मदतीची गरज होती. उद्धव ठाकरे हे शिवभक्त आहेत, ते हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत नक्कीच देतील हा मला आत्मविश्वास आहे, असे म्हणत शेतकऱ्यांना 25 हजार हेक्टरी मदत मिळेल, असा विश्वास बच्चू कडूंनी व्यक्त केलाय. 

आमदार बच्चू कडू यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शविला आहे. शेतकरी प्रश्नांवरून सभागृहाचे कामकाज थांबल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली. तर जयंत पाटील यांनीही राज्याचे पैसे तुमच्या केंद्रातील मोदी सरकारला द्यायला सांगा, असं म्हटले. शेतकऱ्यांना मागील पाच वर्षे लुटणारे भाजप आक्रमक झाल्याचे पाहून आमदार बच्चू कडू यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच शेतकऱ्यांना लुटणारे आक्रमक होताना पाहून आपल्याला आनंद झाल्याचे कडू यांनी नमूद केले. आता यावर भाजप काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूnagpurनागपूरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनFarmerशेतकरी