शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
3
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
4
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
5
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
6
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
7
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
8
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
9
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
10
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
11
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
12
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
14
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
15
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Video : '7 वा वेतन आयोग फटकन दिला, मग शेतकऱ्यांना हमीभाव का नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 15:39 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनं केवळ मलमपट्टी होणार आहे. पण, शस्त्रक्रिया करायची असेल

नागपूर - मी शेतकऱ्याचं पोरगं असून शेतकऱ्यांसोबतच राहणार. मी इकडचाही नाही अन् तिकडचाही नाही. आम्ही दिल्लीकरांपुढे शेपूट हलवत नाही, इथूनच दिल्लीवाल्यांना शेपूट हलवायला लावतो, असे म्हणत भाजपा नेत्यांवर आमदार बच्चू कडूंनी प्रहार केला. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यात यावा, स्वामिनाथन आयोगाची स्थापना करावी, अशी मागणी बच्चू कडूंनी विधानसभेतील भाषणात केली. 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनं केवळ मलमपट्टी होणार आहे. पण, शस्त्रक्रिया करायची असेल तर भाव दिल्याशिवाय पर्याय नाही. आज जरी कर्जमाफी केली तर शेतकरी कर्जमुक्त होऊ शकत नाही. उद्या त्याच्या 7/12 वर कर्ज येणारच. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघंय, असे म्हणत बच्चू कडूंनी शेतकऱ्यांना मुद्दा लावून धरला. मी सरकारला पाठिंबा दिला असेल, पण आपण शेतकऱ्यांसोबत बेईमानी करत आहोत. मीसुद्धा बेईमानीच करतोय. 7 व्या वेतन आयोगासाठी कुणाला मोर्चे किंवा आंदोलन करावे लागले का? 7 वा वेतन आयोग आपण फटकीनं देऊन टाकला. शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाईही मिळाली नाही. 

पीएम किसान योजना अद्यापही 25 टक्के लोकांपर्यंत पोहोचलीच नाही. कारण, प्रशासन नालायक आहे. इथं लष्काराचं राज्य पाहिजे, तेव्हा अधिकारी सरळ होतील. आम्हीच अधिकाऱ्यांचे लाड पुरवतोय. शेतकऱ्याची 5 लाखांची शेती गहाण ठेऊन केवळ 20 हजारांचं कर्ज दिलं जातंय. आता, ठाकरे सरकार आहे. शेतकऱ्यांनी ठाकुरकी केली पाहिजे. हमीभाव दिला तर शेतकरी तुमच्याकडे कर्ज मागायला येणार नाही. अतिवृष्ट झाली, पाण्याखाली शेती गेली पण अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळाला नाही. पिकविम्याच पैसै शेतकऱ्यांना तातडीने भेटणं गरजेचं आहे. केवळ 7 मंत्र्यांचं जरी सरकार असलं तरी, पिकविम्याचे पैसे 15 दिवसांत शेतकऱ्याला कसे भेटतील, हे प्रयत्न नक्की करू. शेतकऱ्यांना 25 हजार हेक्टरी मदतीची गरज होती. उद्धव ठाकरे हे शिवभक्त आहेत, ते हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत नक्कीच देतील हा मला आत्मविश्वास आहे, असे म्हणत शेतकऱ्यांना 25 हजार हेक्टरी मदत मिळेल, असा विश्वास बच्चू कडूंनी व्यक्त केलाय. 

आमदार बच्चू कडू यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शविला आहे. शेतकरी प्रश्नांवरून सभागृहाचे कामकाज थांबल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली. तर जयंत पाटील यांनीही राज्याचे पैसे तुमच्या केंद्रातील मोदी सरकारला द्यायला सांगा, असं म्हटले. शेतकऱ्यांना मागील पाच वर्षे लुटणारे भाजप आक्रमक झाल्याचे पाहून आमदार बच्चू कडू यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच शेतकऱ्यांना लुटणारे आक्रमक होताना पाहून आपल्याला आनंद झाल्याचे कडू यांनी नमूद केले. आता यावर भाजप काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूnagpurनागपूरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनFarmerशेतकरी