शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
2
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
3
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
4
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
5
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
6
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
7
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
8
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
9
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
10
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
11
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
12
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
13
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
14
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
15
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
16
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
17
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
18
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
19
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
20
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
Daily Top 2Weekly Top 5

Video : '7 वा वेतन आयोग फटकन दिला, मग शेतकऱ्यांना हमीभाव का नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 15:39 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनं केवळ मलमपट्टी होणार आहे. पण, शस्त्रक्रिया करायची असेल

नागपूर - मी शेतकऱ्याचं पोरगं असून शेतकऱ्यांसोबतच राहणार. मी इकडचाही नाही अन् तिकडचाही नाही. आम्ही दिल्लीकरांपुढे शेपूट हलवत नाही, इथूनच दिल्लीवाल्यांना शेपूट हलवायला लावतो, असे म्हणत भाजपा नेत्यांवर आमदार बच्चू कडूंनी प्रहार केला. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यात यावा, स्वामिनाथन आयोगाची स्थापना करावी, अशी मागणी बच्चू कडूंनी विधानसभेतील भाषणात केली. 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनं केवळ मलमपट्टी होणार आहे. पण, शस्त्रक्रिया करायची असेल तर भाव दिल्याशिवाय पर्याय नाही. आज जरी कर्जमाफी केली तर शेतकरी कर्जमुक्त होऊ शकत नाही. उद्या त्याच्या 7/12 वर कर्ज येणारच. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघंय, असे म्हणत बच्चू कडूंनी शेतकऱ्यांना मुद्दा लावून धरला. मी सरकारला पाठिंबा दिला असेल, पण आपण शेतकऱ्यांसोबत बेईमानी करत आहोत. मीसुद्धा बेईमानीच करतोय. 7 व्या वेतन आयोगासाठी कुणाला मोर्चे किंवा आंदोलन करावे लागले का? 7 वा वेतन आयोग आपण फटकीनं देऊन टाकला. शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाईही मिळाली नाही. 

पीएम किसान योजना अद्यापही 25 टक्के लोकांपर्यंत पोहोचलीच नाही. कारण, प्रशासन नालायक आहे. इथं लष्काराचं राज्य पाहिजे, तेव्हा अधिकारी सरळ होतील. आम्हीच अधिकाऱ्यांचे लाड पुरवतोय. शेतकऱ्याची 5 लाखांची शेती गहाण ठेऊन केवळ 20 हजारांचं कर्ज दिलं जातंय. आता, ठाकरे सरकार आहे. शेतकऱ्यांनी ठाकुरकी केली पाहिजे. हमीभाव दिला तर शेतकरी तुमच्याकडे कर्ज मागायला येणार नाही. अतिवृष्ट झाली, पाण्याखाली शेती गेली पण अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळाला नाही. पिकविम्याच पैसै शेतकऱ्यांना तातडीने भेटणं गरजेचं आहे. केवळ 7 मंत्र्यांचं जरी सरकार असलं तरी, पिकविम्याचे पैसे 15 दिवसांत शेतकऱ्याला कसे भेटतील, हे प्रयत्न नक्की करू. शेतकऱ्यांना 25 हजार हेक्टरी मदतीची गरज होती. उद्धव ठाकरे हे शिवभक्त आहेत, ते हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत नक्कीच देतील हा मला आत्मविश्वास आहे, असे म्हणत शेतकऱ्यांना 25 हजार हेक्टरी मदत मिळेल, असा विश्वास बच्चू कडूंनी व्यक्त केलाय. 

आमदार बच्चू कडू यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शविला आहे. शेतकरी प्रश्नांवरून सभागृहाचे कामकाज थांबल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली. तर जयंत पाटील यांनीही राज्याचे पैसे तुमच्या केंद्रातील मोदी सरकारला द्यायला सांगा, असं म्हटले. शेतकऱ्यांना मागील पाच वर्षे लुटणारे भाजप आक्रमक झाल्याचे पाहून आमदार बच्चू कडू यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच शेतकऱ्यांना लुटणारे आक्रमक होताना पाहून आपल्याला आनंद झाल्याचे कडू यांनी नमूद केले. आता यावर भाजप काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूnagpurनागपूरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनFarmerशेतकरी