शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

७५ टक्के मूल्यांकन पूर्ण, १२ वीचा निकाल लागणार मे अखेरीस

By आनंद डेकाटे | Published: April 12, 2024 3:02 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बोर्डाच्या परीक्षांनंतर आता मूल्यांकनाचे काम वेगाने सुरू आहे.

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बोर्डाच्या परीक्षांनंतर आता मूल्यांकनाचे काम वेगाने सुरू आहे. शिक्षक निवडणूक ड्युटीवर असतानाही मूल्यांकनाच्या कामावर परिणाम झालेला नाही. ७५ टक्के काम पूर्ण झाल्याचे विभागीय सचिव चिंतामण वंजारी यांनी सांगितले. बारावीचा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.

बोर्डाच्या परीक्षा संपल्यानंतर बहुतांश विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या प्रवेश परीक्षांची तयारी सुरू केली आहे. काही परीक्षा या महिन्यात होणार आहेत, काही मे महिन्यात. याचा अर्थ बोर्डाच्या परीक्षेतून विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी त्यांनी पुन्हा प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली आहे. बोर्डाच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम वेगाने सुरू आहे. सुरुवातीला शिक्षकांनी मूल्यांकनावर बहिष्कार टाकला असला तरी नंतर त्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर परिस्थिती सामान्य झाली.

सध्या शिक्षकही निवडणुकीच्या तयारीत गुंतले आहेत. असे असतानाही मूल्यांकनाच्या कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा आला नाही. यावेळी इयत्ता १२ वी मधील १,६२,५१७ विद्यार्थी आणि १० वी मधील १,५४,७२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. नियमित वेळेवर परीक्षांचे निकाल जाहीर होतील, असे सांगितले जाते. त्यानुसार १२ वी चा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात आणि १० वी चे निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील.

टॅग्स :nagpurनागपूरexamपरीक्षा