शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
3
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
4
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
5
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
6
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
7
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
8
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
9
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!
10
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
11
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
12
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
13
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
14
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
15
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
16
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
17
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
18
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
19
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
20
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश

६२५ कोटींचे कर्ज वाटप

By admin | Updated: July 26, 2015 03:15 IST

जिल्ह्यात यंदा २०१५-१६ च्या खरीप हंगामात ६७,५५४ शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून ६२५ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले.

६७,५५४ शेतकऱ्यांना पुरवठा : पालकमंत्र्यांकडून बँकांचे अभिनंदन नागपूर : जिल्ह्यात यंदा २०१५-१६ च्या खरीप हंगामात ६७,५५४ शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून ६२५ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. ८४१.५० कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून ही प्रक्रिया २२ जुलै पर्यंतची असून ७४.२८ ही पीककर्ज वाटपाची यंदाची टक्केवारी असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ते जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते. रविभवन येथे पार पडलेल्या या बैठकीत आमदार सुधीर परवे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे प्रामुख्याने उपस्थित होते. यावर्षी खरीप हंगामात राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात महत्त्वाची भूमिका बजावल्याने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासनाच्यावतीने सर्व बँकांचे अभिनंदन केले. तसेच यंदा पावसाने सुरुवातीला दमदार सुरुवात केल्यानंतर जुलैच्या मध्यात दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागेल, अशी भीती होती.परंतु पावसाच्या पुनरागमनाने ती भीती संपली असून राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना स्वत:कडील बियाणे वापरण्याचे आवाहन केले. यामुळे शेतकऱ्यांची बियाण्यांवर होणाऱ्या एकूण खर्चात ४० टक्के कपात झाली असल्याचे यावेळी सांगितले. तसेच जिल्ह्यात पिकाखालील एकूण क्षेत्र पाहता खताचा ५० हजार मेट्रिक टन असा मुबलक साठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी खत पुरवठ्याबाबत काळजी करण्याचे कारण नसल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यंदाचा खरीप हंगाम-२०१५ चा पीक पेरणी व पीक परिस्थितीचा अहवाल पाहता नागपूर जिल्ह्यात ११३८.८६ मि.मि. इतका सरासरी पाऊस असून २४ जुलै पर्यंत प्रत्यक्ष ४१७.५ मि.मी. म्हणजेच सरासरीच्या तुलनेच ३६.६५ टक्के पाऊस झाला आहे.(प्रतिनिधी)दुबार पेरणीचे संकट दूर जिल्ह्यातील खरीप हंगामात आतापर्यंत पीक पेरणी सर्वसाधारण क्षेत्राच्या प्रमाणात ८१.७० टक्के इतकी लागवड झाली आहे. यात २२ जुलैपर्यंत कापूस २ लाख हेक्टरपर्यंत लागवड झाली आहे. ही लागवड ९८.६९ टक्के इतकी आहे. सोयाबीन १ लाख २४ हजार ४०६ हेक्टर (८६ टक्के), भात १२ हजार १६८ हेक्टर (४ टक्के) आणि तूर ४८ हजार ५८९ हेक्टर (१०६ टक्के) इतकी लागवड झाली आहे जिल्ह्यात वेळेवर पाऊस पडल्याने दुबार पेरणीचे संकट दूर झाल्याचेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.