शहरं
Join us  
Trending Stories
1
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
2
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
3
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
4
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
5
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
7
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
8
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
9
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
10
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
11
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
12
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
13
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
14
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
15
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
16
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
17
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
18
VIDEO: कुछ तुफानी हो जाए ! टायरच्या ढिगावर उभा राहिला तरुण, फुल स्पीडमध्ये आली कार अन्...
19
मीडिया, कला आणि खेळाचा त्रिवेणी संगम: 'जय हिंद'च्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
20
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

६० टक्के परीक्षार्थी ‘एआयपीएमटी’ला गैरहजर

By admin | Updated: July 26, 2015 03:16 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्यावतीने (सीबीएसई) घेण्यात आलेल्या अखिल भारतीय प्री-मेडिकल टेस्टमध्ये ...

नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्यावतीने (सीबीएसई) घेण्यात आलेल्या अखिल भारतीय प्री-मेडिकल टेस्टमध्ये (एआयपीएमटी) नागपूर केंद्रावर सरासरी ६० टक्के विद्यार्थी गैरहजर दिसून आले. विद्यार्थ्यांच्या या अनुपस्थितीवर परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. या परीक्षेसाठी नागपुरात एकूण ४२ केंद्रे सज्ज करण्यात आली होती. त्यावर एकूण २५ हजार विद्यार्थी परीक्षा देणार होते. परंतु या केंद्रावर सुमारे ७० ते ८२ टक्के विद्यार्थी गैरहजर होते. परंतु यावर सीबीएसईच्या नागपूर येथील परीक्षा नियंत्रण कार्यालयातर्फे कोणत्याही प्रतिक्रीया देण्यास नकार दिला. मात्र काही अधिकाऱ्यांच्या मते, ‘एआयपीएमटी’चा अपवाद वगळता इतर सर्व राष्ट्रीय व राज्यस्तरीय मेडिकल प्रवेश पूर्व परीक्षा व संबंधित प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी या परीक्षेला गैरहजर दिसून आले. विशेष म्हणजे, नागपुरातील परीक्षा केंद्रावर देशभरातील विद्यार्थी परीक्षा देणार होते. परंतु सर्वच ठिकाणी मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने बाहेरचे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले नाही. परीक्षार्थीच्या या गैरहजरीने परीक्षेतील स्पर्धा कमी झाली आहे. दुसरीकडे पालकांच्या मते, सीबीएसईच्या कठोर नियमांमुळे अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहे.अनेक विद्यार्थ्यांना नागपूरपासून सुमारे २५ किलो मीटरवर परीक्षा केंद्रे देण्यात आली होती. असे असताना परीक्षा केंद्रांवर पाच मिनिटे उशिरा पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात होता. अशाप्रकारे काटोल रोडवरील एका सीबीएसई शाळेतील परीक्षा केंद्रावर २५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना परत पाठविण्यात आले. अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची विनंती केली. परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. परीक्षा नियंत्रण कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मते, यासंबंधी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेशपत्रावर सर्व सुचना देण्यात आल्या होत्या. त्यावर सकाळी ९.३० वाजतानंतर परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही, असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. असे असताना विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी प्रवेश केंद्रावर सकाळी ७.३० वाजतापासून प्रवेश दिला जात होता. अशा स्थितीत उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्राला दोष देता येणार नाही, असे ते म्हणाले.