शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात महावितरणच्या हलगर्जीमुळे विजेच्या शॉकने ५४७ बळी; माहिती अधिकारातून बाब उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 11:15 IST

एप्रिल २०१९ पासून ३२ महिन्यांत राज्यभरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे वीजेचा शॉक लागून ५४७ नागरिकांना जीव गमवावा लागला.

ठळक मुद्दे३२ महिन्यांची राज्यातील आकडेवारी आर्थिक मदतीत हात आखडता, ४१ टक्क्यांच्या वारसांनाच साहाय्य

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महावितरणच्या भोंगळ कारभाराचे अनेक नमुने समोर येत असतात, मात्र विभागाच्या हलगर्जीपणाने शेकडो लोकांच्या प्राणावरच घाव घातला. एप्रिल २०१९ पासून ३२ महिन्यांत राज्यभरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे वीजेचा शॉक लागून ५४७ नागरिकांना जीव गमवावा लागला. या मृतांच्या वारसांना मदत देण्यातदेखील महावितरणने हात आखडते घेतल्याचे दिसून येत आहे. माहिती अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत महावितरणकडे विचारणा केली होती. एप्रिल २०१९ ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत राज्यात विजेच्या शॉकने किती अपघात झाले व त्यात किती जणांचे बळी गेले, किती प्रकरणांत महावितरण जबाबदार होते व किती जणांना आर्थिक सहकार्य मिळाले याबाबत त्यांनी विचारणा केली होती.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०१९ ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत राज्यभरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ५४७ नागरिक व १ हजार ९११ प्राण्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. यातील २२९ मृत व्यक्तींच्या वारसांना ८ कोटी ९८ लाखांची मदत देण्यात आली. उर्वरितांना अद्यापही मदत मिळालेली नाही.

दुसरीकडे मृत्यू झालेल्या जनावरांपैकी ६८२ जनावरांच्या मालकांनाच (३५.६९ टक्के) आर्थिक साहाय्य मिळाले. त्यांना मिळालेल्या मदतीची रक्कम २ कोटी २३ लाख इतकी होती.

राज्यातील ३२ टक्के मृत्यू विदर्भातील

दरम्यान, ३२ महिन्यांच्या कालावधीत विजेच्या शॉकमुळे २ हजार ६५७ प्राणांतिक अपघात झाले. त्यापैकी ८५८ मृत्यू (३२.२९ टक्के) हे विदर्भातील होते. राज्यभरात ३ हजार १२० प्राण्यांचे प्राणांतिक अपघात झाले व त्यात विदर्भातील १ हजार १८३ प्राण्यांचा मृत्यू झाला.

राज्यातील आकडेवारी

वर्ष : राज्यातील प्राणांतिक अपघात : विदर्भातील मृत्यू

२०१९-२० : १,०१२ : ३२३

२०२०-२१ : १,०६० : ३५६

२०२१- २२ (नोव्हेंबरपर्यंत) : ५८५ : १७०

टॅग्स :electricityवीजDeathमृत्यू