शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

राज्यात महावितरणच्या हलगर्जीमुळे विजेच्या शॉकने ५४७ बळी; माहिती अधिकारातून बाब उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 11:15 IST

एप्रिल २०१९ पासून ३२ महिन्यांत राज्यभरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे वीजेचा शॉक लागून ५४७ नागरिकांना जीव गमवावा लागला.

ठळक मुद्दे३२ महिन्यांची राज्यातील आकडेवारी आर्थिक मदतीत हात आखडता, ४१ टक्क्यांच्या वारसांनाच साहाय्य

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महावितरणच्या भोंगळ कारभाराचे अनेक नमुने समोर येत असतात, मात्र विभागाच्या हलगर्जीपणाने शेकडो लोकांच्या प्राणावरच घाव घातला. एप्रिल २०१९ पासून ३२ महिन्यांत राज्यभरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे वीजेचा शॉक लागून ५४७ नागरिकांना जीव गमवावा लागला. या मृतांच्या वारसांना मदत देण्यातदेखील महावितरणने हात आखडते घेतल्याचे दिसून येत आहे. माहिती अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत महावितरणकडे विचारणा केली होती. एप्रिल २०१९ ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत राज्यात विजेच्या शॉकने किती अपघात झाले व त्यात किती जणांचे बळी गेले, किती प्रकरणांत महावितरण जबाबदार होते व किती जणांना आर्थिक सहकार्य मिळाले याबाबत त्यांनी विचारणा केली होती.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०१९ ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत राज्यभरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ५४७ नागरिक व १ हजार ९११ प्राण्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. यातील २२९ मृत व्यक्तींच्या वारसांना ८ कोटी ९८ लाखांची मदत देण्यात आली. उर्वरितांना अद्यापही मदत मिळालेली नाही.

दुसरीकडे मृत्यू झालेल्या जनावरांपैकी ६८२ जनावरांच्या मालकांनाच (३५.६९ टक्के) आर्थिक साहाय्य मिळाले. त्यांना मिळालेल्या मदतीची रक्कम २ कोटी २३ लाख इतकी होती.

राज्यातील ३२ टक्के मृत्यू विदर्भातील

दरम्यान, ३२ महिन्यांच्या कालावधीत विजेच्या शॉकमुळे २ हजार ६५७ प्राणांतिक अपघात झाले. त्यापैकी ८५८ मृत्यू (३२.२९ टक्के) हे विदर्भातील होते. राज्यभरात ३ हजार १२० प्राण्यांचे प्राणांतिक अपघात झाले व त्यात विदर्भातील १ हजार १८३ प्राण्यांचा मृत्यू झाला.

राज्यातील आकडेवारी

वर्ष : राज्यातील प्राणांतिक अपघात : विदर्भातील मृत्यू

२०१९-२० : १,०१२ : ३२३

२०२०-२१ : १,०६० : ३५६

२०२१- २२ (नोव्हेंबरपर्यंत) : ५८५ : १७०

टॅग्स :electricityवीजDeathमृत्यू