शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
8
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
9
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
10
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
11
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
12
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
13
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
14
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
15
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
16
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
17
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
18
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
19
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
20
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

राज्यात महावितरणच्या हलगर्जीमुळे विजेच्या शॉकने ५४७ बळी; माहिती अधिकारातून बाब उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 11:15 IST

एप्रिल २०१९ पासून ३२ महिन्यांत राज्यभरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे वीजेचा शॉक लागून ५४७ नागरिकांना जीव गमवावा लागला.

ठळक मुद्दे३२ महिन्यांची राज्यातील आकडेवारी आर्थिक मदतीत हात आखडता, ४१ टक्क्यांच्या वारसांनाच साहाय्य

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महावितरणच्या भोंगळ कारभाराचे अनेक नमुने समोर येत असतात, मात्र विभागाच्या हलगर्जीपणाने शेकडो लोकांच्या प्राणावरच घाव घातला. एप्रिल २०१९ पासून ३२ महिन्यांत राज्यभरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे वीजेचा शॉक लागून ५४७ नागरिकांना जीव गमवावा लागला. या मृतांच्या वारसांना मदत देण्यातदेखील महावितरणने हात आखडते घेतल्याचे दिसून येत आहे. माहिती अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत महावितरणकडे विचारणा केली होती. एप्रिल २०१९ ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत राज्यात विजेच्या शॉकने किती अपघात झाले व त्यात किती जणांचे बळी गेले, किती प्रकरणांत महावितरण जबाबदार होते व किती जणांना आर्थिक सहकार्य मिळाले याबाबत त्यांनी विचारणा केली होती.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०१९ ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत राज्यभरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ५४७ नागरिक व १ हजार ९११ प्राण्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. यातील २२९ मृत व्यक्तींच्या वारसांना ८ कोटी ९८ लाखांची मदत देण्यात आली. उर्वरितांना अद्यापही मदत मिळालेली नाही.

दुसरीकडे मृत्यू झालेल्या जनावरांपैकी ६८२ जनावरांच्या मालकांनाच (३५.६९ टक्के) आर्थिक साहाय्य मिळाले. त्यांना मिळालेल्या मदतीची रक्कम २ कोटी २३ लाख इतकी होती.

राज्यातील ३२ टक्के मृत्यू विदर्भातील

दरम्यान, ३२ महिन्यांच्या कालावधीत विजेच्या शॉकमुळे २ हजार ६५७ प्राणांतिक अपघात झाले. त्यापैकी ८५८ मृत्यू (३२.२९ टक्के) हे विदर्भातील होते. राज्यभरात ३ हजार १२० प्राण्यांचे प्राणांतिक अपघात झाले व त्यात विदर्भातील १ हजार १८३ प्राण्यांचा मृत्यू झाला.

राज्यातील आकडेवारी

वर्ष : राज्यातील प्राणांतिक अपघात : विदर्भातील मृत्यू

२०१९-२० : १,०१२ : ३२३

२०२०-२१ : १,०६० : ३५६

२०२१- २२ (नोव्हेंबरपर्यंत) : ५८५ : १७०

टॅग्स :electricityवीजDeathमृत्यू