शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

पर्यावरण जागृतीसाठी ५१ व्या वर्षी ‘सायकल यात्रा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 10:59 AM

साधारणत: वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर अनेकांच्या हालचालींवर काहिशा मर्यादा येतात. मात्र एका जैनधर्मीय नागरिकाने ५१ व्या वर्षी एक अनोखा संकल्प घेतला आहे.

ठळक मुद्देपाच राज्य ओलांडून श्री सम्मेद शिखरजीपर्यंत जाणारजैन नागरिकाचा असाही पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साधारणत: वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर अनेकांच्या हालचालींवर काहिशा मर्यादा येतात. मात्र एका जैनधर्मीय नागरिकाने ५१ व्या वर्षी एक अनोखा संकल्प घेतला आहे. पर्यावरणासंबंधात जनजागृती करण्यासाठी त्यांनी सायकल यात्रेला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे यादरम्यान ते पाच राज्यांची भूमी ओलांडणार असून झारखंडमधील जैन तीर्थक्षेत्र श्री सम्मेद शिखरजी येथे या यात्रेचा समारोप होईल. अरविंद आगरकर जैन असे त्यांचे नाव असून त्यांचा उत्साह भल्याभल्यांना थक्क करणारा आहे.मूळचे अकोला येथील असलेले अरविंद आगरकर जैन हे मागील अनेक वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करत आहेत. सोबतच जनआरोग्यासंदर्भातदेखील त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. यासाठी त्यांनी अनेकदा सायकल यात्रादेखील आयोजित केल्या. यंदा मात्र त्यांनी जास्त मोठा पल्ला गाठण्याचा निर्धार केला व अकोल्यापासून ते थेट श्री सम्मेद शिखरजी गाठण्याचा संकल्प घेतला. या यात्रेदरम्यान ते पेट्रोल बचत तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार आहेत.११ नोव्हेंबर रोजी अकोला येथील श्री शांतिनाथ चैत्यालय जैन मंदिर येथून त्यांच्या या यात्रेला सुरुवात झाली.सायकल, आवश्यक ते सामान घेऊन ते तेथून निघाले. मंगळवारी रात्री ते नागपुरात आले व बुधवारी सकाळी लक्ष्मीनगर येथील भगवान शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर येथून पुढील प्रवासाकडे निघाले.याअगोदरदेखील केल्या आहेत सायकलयात्राअरविंद आगरकर जैन यांनी याअगोदरदेखील अनेक सायकल यात्रा केल्या आहेत. नागपूर ते रामटेक, मुक्तागिरी, शिरपूर जैन सायकल यात्रा त्यांनी पूर्ण केली. आजच्या काळात आरोग्य व पर्यावरण दोघांकडेदेखील जास्त लक्ष देण्याची गरज आहे. मात्र लोक याच महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करतात. याबाबतच जनजागृती करण्यासाठी मी हा पुढाकार घेतला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

१८ दिवसात हजार किलोमीटरचा प्रवासपर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही सायकल यात्रा एकूण १८ दिवस चालणार आहे. यात ते जवळपास १७०० किलोमीटरचा प्रवास करतील. नागपूरहून आता ते रामटेक मध्य प्रदेशमधील शिवनी, लखनादौन, जबलपूर, खजुराहो, कटनी, सतना, रिवा, हनुमना, उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर, वाराणसी, चंदौली, मुगलसराय, बिहारमधील सासाराम, औरंगाबाद ,मदनपूर ,शेरघाटी, डोभी, बाराचट्टी, झारखंड राज्यातील चौपारण, बरही, बरकठा , बागोदर, डुमरी, गिरिडिह, पारसनाथ या मार्गाने श्री सम्मेद शिखरजी येते पोहोचतील.

टॅग्स :environmentवातावरण