शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत पूर्व विदर्भात ५०२ मातांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 10:13 IST

मातामृत्यू रोखण्यासाठी प्रशासन स्तरावर विविध उपाययोजना, प्रकल्प राबविले जात असले तरी मातामृत्यूचे सत्र कायम आहे. यामुळे ‘शून्य माता मृत्यू’ची उद्दिष्टपूर्ती कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्दे‘शून्य माता मृत्यू’ची उद्दिष्टपूर्ती कधी?आरोग्य विभागाकडे शहरातील मृत्यूची नोंदच नाही

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मातामृत्यू रोखण्यासाठी प्रशासन स्तरावर विविध उपाययोजना, प्रकल्प राबविले जात असले तरी मातामृत्यूचे सत्र कायम आहे. यामुळे ‘शून्य माता मृत्यू’ची उद्दिष्टपूर्ती कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. २०१२ ते १७ या पाच वर्षांत पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये ५०२ मातांचा मृत्यू झाला. यात सर्वाधिक मृत्यू गडचिरोली येथे झाले. मृत्यूचा आकडा ११९ आहे. त्या खालोखाल वर्धेत १०० तर चंद्रपुरात ९९ मृत्यूची नोंद आहे. विशेष म्हणजे, यात नागपूर शहरातील माता मृत्यूची संख्या नाही. मृत्यूचा आकडा वाढत असल्याने आरोग्य विभाग त्याची नोंद घेत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.माता मृत्यू कमी व्हावा यासाठी राज्यात ‘प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान’ (पीएमएसएमए) ही योजना सुरू करण्यात आली आहे.ज्या मातांचे हिमोग्लोबिन कमी आहे, ज्यांना उच्च रक्तदाब आहे, पोटातील बाळाची वाढ व्यवस्थित झालेली नाही, प्लेटलेटची संख्या कमी आहे आदी माता या अतिजोखमीच्या गटात येतात. या मातांना तातडीने सर्व सुविधा आहेत तेथे प्रसुतीसाठी पाठवले जाते.परिणामी, अनेक गर्भवती महिलांना या योजनेंतर्गत उपचार मिळाले आहेत. यामुळे मृत्युदर कमी होण्यास मदत झाली झाली आहे. मात्र, रुग्णालयातील हलगर्जीपणा, गंभीर रक्तस्राव, संसर्ग, इजा, अ‍ॅनिमिया, वाढलेला रक्तदाब आणि मुलाच्या जन्माच्या वेळी झालेली दुखापत यामुळे प्रसुतीच्या वेळी माता मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञाचे म्हणणे आहे.जोखमीच्या मातांची काळजी आवश्यकआजही ग्रामीण भागात प्रसूतींच्या आवश्यक वैद्यकीय सोई उपलब्ध नाहीत. योग्य प्रशिक्षण प्राप्त कर्मचारी नाहीत. तिथे जोखमीच्या मातांना कशा तातडीने सोई मिळतील हा प्रश्न आहे. माता मृत्यूमध्ये अ‍ॅनिमियापीडित मातांची संख्या सर्वाधिक असते. यामुळे शासनाने नववी ते अकरावीच्या मुलींना लक्ष्य करून याविषयी जनजागृती व उपचाराची सोय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.-डॉ. वैशाली खंडाईत, स्त्री रोग, प्रसूती तज्ज्ञ

पाच वर्षानंतरही फारसा फरक नाहीनागपूर उपसंचालक आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, २०१२-१३ मध्ये भंडारा जिल्ह्यात १४, गोंदियात २०, चंद्रपुरात १८, गडचिरोलीत २९, वर्धेत १५, नागपूर जिल्ह्यात १०, असे मिळून नागपूर विभागात १०६ माता मृत्यूची नोंद झाली. तर, २०१६-१७मध्ये भंडाऱ्यात १४, गोंदियात ९, चंद्रपुरात १७, गडचिरोलित २६, वर्धेत २६, नागपूर जिल्ह्यात ७ असे मिळून नागपूर सर्कलमध्ये ९९ माता मृत्यूची नोंद आहे.

नागपूर शहरातील मृत्यूच्या नोंदीला दिली बगल२०१२ ते २०१६ या पाच वर्षात इतर जिल्ह्याच्या तुलनेत सर्वाधिक मृत्यू एकट्या नागपूर शहरातील रुग्णालयात झाले आहेत. ६४५ मृत्यूची नोंद आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे २०१६ पर्यंत माता मृत्यू नोंद घेतली जात होती. परंतु मृत्यूचा आकडा दुप्पट होत असल्याने २०१७ पासून शहरातील मृत्यूच्या आकड्याची नोंद घेणेच बंद केले आहे. या लपवाछपवीमुळे माता मृत्यूचे प्रमाण कसे रोखणार, असाही प्रश्न तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Healthआरोग्य