शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

५०० रुपयांच्या वादातून घडले हत्याकांड

By admin | Updated: April 11, 2015 02:17 IST

५०० रुपयांच्या वसुलीतून निर्माण झालेल्या वादामुळे सक्करदऱ्यातील तिहेरी हत्याकांड घडल्याची माहिती पुढे आली

आरोपींनी उगवला सूड : चौघांना अटकनागपूर : ५०० रुपयांच्या वसुलीतून निर्माण झालेल्या वादामुळे सक्करदऱ्यातील तिहेरी हत्याकांड घडल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, मारेकऱ्यांनी उगले बंधूंपैकी एकाच्या हत्येचा कट रचला होता. परंतु, भावाला वाचविण्यासाठी संजय आणि केशव मारेकऱ्यांसमोर उभे झाल्याने मारेकऱ्यांनी या तिघांनाही निर्दयपणे ठार मारले.एकनाथ काशिनाथराव उगले (वय ३२), संजय काशिनाथराव उगले (वय ३०) आणि केशव काशिनाथराव उगले (वय २७, रा. सर्व शामबाग, सक्करदरा) या तिघांची १० ते १२ जणांनी गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास भीषण हत्या केली. उपराजधानीला हादरवून सोडणारे हे हत्याकांड केवळ ५०० रुपयांच्या वादातून झाल्याचे पुढे आले आहे. मृत एकनाथ हा पान सेंटरच्या मागे जुगार क्लब चालवत होता. संजय कोंबड्यांची झुंज लावायचा तर, केशव हा हिंगण्यातील एका दारूच्या भट्टीवर बसायचा.आरोपी शुभम सातपैसे, निहाल नागोसे, रामा नागोसे भाजी विकायचे. जुगारातील ५०० रुपयांवरून एकनाथने रामाला दोन दिवसांपूर्वी चौकात मारहाण केली होती. त्याला सोडवण्यासाठी आलेल्या बहिणीलाही एकनाथने धक्काबुक्की केली. मोहल्ल्यातील नागरिकांसमोर झालेल्या या अपमानामुळे रामा, निहाल आणि त्याचे साथीदार सूडाने पेटले होते. या घटनेनंतर गुरुवारी शक्ती पांडेच्या मुलाच्या जावळाचा कार्यक्रम असल्यामुळे उपरोक्त आरोपी, एकनाथ, संजय आणि केशव तसेच परिसरातील काही नागरिक आणि गुंडही भंडारा मार्गावर गेले होते. तेथे खाणेपिणे सुरू असतानाच जुगारही भरला. या जुगारात शुभम आणि निहालसोबत पुन्हा एकनाथचा वाद झाला. यावेळी संजयने आरोपींना मारहाण केली. वेळोवेळी होणारी मारहाण आणि अपमानामुळे क्षुब्ध झालेले आरोपी तेथून नागपुरात परतले आणि त्यांनी रस्त्यातच एकनाथच्या हत्येचा कट रचला. तो परत येण्याची आरोपी वाट बघू लागले. रात्री ९ च्या सुमारास एकनाथ, संजय आणि केशव पान सेंटरजवळ आले. शस्त्रानिशी तयारीत असलेल्या आरोपींनी एकनाथवर धाव घेतली. मात्र, केशव पुढे झाला. त्यामुळे आरोपींनी प्रथम त्याच्यावर आणि त्याच्या मदतीला धावलेल्या एकनाथ आणि संजयवरही शस्त्राचे सपासप घाव घालून ठार मारले. आरोपी मोठ्या संख्येत असल्यामुळे उगले बंधूंना बचावाची संधीच मिळाली नाही. ते तिघे रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर आरोपी पळून गेले. या हत्याकांडामुळे अवघ्या उपराजधानीला हादरा बसला. हा टोळीयुद्धाचा प्रकार असल्याचीही चर्चा सुरू झाली. पोलिसांनी मात्र त्याचा इन्कार केला.दरम्यान, सक्करदरा पोलिसांनी मृताची आई मनोरमाबाई काशीनाथराव उगले (वय ६०) यांच्या तक्रारीवरून नेहाल धनराज नागोसे, रामेश्वर ऊर्फ रामा बाबूराव नागोसे, भूषण बहाट ऊर्फ बाल्या मांजरे, राजू बाबूराव नागोसे, शुभम सातपैसे, मनोज सोनटक्के आणि शुभम सोनटक्के यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. यातील नेहाल, रामा, बाल्या आणि राजू नागोसे या चौघांना अटक करण्यात आली. इतरांचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)