शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

५०० लिटर क्षमतेचे अग्निशामक वाहन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अक्षम; प्रभावी अग्निशामक सेवा उभी करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 18:00 IST

भिवापुरातील आगीच्या दोन्ही घटनेत कटू अनुभव : क्षमतेवर प्रश्नचिन्ह

शरद मिरे लोकमत न्यूज नेटवर्कभिवापूर : नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यापासून भिवापूरला शहरीकरणाचा लूक येत आहे. यातच घटना आणि दुर्घटनाही वाढत आहे. अशात नगरपंचायतीकडे उपलब्ध असलेले पाचशे लिटर क्षमतेचे अग्निशामक वाहन आगीवर नियंत्रण कसे मिळवणार? कारण मागील चार महिन्यांत शहरात घडलेल्या दोन्ही घटनेत आगीवर नियंत्रण मिळविण्यात हे अग्निशामक वाहन पूर्णतः फेल ठरले आहे.

शुक्रवारी (दि.२९) शहरातील धर्मापूर पेठेतील गोदामाला लागलेल्या आगीच्या घटनेत ५०० नग बारदान्यासह इतर साहित्य जळून खाक झाले. माहिती मिळताच नगरपंचायतीच्या अर्धा डझन अधिकारी व कर्मचाऱ्यांसह अग्निशामक वाहन घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीची भीषणता आणि अग्निशामक वाहनाची क्षमता याचा कुठेच ताळमेळ जुळत नव्हता. अखेरीस स्थानिकांनी एक पाऊल पुढे येत, घरगुती साहित्याच्या माध्यमातून पाण्याचा मारा करीत, आगीवर नियंत्रण मिळविले. केवळ पाचशे लिटर क्षमता असल्यामुळे अग्निशामक वाहनाची टैंक काही वेळातच खाली होत होती. त्यामुळे शेवटी घटनास्थळावरील बोअरवेलचे पाणी अग्निशामक वाहनासाठी सलग वापरावे लागले. गत चार महिन्यांपूर्वी राष्ट्रीय मार्गावरील मुख्य बाजारपेठेतील चाळीमध्ये एका मोबाइलच्या दुकानाला रात्रीच्या सुमारास आग लागली. यावेळी चाळीतील २० ते २५ दुकाने आगीच्या तावडीत सापडतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. 

नगरपंचायतीची तोकडी अग्निशामक सेवा फेल ठरल्याने अखेरीस उमरेड आणि पवनी (जि.भंडारा) येथून दोन मोठ्या अग्निशामक वाहनांना पाचारण करण्यात आले. आगीच्या दोन्ही घटनेत नगरपंचायतीच्या अग्निशामक वाहनाचा कटू अनुभव लक्षात घेता, पाचशे लिटर क्षमतेचे वाहन खरच शहरातील आगीच्या घटनेवर नियंत्रण मिळवू शकते काय, हा प्रश्नच आहे.

प्रभावी अग्निशामक सेवा उभी करासध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शहरातच नव्हे तर तालुक्यात कधी कुठेही आगीच्या घटना घडू शकतात. अशावेळी पाचशे लिटर क्षमतेच्या अग्निशामक वाहनाच्या बळावर आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य नाही. त्यामुळे शासनाने शहरात प्रभावी अग्निशामक व्यवस्था उभी करावी अशी मागणी प्रमोद रघुशे, कैलास कोमरेल्लीवार, जयप्रकाश बोराडे, हिमांशू अग्रवाल, अभय ठवकर, राकेश पौनीकर, अमोल वारजुरकर, सोहेल हटवार आदींनी केली आहे.

प्रशिक्षणाविनाच निघाले आगीशी दोन हात करायला?अग्निशामक सेवा बळकटीकरण योजनेअंतर्गत फेब्रुवारी २०२४ मध्ये भिवापूर नगरपंचायतीला पाचशे लिटर क्षमतेचे अग्निशामक वाहन मिळाले. मात्र आग कधी कुठेही लागू शकते, त्यासाठी २४ तास उपलब्ध अशी स्वतंत्र प्रशिक्षित तज्ज्ञ मनुष्यबळाची व्यवस्था उभी करण्यात आली नाही. त्यामुळे सद्यस्थितीत कचरा संकलन करणाऱ्या घंटा गाडीचे चालक आणि नगरपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी अग्निशामक वाहनाची जबाबदारी सांभाळतात.

टॅग्स :nagpurनागपूरFire Brigadeअग्निशमन दलfireआग