शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा तडाखा, १३ दिवसांत उष्माघाताचे ५ मृत्यू; रुग्णसंख्येत ६४ टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2022 11:18 IST

उष्माघाताचे आतापर्यंत एकूण ९५ रुग्ण आढळून आले असून, ९ रुग्णांचा जीव गेला आहे.

ठळक मुद्देमे महिन्यात तापमान पोहोचणार उच्चांकावर

नागपूर : यंदा भीषण उन्हाळा जाणवत आहे. नागपूरचे तापमान ४५ अंशावर गेले आहे. सूर्याच्या तीव्र प्रकोपामुळे उष्माघाताच्या रुग्णांत वाढ झाली आहे. मागील १३ दिवसांत ५ मृत्यूची व ६१ नव्या रुग्णांची भर पडली. उष्माघाताचे आतापर्यंत एकूण ९५ रुग्ण आढळून आले असून, ९ रुग्णांचा जीव गेला आहे.

यावर्षी मे महिन्याची तीव्रता एप्रिल महिन्यातच दिसून आली. यामुळे पुढील महिन्यात तापमान उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानाचा दुष्परिणाम शरीरावर पडत असल्याने उष्माघाताच्या रुग्णांत वाढ होत आहे. १ मार्च ते ४ एप्रिल यादरम्यान नागपूर जिल्ह्यात २६ रुग्ण व २ मृत्यूची नोंद होती. १२ दिवसांत म्हणजे १६ एप्रिल रोजी रुग्णांची एकूण संख्या ३४ झाली, तर मृतांची संख्या ४ वर पोहोचली; परंतु मागील १३ दिवसांतच रुग्णसंख्येत ६४ टक्क्यांनी वाढ झाली. ही संख्या चिंता वाढविणारी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

-२०१७ मध्ये होते २९३ रुग्ण

उपसंचालक, आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, २०१७ मध्ये २९३ रुग्णांची नोंद होती. मात्र, त्यावर्षी एकही मृत्यू नव्हता. २०१८ मध्ये रुग्णसंख्या कमी होऊन २७७ वर आली. २०१९ ची आकडेवारी उपलब्ध झाली नाही. २०२० ते २०२१ यादरम्यान कोरोनाचा कहर असल्याने रुग्णांच्या नोंदीच घेण्यात आल्या नाहीत; परंतु यावर्षी १ मार्च ते २९ एप्रिलदरम्यान ९५ रुग्ण आढळून आले आहेत. मे महिन्यात यात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :TemperatureतापमानHeat Strokeउष्माघातDeathमृत्यूVidarbhaविदर्भweatherहवामान